"राजाराम भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
ओळ ३५:
|}}
 
पहिले '''राजारामराजे भोसले''' (जन्म : राजगड, २४ फेब्रुवारी १६७०; मृत्यू :- सिंहगड, ३ मार्च १७००) हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र होते. त्यांचा जन्म फाल्गुन पौर्णिमा शके १५९१या तिथीला म्हणजेच २४ फेब्रुवारी १६७० रोजी किल्ले राजगडावर झाला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच्या मराठी स्वराज्याच्या अतिशय अवघड काळात (१६८९ ते १७००) त्यांनी [[संताजी घोरपडे]] आणि [[धनाजी जाधव]] या विश्वासू सेनापतींच्या साहाय्याने नेतृत्व केले. कारकिर्दीचा त्यांनी मोठा कालखंड त्यांनी [[तामिळनाडू]]तील [[जिंजी]] येथे व्यतीत केला व तेथून स्वराज्याची धुरा सांभाळली. [[फाल्गुन कृष्ण ९ शके १६२१]] म्हणजे [[३ मार्च १७००]] मध्ये पुण्याजवळील [[सिंहगड]] येथे त्यांचा मृत्यू झाला.
 
राजारामाच्या काळापासून स्वराज्यावरचा एकछत्री अमंल खऱ्या अर्थाने संपला. नंतरच्या काळात अनेक सत्ताकेद्रें निर्माण झाली. पुणे हे जरी मोठे सत्ताकेंद्र असले तरी नागपूर, कोल्हापूर, सातारा, बडोदा व नंतरच्या काळात ग्वाल्हेर, उज्जैन व इंदूर ही मराठ्यांची उपसत्ताकेंद्रे होती.