"धीरूभाई अंबाणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन (अधिक माहिती) |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन (अधिक माहिती) |
||
ओळ ५:
धीरूभाई यांचा जन्म [[गुजरात]] राज्यातील सौराष्ट्रच्या जुनागढ जिल्ह्यातील चोरवाड या गावी [[डिसेंबर २८]], [[इ.स. १९३२]] रोजी झाला. त्यांचे वडील हिराचंद गोवर्धनदास अंबाणी हे प्राथमिक शाळेत शिक्षक होते तर आई जमनाबेन या गृहिणी होत्या. धीरूभाई हे आपल्या पाच भावंडातले मधले अपत्य.
धीरूभाई शिक्षणात सर्वसामान्य विद्यार्थी होते. त्यांचे इंग्रजीचे ज्ञान चांगले तर गणित कच्चे होते. इ.स. १९४९ साली आपले १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून धीरूभाई नोकरीच्या शोधात [[एडन]] येथे गेले. तेथे बर्मा शेल कंपनीची उपकंपनी म्हणून काम करणाऱ्या ए. बेस नावाच्या कंपनीत धीरूभाई मासिक ३०० रुपये पगारावर पेट्रोल पंपावर नोकरी करू लागले. ही कंपनी लहान मोठ्या अनेक उद्योगांमध्ये कार्यरत होती. आंतरराष्ट्रीय कंपनीचा भाग असल्याने तेथे अनेक देशांचे व्यापारी येत असत. तेथेच धीरूभाई यांनी स्वतःची रिफायनरी स्थापन करावी असे स्वप्न पाहण्यास
धीरूभाई त्यांचे वडीलबंधू रमणिकलाल यांच्यासह [[एडन]]मध्ये राहत. गुजराती लोकांची आवडनिवड या दोघा भावांना माहीत असल्याने त्यांनी गुजराती खाद्यपदार्थ भारतातून मागवून ते पदार्थ एडनला विकण्यास सुरू केले. थोड्याच दिवसात अंबाणी बंधू लोकप्रिय होऊ लागले. यामुळे ओळखी तर वाढत गेल्या पण व्यापारी धीरूभाईंना प्रत्येकाकडून काहीतरी माहिती मिळत गेली. त्यामुळे त्यांना धंद्याचे गणित मांडता येऊ लागले. आपल्या हुशारी, मेहनत, चिकाटी या गुणांच्या जोरावर धीरूभाई ए. बेस मध्ये कारकून ते सेल्स मॅनेजर या पायऱ्या ओलांडून गेले. आपल्या कामापुरते [[अरबी भाषा|अरबी भाषेवर]] प्रभुत्वही धीरूभाईंनी मिळविले होतेच, अनेक मित्रही जोडले. या मित्र परिवारात भारतीय आणि परदेशी असे सगळेच होते. त्यातील सुशीलभाई कोठारी, नटुभाई संघवी आणि हरकिसन पारेख हे पुढे रिलायन्सचे मुख्य मार्गदर्शक, आधारस्तंभच बनले.
ओळ १५:
मुंबईला आल्यावर धीरूभाई सर्व कुटंबीयांसह अशा भुलेश्वर येथे एका चाळीत राहू लागले. या चाळीत सुमारे ५०० कुटुंबे रहात होती. पहिले अपत्य [[मुकेश अंबानी]] याचा जन्म एप्रिल इ.स. १९५७ मध्ये, धीरूभाई यांचे दुसरे अपत्य अनिल याचा जन्म जून इ.स. १९५९ मध्ये, थोरली मुलगी दीप्ति हिचा जानेवारी १९६२ मध्ये तर धाकटी मुलगी नीना हिचा जन्म १/नोव्हेंबर/१९६४ रोजी झाला. मोठे भाऊ रमणिकभाई यांनी १९६१ पर्यंत एडनचा धंदा आणि स्वतःची नोकरी दोन्ही सांभाळले. मग मात्र धीरूभाईंचा वाढता व्याप बघता तेही भारतात परतले आणि धीरूभाईंसह धंद्यातच रमले. शिवाय लहान भाऊ नटुभाई यांचे शिक्षण पूर्ण झाल्यामुळे तेही कामास मदत करू लागले.
इ.स. १९६६ साली धीरूभाई अंबाणी यांनी [[अमदाबाद|अमदावाद]] जवळच्या नरोडा येथे अत्याधुनिक टेक्स्टाईल मिलची
इ.स. १९७७ साली धीरूभाईंनी रिलायन्सचे रूपांतर पब्लिक लिमिटेड कंपनीत केले. लहान लहान गुंतवणूकदारांकडून भागभांडवल पैसा गोळा करणारे धीरूभाई भारतातील पहिले उद्योगपती ठरले. त्यांच्या पहिल्याच प्रयत्नासाठी सुमारे ५८,००० लोकांनी आपले पैसे गुंतविले. इ.स. १९७८ साली धीरूभाई कापड व्यवसायात पूर्णपणे उतरले. त्यांनी [[विमल]] या नावाने कापड विक्रीस
इ.स. १९८१ साली मुकेश अंबाणी [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] स्टॅनफोर्ड विद्यापीठातून शिक्षण संपवून भारतात परतले तर इ.स. १९८३ साली अनिल अंबाणी अमेरिकेतील वॉर्टन स्कूल येथून आपले शिक्षण पूर्ण करून भारतात आले.
|