"ईशान्य भारत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎सप्त भगिनी: संदर्भ जोडला
→‎सप्त भगिनी: संदर्भ जोडला
ओळ २७:
भारताच्या अति-संवेदनशील भागात ईशान्य भारतातील सात राज्यांची गणना होते. ही सात राज्ये म्हणजे [[आसाम]], [[त्रिपुरा]],[[मणीपूर]],[[मिझोराम]],[[नागालॅंड]], [[मेघालय]] आणि [[अरुणाचल प्रदेश]]. यांना सप्त भगिनी असे संबोधले जाते. हा भाग चार बाजूंनी [[बांगलादेश]], [[म्यानमार]],[[चीन]] आणि [[नेपाळ]] या देशांनी वेढलेला आहे. भारताशी मात्र याचा संबंध एका ७० कि.मि.च्या बारीक रेषेनी कायम आहे. येथील लोक प्रामुख्याने गिरीजन म्हणजे डोंगरात राहणारे आणि आपापल्या अस्मिता जपणाऱ्या विविध स्थानिक जमातीचे आहेत.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=RYGAAAAAMAAJ&newbks=0&printsec=frontcover&dq=tribes+in+north+east&q=tribes+in+north+east&hl=en|title=Tribes of North-East India: Biological and Cultural Perspectives|last=Sengupta|first=Sarthak|date=1994|publisher=Gyan Publishing House|isbn=978-81-212-0463-7|language=en}}</ref> या भागात अंदाजे १६० पेक्षा अधिक बोलीभाषा आहेत.
* धार्मिक -
ब्रिटिश राजवटीत येथे पहिला धर्मप्रसारक आला आणि त्याचा परीणामस्थानिक आजगिरीजन मेघालयातनागरिकांचे ८०% लोक हे [[ख्रिश्चन]] असलेलेधर्मात आढळतातरुपांतर झालेले आढळते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=F0IWgsHeAasC&newbks=0&printsec=frontcover&dq=history+of+christianity+in+north+east&hl=en|title=Christianity and Change in Northeast India|last=Subba|first=Tanka Bahadur|last2=Puthenpurakal|first2=Joseph|last3=Puykunnel|first3=Shaji Joseph|date=2009|publisher=Concept Publishing Company|isbn=978-81-8069-447-9|language=en}}</ref> आंतरराष्ट्रीय सीमेला लागुन असल्याकारणाने बांगला-देशी घुसखोराचे प्रमाण ही मोठ्या प्रमाणात आहे.
* पर्यटन स्थळ -
पर्यटनाचा नेहमीपेक्षा वेगळा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक या भागाला भेट देतात त्यातही पावसाळ्यामध्ये याठिकाणी येणाऱ्यांचे प्रमाण हे तुलनेने अधिक आहे. चेरापुंजी, मानसिंगराम या प्रचंड पावसाच्या प्रदेशात मनसोक्त आनंद लुटण्यासाठी देशभरातून पर्यटक या भागाला भेट देतात. चेरापुंजी तील सेव्हन सिस्टर फॉल्स हा धबधबा ईशान्य भारतातील पर्यटनाचे प्रमुख आकर्षण ठरलेलाआहे. येथील सात राज्यांच्या संदर्भावरून 'सेव्हन सिस्टर' असे नाव या धबधब्याला मिळाले आहे. हा धबधबा डोंगर कड्यांवरून सात वेगवेगळ्या भागातून खाली कोसळतो. म्हणून देखील सेव्हन सिस्टर फॉल्स असे या धबधब्याला संबोधले जाते. एक हजार फुटावरून अधिक खोल कोसळणारा हा धबधबा मावस माई या गावापासून एक किलोमीटर अंतरावर आहे. पावसाळ्यात हे धबधबे अधिकच वेगाने खाली कोसळतात. सूर्याची किरणे या धबधब्याच्या तुषारांवर पडून इंद्रधनुष्य तयार होते. ते अतिशय विलोभनीय दिसते. पावसाळ्याची खरी खुरी अनुभूती घ्यायची असेल तर ईशान्य भारतातील या परिसरात मेघालय हादेखील उत्तम पर्याय आहे.