"शंकरराव गंगाधर जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
सांगकाम्या (चर्चा | योगदान) |
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन, replaced: सुरु → सुरू (3) using AWB |
||
ओळ १:
'''शंकरराव गंगाधर जोशी''' (जन्म :[[१७ मे]] [[१८८७]] [[संगमनेर]], [[अहमदनगर]], - [[०१ सप्टेंबर]] [[१९६९]] संगमनेर) हे संगमनेर येथील जुन्या पिढीतील बहुश्रुत सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ व द्रष्टे आणि निष्ठावंत देशभक्त होते. ते 'नाना' नावाने परिचित होते. केवळ त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उच्चशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. ते [[लोकमान्य टिळक|लोकमान्य टिळकांचे]] भक्त आणि अनुयायी होते.
शंकरराव जोशी यांना संगमनेर शहर तालुका आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात महत्वाचे स्थान आहे. [[शिक्षण प्रसारक संस्था, संगमनेर|शिक्षण प्रसारक संस्था]] स्थापन करण्याच्या घटना समितीचे ते पहिले सभासद, नंतर शिक्षण प्रसारक संस्थेचे पहिले सचिव आणि नंतरचे उपाध्यक्ष होते.<ref>संपादकीय, नियतकालिक, संगमनेर आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, संगमनेर, अंक १-२, वर्ष १९६२—६३, प्रकाशक : म. वि. कौंडिन्य, प्राचार्य, संगमनेर साहित्य व वाणिज्य महाविद्यालय, संपादक मंडळ : प्राचार्य, म. वि. कौंडिन्य, प्रा. श. वि. पानसे, प्रा. प्र. ना. अवसरीकर, प्रा. कु. विमल लेले, प्रा. ग.म. कांबळे प्रा. सु. शं. कलवडे, मुद्रक : चंद्रकांत शंकर जोशी, शिवाजी प्रिंटर्स, २२१२, संगमनेर पान ०३,- ०५
स्वातंत्र्यपूर्वकाळात 'विद्यार्थी संसद' स्थापन करून त्याद्वारे विद्यार्थांना लोकशाहीचे भान देण्याचा आणि शिक्षकवर्गाचे प्रश्न मांडण्यासाठी आणि शिक्षकांमध्ये राष्ट्र्भान जागे करण्यासाठी 'शिक्षक संघटना' स्थापन करण्याचा देशातील पहिला मान शंकरराव जोशी यांच्याकडे जातो. प्रायमरी ट्रेनिंग कॉलेज आणि [[संगमनेर महाविद्यालय|संगमनेर महाविद्यालया]]च्या रूपाने अनेक शैक्षणिक, सामाजिक, राजकीय उपक्रमांना त्यांनी चालना दिली. लेखन, चिंतन आणि चळवळी यांनी त्यांचे जीवन भारलेले होते. ते राष्ट्रीय काँग्रेसचे सच्चे कार्यकर्ते, लोकमान्य टिळकांचे अनुयायी आणि प्रखर राष्ट्रभक्त होते.
न्यायमूर्ती [[महादेव गोविंद रानडे
===कौटुंबिक माहिती===
शंकरराव जोशी यांचा जन्म त्यांच्या आजोळी गरीब जोशी कुटुंबात संगमनेर येथे झाला. दत्तात्रय (दत्तोपंत, मृत ), प्रभाकर (बाळासाहेब, मृत) आणि चंद्रकांत (बंडोपंत, मृत) ही त्यांच्या मुलांची आणि मैनाताई, वत्सलाताई ही त्यांच्या दोन मुलींची नावे आहेत.
==शिक्षण==
परिस्थिती हलाखीची असल्याने मराठी पाचवीनंतर नानांनी नोकरी करावी, अशी त्यांचा आजोबांची (गंगाधर यांचे वडील ?) इच्छा होती. तथापि नानांना इंग्रजी विद्येची आस होती. त्यामुळे त्यांनी नेटाने इंग्रजी पाचवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतरच्या शिक्षणाची सोय संगमनेर येथे नव्हती. आईकडूनचे आजोळ निजामपूरकर मुंबईत असल्याने पुढील शिक्षणाकरिता ते मुंबईत गेले. तेथे मॅट्रिक उत्तीर्ण झाले. त्याचवेळी बाहेरून त्यांनी चित्रकलेचे शिक्षण घेतले. त्यांचे शिक्षण :
* मराठी प्राथमिक : पेटीट विद्यालय, संगमनेर
ओळ २१:
मॅट्रिकनंतर त्यांनी प्रथम ब्रिटीश टपाल खात्यातील काम केले, त्यानंतर ते बॉम्बे गॅझेट प्रेसमध्ये कॉपीरीडर होते. तथापि ते इंग्रजांच्या वर्णभेदाच्या विदारक अनुभवामुळे ते संगमनेरात परतले आणि पेटीट विद्यालयात कला शिक्षक म्हणून रुजू झाले. तीस वर्षांच्या सेवेनंतर तेथून १९३८ साली निवृत्त झाले<ref name="असे आहेत आमचे नाना !"/>
संगमनेर येथे आणि अहमदनगर येथे त्यांनी तीन छापखाने
==सामाजिक कारकीर्द==
पेटीट विद्यालयात असतानाच पेटीट विद्यालय नावारूपाला आणण्याकरिता विद्यालयात आणि संगमनेर शहराच्या सर्वागीण विकासासाठी संगमनेरात अनेक उपक्रम नानांनी
* चित्रकला परीक्षांचे केंद्र – १९०९.
* शिमग्यासारख्या सार्वजनिक उत्सवातील पैशाचा अपव्यय, गैरप्रकार बंद करून मैदानी व इतर खेळांचे सामने व शर्यती
* माजी विद्यार्थी-शिक्षक निधी - १९१९ : रु. ११०००/- (रु. अकरा हजार) : गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षणाची सामाजिक जबाबदारीचे भान विद्यार्थी-शिक्षक जागे केले.
* 'विद्यार्थी संसद' : विद्यार्थांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि त्यांना लोकशाहीचे प्रशिक्षण देण्यासाठी स्थापन केली.
ओळ ३९:
* 'हिंदी कहावत कोश' : १९४१.
* स्वतंत्र भारत संकीर्तन
* अहमदनगर जिल्ह्याचा इतिहास
==पदे==
ओळ ५४:
==कृतज्ञता लेख==
शंकरराव गंगाधर जोशी यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाविद्यालयातील तत्कालिन संस्कृत विभागाच्या शिक्षिका कु. विमल लेले यांनी महाविद्यालयाच्या १९६७ सालच्या वार्षिक नियतकालिकात "असे आहेत आमचे नाना ! " हा लेख लिहिला.<ref name="असे आहेत आमचे नाना !"/>
==संदर्भ==
|