"चाणक्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pratishkhedekar (चर्चा) यांनी केलेले बदल Sandesh9822 यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो शुद्धलेखन (यादी)
ओळ ४:
 
== प्रारंभिक आयुष्य ==
चाणक्याच्या सुरुवातीच्यासुरूवातीच्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत. सर्वांत प्रचलित कथेनुसार चाणक्य अथवा विष्णुगुप्त हा [[पाटलीपुत्र]]मधील 'चणक' या प्रतिभावान शिक्षकाचा मुलगा होता. नंद राजवटीवर टीका केल्याने राजद्रोहाबद्दल चणक यांना अटक झाली व त्यांचा कारावासात मृृत्यू झाला. पाटलीपुत्र शहरात नंद राजवटीत चणक परिवाराचे जगणे असह्य झाल्याने विष्णुगुप्ताने [[तक्षशिला|तक्षशिलेला]] प्रयाण केले. तक्षशिला येथील विद्यापीठात शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने तक्षशिला विद्यापीठातच राजनीती व [[अर्थशास्त्र]] या विषयांवर अध्यापन सुरू केले व अत्यंत प्रभावी शिक्षक म्हणून आपली ओळख निर्माण केली. राजनीती व अर्थशास्त्र हे विषय शिकवत असल्याने भारतातील अनेक राज्यांचे मंत्री चाणक्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले त्यामुळे कोणत्याही राज्याशी निगडित नसूनही चाणक्याचे नाव भारताच्या राजकीय वर्तुळात आदराने घेतले जाई. [[कैकेय]] देशाचा महामंत्री इंद्रदत्त हा चाणक्याचा मित्र होता, असे मानतात. लहानपणापासूनच नंद राजवट उलथून टाकण्याचे स्वप्न विष्णुगुप्ताने मनात बाळगले होते. त्यादृष्टीने तयारी म्हणून त्याने आपले शिष्य तयार केले होते, त्यांत [[चंद्रगुप्त मौर्य]] हाही होता.त्याला चाणक्याने मगध देशाचा राजा बनविला.
 
== अलेक्झांडरचे भारतावर आक्रमण ==
[[अलेक्झांडर]]चे भारतावरील आक्रमण चाणक्याच्या आयुष्यात मोठी उलाढाल करून गेले. अलेक्झांडरच्या आक्रमणाचा सामना फक्त भारतीय राज्यांची एकत्र सेनाच करू शकेल असा विश्वास विष्णुगुप्ताला होता, त्यामुळे चाणक्याने विविध राज्यांच्या राज्यकर्त्यांना एकत्र लढण्याचे आवाहन केले. परंतु सुरुवातीलाचसुरूवातीलाच तक्षशिलेचा राजकुमार आंभी याने अलेक्झांडरकडे मैत्रीचा हात पुढे केला. परंतु विविध राज्यांचे व जनपदांचे एकमेकांशी हेवेदावे व संघर्षांमध्ये अडकलेल्या राज्यांना एकत्र करून अलेक्झांडरविरुद्ध लढण्यासाठी प्रेरित करण्यात चाणक्यला अपयश आले. उलट आंभीने अलेक्झांडरबरोबर युती करून [[पोरस]]विरुद्ध लढण्यास मदत केली. अलेक्झांडरने पोरसचा [[झेलम नदी]]च्या किनारी झालेल्या लढाईत पराभव केला. चाणक्याने या काळात [[मगध]] साम्राज्यालाही अलेक्झांडरविरुद्ध इतर राज्याशी युती करून लढण्यास विनंती केली व भारताला पारतंत्र्यापासून वाचवण्याचा आग्रह धरला. परंतु चाणक्याचा अपमान करून त्याची विनंती धुडकावून लावण्यात आली. जोवर या अपमानाचा बदला घेणार नाही तोवर आपली शेंडी बांधणार नाही अशी चाणक्याने प्रतिज्ञा घेतली होती अशी कथा प्रसिद्ध आहे. अलेक्झांडरच्या सैन्यामध्ये इतर भारतीय राज्यांच्या सामर्थ्याबद्दलच्या कहाण्या ऐकून त्याच्या सैन्यामध्ये दुफळी माजली व परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी त्याने [[मॅसेडोनिया]]ला परतण्याचा निर्णय घेतला व काही काळातच अलेक्झांडरने भारतातून माघार घेतली. माघार घेतली तरी जिंकलेला प्रदेश अलेक्झांडरच्या नियंत्रणात रहावा म्हणून या राज्यांवर क्षत्रपांची नेमणूक केली होती त्यामुळे पश्चिम व वायव्य भागावर ग्रीक सत्ताच होती.
 
=== ग्रीक सत्तेविरुद्ध युद्ध ===
तक्षशिलेला परतल्यावर चाणक्याने आपल्या शिष्यांना संघटित करून ग्रीकांविरुद्ध स्वातंत्र्ययुद्धासाठी प्रेरित केले व शिष्यांमार्फत जनजागृतीचे कार्य करून घेतले. चंद्रगुप्तने चाणक्याच्या नियोजनानुसार अनेक लहान सहान लढाऊ जमातींना एकत्र करून ग्रीक छावण्यांवर आक्रमणे करण्यास सुरुवातसुरूवात केली. जनजागृती व चंद्रगुप्तचे यश यामुळे ग्रीकांविरुद्धच्या मोहिमेला व्यापक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. चाणक्यच्या नियोजनानुसार चंद्रगुप्ताच्या सैनिकांद्वारे ग्रीक सैन्यातील फक्त ग्रीकांवर हल्ले करण्यात येत व भारतीयांना जीवदान देण्यात येत असे. यामुळे ग्रीक सैन्यातील भारतीयांची द्विधा मानसिकता झाली तसेच ग्रीक सैनिकांचाही विश्वास कमी झाला. यामुळे ग्रीकांसोबत लढणाऱ्या अनेक भारतीय तुकड्यांना सेवेतून डच्चू मिळाला व ते चंद्रगुप्ताला येऊन मिळाले. चाणक्याने तक्षशिलेला आपल्या विजयाचे लक्ष्य बनवले त्यामुळे आंभीची राजकीय नाचक्की झाली. चंद्रगुप्ताने अनेक प्रांतांमधून ग्रीकांना हुसकावून लावले व ते प्रांत स्वतंत्र घोषित केले. पोरस हा अलेक्झांडरचा अंकित असल्याने युद्धाची झळ त्यालाही बसत होती. परंतु चाणक्याने पोरसला इंद्रदत्तामार्फत या संघर्षात बघ्याची भूमिका घेण्यास प्रवृत्त केले त्यामुळे ग्रीकांची हतबलता अजून वाढली. चाणक्याच्याच कुशल नीतीमुळे सिंध प्रांत सहजपणे पोरसच्या राज्याला जोडला गेला त्यामुळे पोरसचा चाणक्यावर विश्वास वाढला. या वाढलेल्या विश्वासावर चाणक्याने पोरसच्या मदतीने मगधवर आक्रमण करण्याचे ठरवले.
 
=== मगधचे सत्तांतर ===
ओळ ५०:
* चाणक्य ([[महादेवशास्त्री जोशी]])
* चाणक्य (विश्वास दांडेकर)
* चाणक्य (बालसाहित्य, लेखक -[[ सुबोध मुजुमदार]])
* चाणक्य चरित्र ([[ह.अ. भावे]])
* चाणक्यनीति (आश्विनी पाराशर)
ओळ ८५:
==बाह्य दुवे==
{{विकिक्वोट}}
 
 
 
 
 
[[वर्ग:ऐतिहासिक व्यक्ती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/चाणक्य" पासून हुडकले