विष्णु भिकाजी कोलते यांचा जन्म २२ जून, इ.स. १९०८ रोजी नाखलेनरवेल नावाच्या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण मलकापूर येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण खामगाव व नागपूर येथे झाले. इ.स. १९३० साली त्यांनी एम.ए. पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरा केला. इ.स. १९३१ ते इ.स. १९४४ या कालखंडात [[अमरावती]]च्या विदर्भ महाविद्यालयात, तर इ.स. १९४४ ते इ.स. १९६४ या कालखंडात [[नागपूर|नागपुरातील]] मॉरिस कॉलेजात त्यांनी मराठी विषय शिकवला. इ.स. १९६६ ते इ.स. १९७२ या काळात ते [[नागपूर विद्यापीठ|नागपूर विद्यापीठाचे]] कुलगुरू होते. त्यांनी काव्य, नाटक, चरित्र, आत्मचरित्र या ललित साहित्य प्रकारांच्या क्षेत्रात आपली लेखणी चालविली. सोबतच अनेक ललित साहित्य कृतींचा आस्वाद घेऊन समीक्षालेखनही केले. संपादन आणि संशोधन कार्यात तर त्यांचे योगदान लक्षणीय आहे. प्राचीन शिलालेख, ताम्रपटांचे तसेच मध्ययुगीन मराठी साहित्याचे संपादन , संशोधन करून साहित्याच्या क्षेत्रात प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त केले आहे. <ref>{{स्रोत पुस्तक|title=वैदर्भी प्रतिभा|last=संपादक, तावरे|first=डॉ. स्नेहल|publisher=स्नेहवर्धन प्रकाशन|year=२००७|location=पुणे|pages=१८१}}</ref>
त्यांचे आत्मचरित्र ''अजुनी चालतोच वाट'' या नावाने इ.स. १९९४ साली प्रकाशित झाले.