"जयगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो पानाचे मूळ नाव (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ६:
जयगडाचा किल्ला पठारावर आहे. हे पठार समुद्रात काहीसे आत घुसलेले असल्यामुळे याच्या तिन्ही बाजुंना सागराने घेरलेले आहे. येथेच शाल्मीही नदी सागराला येऊन मिळते. त्यामुळे नैसर्गिक आणि सुरक्षीत असे बंदर म्हणून जयगड पुर्वीपासून प्रसिद्ध आहे.
 
जयगड हे गाव किल्ल्याच्या दक्षिणेकडील उतारावर वसलेले आहे. जयगड हे गाव सध्या जिंदाल औष्णिक प्रकल्पामुळे बरेच प्रसिद्धीला आले आहे. जयगड गावात जाणार्‍याजाणाऱ्या फाटय़ापासून आपण पाच मिनिटांमधे जयगडाचा बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचतो.
 
==कसे जाल ?==
ओळ २३:
दोन बुरुजांमधे लपवलेला दरवाजा आहे. प्रवेशद्वारावर पुर्वी नगारखाना असावा अशी त्याची रचना आहे. काही वर्षापुर्वीपर्यंत या नगारखान्याच्या जागेत एक उत्तम विश्रामगृहही बांधलेले होते. सध्या ते बंद केल्यामुळे पूर्णपणे मोडकळीस आलेले आहे.
 
दरवाजावर कमलपुष्पे कोरलेली आहेत. दरवाजामधे पहारेकर्‍यांच्यापहारेकऱ्यांच्या देवडय़ा आहेत. आत आल्यावर तटबंदीवर जाण्यासाठी पायर्‍यांचापायऱ्यांचा मार्ग दिसतो. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजागी असे मार्ग केलेले आहेत. तटबंदीच्या मधल्या जागेत एक तीन मजली उंच इमारत आपले लक्ष वेधून घेते. या भव्य इमारतीचे छत नष्ट झालेले आहे. याला वाडा अथवा राजवाडा असेही म्हणतात. काहीजण याला कान्होजी आंग्रे यांचा वाडा असेही म्हणतात.
 
या वाडय़ाशेजारीच पाण्याची मोठी विहीर आहे. मात्र ती झाडी झुडुपांनी पूर्णपणे झाकली गेली आहे. बाजुलाच गणपतीचे मंदिर आहे. गणपती मंदिरासमोर लहानशी दीपमाळ आहे. दीपमाळेजवळच जयबाचे स्मारक आहे. तटाला लागूनच असलेले हे स्मारक जयबाच्या बलीदानाची स्मृती म्हणून उभारलेले आहे. जयगडाची बांधणी करताना त्याचा तट वारंवार ढासळत होता. त्याचे बांधकाम पक्के व्हावे म्हणून नरबळी द्यावा लागेल अशी लोकांची समजूत होती. तटबंदीच्या नरबळीसाठी जयबा तयार झाला. त्याला तटबंदीमध्ये जीवंत चिणून तटाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. जयबाच्या या त्यागपूर्ण बलीदानामुळे तटबंदी उभी राहीली. म्हणून गडाचे नाव जयगड ठेवण्यात आले अशी कथा प्रसिद्ध आहे.
 
तटबंदीवरुन पूर्ण गडफेरी करता येते. गडावरुन समुद्राकडील देखवा उत्तम दिसतो. तटबंदीमधील बुरुज गोलाकार असून त्यामध्ये जागोजागी मार्‍याच्यामाऱ्याच्या जागा केलेल्या आहेत. बुरुजावर तोफांसाठी केलेली सोय दिसते मात्र तोफां आढळत नाहीत. गडफेरी करण्यासाठी तास दीडतासाचा अवधी पुरेसा आहे. दरवाजाच्या बाहेरील खंदकामधील दरवाजातून आत गेल्यावर खंदकाच्या टोकाकडील भागात पायर्‍यापायऱ्या आहेत. येथून खालच्या भागात जाता येते. खाली जांभ्या दगडा कोरलेली गुहा आहे. या गुहेत मोहमाया देवीचे मंदिर असून ही ग्रामस्थ असलेल्या घाटगे यांची कुलदेवता आहे. समुद्रकाठापर्यंत उतरल्यावर एक लहान दरवाजा तसेच बुरुज ही पहायला मिळतात. समुद्राकाठचा पडकोटाचा भाग पाहून आपण डांबरी सडकेने धक्क्याकडे येवू शकतो व येथून आपण करहाटेश्वर मंदिराकडेही जावू शकतो.
 
==गडावरील राहायची सोय==
"https://mr.wikipedia.org/wiki/जयगड" पासून हुडकले