'''वसंतराव फुलसिंग नाईक''' ([[१एक जुलै|०१विख्यात जुलै]][[इ.स. १९१३|. १९१३]]:[[पुसद]]कृषितज्ञ,प्रगतशील [[यवतमाळशेतकरी जिल्हा]], [[महाराष्ट्र]] - [[इ.स. १९७९|इ.स. १८ ऑगस्ट १९७९]]) हे [[मराठी]]व मातब्बर सुसंस्कृत राजकारणीराजनितीज्ञ होते. [[डिसेंबर ५]], [[इ.स. १९६३]] ते [[फेब्रुवारी २०]], [[इ.स. १९७५]] कालखंडादरम्यान ते [[महाराष्ट्र]] राज्याचे [[मुख्यमंत्री]] होते. (१ जुलै १९१३ - १८ ऑगस्ट १९७९) ते एक विख्यात कृषितज्ञ असून महाराष्ट्राचे सर्वाधिककाळ मुख्यमंत्री पद भूषविणारे ते एकमेव मुख्यमंत्री मानले जातात. वसंतराव नाईककांचा [[जन्म]] [[यवतमाळ]] जिल्ह्यातल्या [[पुसद]] या गावाजवळील [[गहुली]] या छोट्याश्या खेड्यातील एका सधन शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांनी सर्वात पहिले पुसद नगरपालिकेचे [[अध्यक्ष]][[पद]] भूषविले होते. ते महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय [[नेते]] होते. [[हरित क्रांती]]चे,श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक वआणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार अशी त्यांची ओळख आहे.पंचायत राजची मुहूर्तमेढ देखील त्यांच्याच शिफारशी व दूरदृष्टीवरुन झाल्याने वसंतराव नाईक यांना 'पंचायत राज' चे जनक देखील मानले जाते. वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राची उभारणी करीत असताना राष्ट्रबांधणीत देखील महत्वपूर्ण योगदान दिले आहे.माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांनी "वसंतराव नाईक हे भारत मातेचे थोर सुपूत्र आहेत." या शब्दात नाईकांचा गौरव केला.वसंतराव नाईक यांची 'शेती आणि माती'वर निस्सीम भक्ती होती.शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. कृषी औदयोगिक समृद्धी आणत शेतकऱ्यांच्या जीवनात त्यांनी समृद्धी आणि आत्मविश्वास आणले. इ. स. १९७२ च्या भिषण दुष्काळावरही त्यांनी अत्यंत चाणाक्षपणे मात केली.हरितक्रांती, श्वेतक्रांती घडवून आणली.समृदध शेतकरी हाच त्यांच्या जीवनाचा लक्ष्य होता.त्यासाठी नाईकांनी क्रांतीकारी धोरणाची प्रखरतेने अमलबजावणी केली. या शेतकरी निष्ठ कामगिरीमुळे वसंतराव नाईक यांना 'शेतकऱ्यांचा जाणता राजा', 'हरितयोद्धा' म्हणूनही संबोधतात.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.univarta.com/news/gujarat-maharashtra/story/2061289.html#:~:text=%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87%20%E0%A4%A8%E0%A5%87%20%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A4%BE%20%E0%A4%95%E0%A4%BF,%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%20%E0%A4%AD%E0%A5%80%20%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%20%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A5%A4|title=हरितक्रांती के जनक थे वसंतराव नाईक|publisher=युनिवार्ता|year=२०२०|location=मुंबई}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|title=आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार: वसंतराव नाईक|publisher=महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती महामंडळ|year=२००४|location=मुंबई}}</ref>