'''इरावती कर्वे''' (जन्म: [[डिसेंबर १५]], [[इ.स. १९०५|१९०५]],[[म्यानमार]] - मृत्यु:[[ऑगस्ट ११]], [[इ.स. १९७०|१९७०]]) या [[मराठी भाषा|मराठी]] लेखिका होत.<ref>{{स्रोत पुस्तक|title=विवेक आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश|last=जोगळेकर|first=प्रमोद|publisher=साप्ताहिक विवेक (हिंन्दुस्तान प्रकशन संस्था)|year=|isbn=|location=मुंबई|pages=}}</ref>[[मानववंशशास्त्र]], [[समाजशास्त्र]] आणि [[मानसशास्त्र]]ाच्या अभ्यासक असलेल्या इरावती कर्व्यांनी वैचारिक ग्रंथांबरोबर ललित लेखन देखील केले आहे. भारतीय त्याचप्रमाणे मराठी संस्कृती हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. या विषयांवर त्यांनी मराठी तसेच इंग्रजीतून लिखाण केले आहे. उच्चशिक्षित, निरीश्वरवादी, बुद्धिप्रामाण्यवादी असलेल्या इरावती कर्वे यांचे संस्कृत भाषेवर देखील प्रभुत्त्व होते. आधुनिक विचारांच्या असूनही आपल्या संस्कृतीबद्दल असलेली आपलेपणाची व आपुलकीची दृष्टी त्यांच्या लिखाणातून दिसून येते.नातेसंबंधांबद्दल योगदान दिले.