"ताराबाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन (अधिक माहिती) खूणपताका: Reverted |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन (अधिक माहिती) खूणपताका: Manual revert |
||
ओळ १७:
== ताराबाई ==
वास्तविक सन १७०० साली [[छत्रपती राजाराम]] महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचे उत्तराधिकार [[छत्रपती शाहू]] महाराजांकडे जायला हवे होते. पण शाहूराजे त्यावेळी वयाने खूपच लहान होते आणि नंतरच्या काळात मोगलांच्या कैदेत होते. महाराणी ताराबाईंनी आपला मुलगा [[शिवाजी दुसरा|शिवाजी]] ह्याला गादीवर बसवले, आणि [[रामचंद्रपंत अमात्य]] यांच्या सल्ल्याने मराठा राज्याचा कारभार पाहण्यास
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर संभाजी राजांचे पुत्र शाहू यांची मोगलांनी सुटका करताना महाराष्ट्रात दुहीचे बीज पेरले. शाहू हेच मराठा राज्याचे उत्तराधिकारी असल्याचे अनेक सरदार, सेनानी यांना वाटू लागले. दोन्ही बाजूंनी छत्रपतीपदाच्या वारसा हक्कावरून संघर्ष सुरू झाला. या काळात ताराबाईच्या पक्षातले [[खंडो बल्लाळ]], बाळाजी विश्वनाथ, धनाजी जाधव यांसारखे सेनानी आणि मुत्सद्दी शाहूंच्या पक्षात गेले. शाहूराजांनी महाराणी ताराबाई आणि त्यांचा पुत्र शिवाजी दुसरा ह्यांच्याविरुद्ध युद्ध पुकारले. १७०७ साली खेड येथे झालेल्या ह्या युद्धात [[बाळाजी विश्वनाथ]] ह्या पेशव्याच्या कुशल नेतृत्वाखाली शाहूराजांची सरशी झाली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-LCL-story-about-maharani-tarabai-5890637-NOR.html|title=स्वराज्याची अस्मिता होत्या महाराणी ताराबाई; तब्बल ७ वर्षे दिली औरंगजेबाशी यशस्वी झुंज|दिनांक=2018-06-09|संकेतस्थळ=divyamarathi|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2019-01-12}}</ref>ताराराणीने जिंकलेले सर्व किल्ले शाहूला आपसूकच मिळाले. शाहूच्या पक्षात गेलेले [[बाळाजी विश्वनाथ]] यांनी ताराराणीच्या पक्षातील उदाजी चव्हाण, चंद्रसेन जाधव, [[कान्होजी आंग्रे]] , पिलाजी गोळे आदी सेनानींना शाहूच्या बाजूला वळवून घेतले. त्यामुळे शाहूचा पक्ष बळकट झाला. शाहूंनी साताऱ्याला गादीची स्थापना केली आणि महाराणी ताराबाईंनी साताऱ्याहून माघार घेऊन, [[कोल्हापूर]] येथे वेगळी गादी स्थापन केली.परंतु 1714 मध्ये राजारामची दुसरी विधवा, राजसाबाई यांनी तिला पदच्युत केले. तिने स्वतःचा मुलगा संभाजी (दुसरा) याला गादीवर बसवले. ताराबाई आणि तिच्या मुलाला दुसऱ्या संभाजीने कैद केले. शिवाजी (दुसरा) 1726 मध्ये मरण पावला. ताराबाई नंतर 1730 मध्ये छत्रपती शाहूंशी समेट करून सातारा येथे राहायला गेल्या परंतु कोणत्याही राजकीय अधिकाराशिवाय.<ref name="Sarkar2000">{{cite book|author=Sumit Sarkar|title=Issues in Modern Indian History: For Sumit Sarkar|url=https://books.google.com/books?id=S2Yn4LlujqsC&pg=PR9|year=2000|publisher=Popular Prakashan|isbn=978-81-7154-658-9|page=30}}</ref>
|