"वसंतराव नाईक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
|||
ओळ ३२:
'''वसंतराव फुलसिंग नाईक''' एक विख्यात कृषितज्ञ,प्रगतशील शेतकरी व मातब्बर सुसंस्कृत राजनितीज्ञ होते. महाराष्ट्राचे सर्वाधिककाळ मुख्यमंत्री पद भूषविणारे ते एकमेव मुख्यमंत्री मानले जातात. वसंतराव नाईकांचा [[जन्म]] [[यवतमाळ]] जिल्ह्यातल्या [[पुसद]] या गावाजवळील [[गहुली]] या छोट्याश्या खेड्यातील एका सधन शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांनी सर्वात पहिले पुसद नगरपालिकेचे [[अध्यक्ष]][[पद]] भूषविले होते. ते महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय लोकनेते होते. [[हरित क्रांती]], पंचायत राज बरोबरच महाराष्ट्रातील श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक समजले जाते.<ref>{{स्रोत बातमी|url=https://prahaar.in/हरितक्रांती-आणि-पंचाय/|title=हरितक्रांती आणि पंचायत राज वसंतराव नाईकांची स्मारके|publisher=प्रहार|location=मुंबई}}</ref> माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांनी "वसंतराव नाईक हे भारत मातेचे थोर सुपूत्र आहेत." या शब्दात नाईकांचा गौरव केला. इ.स. १९७२ मधील महाराष्ट्रातील भीषण दुष्काळादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांना मदतीच्या योजना राबवल्या. नाईक यांना 'शेतकऱ्यांचा जाणता राजा', 'हरितयोद्धा' म्हणूनही संबोधतात.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.univarta.com/news/gujarat-maharashtra/story/2061289.html#:~:text=%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87%20%E0%A4%A8%E0%A5%87%20%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A4%BE%20%E0%A4%95%E0%A4%BF,%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%20%E0%A4%AD%E0%A5%80%20%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%20%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A5%A4|title=हरितक्रांती के जनक थे वसंतराव नाईक|publisher=युनिवार्ता|year=२०२०|location=मुंबई}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|title=आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार: वसंतराव नाईक|publisher=महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती महामंडळ|year=२००४|location=मुंबई}}</ref><ref>{{स्रोत बातमी|first=|url=https://prahaar.in/वसंतराव-नाईक-संपूर्ण-भार/|title=वसंतराव नाईक संपूर्ण भारताचे सुपूत्र|publisher=प्रहार|year=२०१३|location=मुंबई}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|title=हरितयोद्धा : वसंतराव नाईक|last=पवार|first=एकनाथ|publisher=मृदगंध|year=२०१७|location=महाराष्ट्र}}</ref>
== पूर्व जीवन ==
===नाईक घराणे===
नाईक घराणे महाराष्ट्रातील समाजकारण व राजकारणातील एक प्रचलित घराणे आहे. त्यांचे मूळ आडनाव राठोड असून गोत्र रणसोत क्षत्रिय आहे.{{संदर्भ हवा}} गहुली हे खेडे चतुरसिंग राठोड यांनी वसविले होते.{{संदर्भ हवा}} त्यांनी जमीनजुमला वसवून
वसंतरावांचे प्राथमिक शिक्षण हे विविध खेड्यांमध्ये झाले. पुढे त्यांनी विठोली व अमरावती येथे माध्यमिक शिक्षण घेऊन नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून बी.ए. ही पदवी घेतली (१९३८) व नंतर एल्एल्.बी ही पदवीही मिळविली (१९४०).
== कारकीर्द ==
वसंतरावांनी कायद्याची पदवी घेऊन पुसद येथे वकिलीस सुरुवात केली. हळूहळू त्यांचा वकिलीत जम बसू लागला व आर्थिक स्थितीही सुधारली तसेच त्यांची हळूहळू प्रतिष्ठाही वाढली. नंतर ते पुसद कृषिमंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले (१९४३–४७). यांशिवाय हरिजन वसतिगृह व राष्ट्रीय वसतिगृहाचे (दिग्रस) ते अध्यक्ष होते. १९४६ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मध्य प्रदेश राज्याच्या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली (१९५१–५२). ते पुसदच्या नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले (१९४६–५२). पहिल्या निवडणुकीत ते मध्य प्रदेश राज्यात महसूल खात्याचे उपमंत्री झाले (१९५२–५६). १९५६ मध्ये राज्यपुनर्रचनेनंतर विदर्भ व मराठवाडा हे प्रदेश मुंबई द्विभाषिक राज्यात समाविष्ट झाल्यानंतर वसंतराव यशवंतरावांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री झाले (१९५७). त्यानंतर १९६० मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते प्रथम महसूल मंत्री होते. १९६२ च्या निवडणुकीनंतरही कन्नमवारांच्या मंत्रिमंडळात ते महसूल मंत्री होते; पण कन्नमवारांच्या मृत्यूनंतर ते बहुमताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले (१९६३). या पदावर त्यांनी १२ वर्षे काम केले. या काळात त्यांनी महाराष्ट्रात अनेक सुधारणा केल्या.महाराष्ट्राची पायाभरणी व उभारणी त्यांच्यात कारकिर्दीत झाली.
प्रथमतः त्यांनी कृषिविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल याकडे लक्ष दिले. ‘दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईन’ असे त्यांनी १९६५ मध्ये निक्षून सांगितले; त्यांचा प्रशासकीय दृष्टिकोन अतिशय व्यावहारिक असे. काँग्रेसचे दारूबंदी हे धोरण असतानासुद्धा त्यांनी महाराष्ट्रात दारूबंदी शिथिल करून लोकांना चांगली दारू उपलब्ध केली व हातभट्ट्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला. कोणतीही समस्या ते विचारविनिमय करून तडजोडीच्या धोरणाने सोडवीत असत. त्यांनी शिक्षण, शेती वगैरे बाबतींत लक्ष घालून अनेक सुधारणा केल्या. रोजगार हमी योजनेची मुहुर्तमेढ केली. देशात पहिल्यांदाच चार कृषी विद्यपिठाची स्थापना केली. राज्यात औदयोगिकरणाचे जाळे विणले. विदयुत व औष्णिक केंद्राची उभारणी केली. विशेषतः महाराष्ट्रातील पाझर तलाव व वसंत बंधारा यांच्या निर्मितीचे संपूर्ण श्रेय वसंतराव नाईक यांच्याकडेच जाते. २० फेब्रुवारी १९७५ रोजी शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर वसंतरावांनी आपल्या जिल्ह्यातच सामाजिक कार्य करण्यास सुरुवात केली आणि मार्च १९७७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते लोकसभेवर निवडून आले.
|