"व्याघ्रप्रकल्प" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो 103.58.8.221 (चर्चा) यांनी केलेले बदल Shubhamjadhav1 यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''व्याघ्रप्रकल्प''' अथवा प्रोजेक्ट टायगर या नावाने प्रसिद्ध असलेले प्रकल्प [[भारत]] सरकारतर्फे चालवण्यात येतात. यात मुख्यत्वे भारतीय [[वाघ|वाघांचे]] संरक्षण करणे हा मुख्य हेतू आहे. वाघांच्या संरक्षणाअतंर्गत त्यांच्या वसतीस्थानाचे संवर्धन व वन्य वाघांच्या संख्येत वाढ करणे गृहीत आहे. वन्य वाघांची कमी होणारी संख्या ही अतिशय चिंताजनक आहे. भारतात सध्या सुमारे ३५०० पर्यंत वन्य वाघ आहेत असा अंदाज आहे. २० व्या शतकाच्या सुरुवातीला अंदाजे १ लाख वाघ भारतात होते. परंतु बंदुकीमुळे वाघांच्या शिकारीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली व शिकार करणे काही लोकांसाठी छंद बनला. वाघांचे नैसर्गिक [[खाद्य]] कमी झाल्याने वाघांचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले वाढले. परिणामी पाळीव प्राणी खातात म्हणून पण वाघांवर विषप्रयोग करून त्यांच्या शिकारी करण्यात आल्या. १९७०च्या सुरुवातीला केवळ १७०० वाघ उरले व भारत सरकार जागे झाले व १९७२मध्ये [[वन्य जीव संरक्षण कायदा]] करण्यात आला. त्यानुसार वाघासह अनेक दुर्मिळ प्रजातींवरील शिकारीवर बंदी घालण्यात आली व व्याघ्रप्रकल्पांच्या स्थापनेस चालना मिळाली.
व्याघ्रप्रकल्पामुळे वाघांची संख्या वाढण्यास अनमोल मदत झाली परंतु त्यामुळे चोरट्या शिकारींचा सुळसुळाट झाला व ९०च्या दशकानंतर पुन्हा वाघांच्या शिकारीत वाढ झाली. मुख्यत्वे चीनमधील विविध प्रकारच्या औषधांसाठी वाघाच्या हाडांची मोठी मागणी आहे. आंतरराष्ट्रीय दबावानंतरही शिकारींमध्ये आणि [[चीन]]च्या धोरणात काहीही फरक पडलेला नाही.