"दत्तोपंत ठेंगडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: कॉंग्रेस → काँग्रेस (2) using AWB
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
ओळ २५:
| तळटिपा =
}}
'''दत्तोपंत बापूराव ठेंगडी''' (जन्म : आर्वी (वर्धा), [[नोव्हेंबर १०]], [[इ.स. १९२०]]; मृत्यू :- पुणे, [[ऑक्टोबर १४]], [[इ.स. २००४]]) हे [[मराठी]] कामगार चळवळकर्ते, [[हिंदू धर्म|हिंदू]] तत्त्वचिंतक, राजकारणी होते. हे [[भारतीय मजदूर संघ]], [[भारतीय किसान संघ]], [[स्वदेशी जागरण मंच]] इत्यादी संस्थांचे संस्थापक होते. इ.स. १९६४-७६ या कालखंडात ते भारताच्या [[राज्यसभा|राज्यसभेचे]] सदस्यही होते.
 
दत्तोपंतांचा जन्म १० नोव्हेंबर १९२० रोजी, वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे झाला. शिशुवस्थेपासूनच दत्तोपंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघरूपी पाठशाळेचे विद्यार्थी होते. तेथूनच त्यांना देशभक्तीचे बाळकडू मिळाले. वयाच्या १५ व्या वर्षापासूनच त्यांनी समाजसेवेला प्रारंभ केला. आर्वी तालुका वानरसेनेचे दत्तोपंत १९३४ साली अध्यक्ष झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपुरात झाले. विशेष म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना दत्तोपंत [[माधव गोळवलकर|गोळवलकर गुरुजींच्या]] घरीच निवासाला होते. साहजिकच त्यांच्यावर गोळवलकरांच्या विचारांचा प्रभाव पडला.