"इंदिरा संत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३१:
| तळटिपा =
}}
'''इंदिरा संत''' ([[जानेवारी ४]], [[इ.स. १९१४|१९१४]], [[पुणे]] - [[इ.स. २०००|२०००]]) या [[मराठी भाषा|मराठी]] कवयित्री होत्या. शिक्षकीपेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५०च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे. इंदिरा संत आणि त्याचे पती [[ना.मा. संत]] या दोघांच्या कवितांचा एकत्रित असा संग्रह 'सहवास' या नावाने [[इ.स. १९४०|१९४०]] ला प्रसिद्ध झाला. दुर्दैवाने ना.मा. संत यांचे [[इ.स. १९४६|१९४६]] साली निधन झाल्यावर इंदिरा संत यांच्यातील कवयित्री कोमेजते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु तसे घडले नाही. विशुद्ध रुपातील इंदिरा संत यांची कविता टीकाकार तसेच काव्यरसिकांनी उचलून धरली.आजमितीस इंदिरा संत यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. [[रमेश तेंडुलकर]] यांनी इंदिरा संत यांच्या निवडक कविता 'मृण्मयी' नावाने १९८२ साली संपादित करून प्रसिद्ध केल्या आहेत.
==कौटुंबिक==
पूर्वाश्रमीच्या इंदिरा दीक्षित असलेल्या इंदिरा संत यांचा जन्म [[कर्नाटक|कर्नाटकातील]] [[इंडी]] या गावी झाला. [[कोल्हापूर]] व [[पुणे]] येथून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. [[बी.ए.]], [[बी.टी.डी.]] व [[बी.एड]] या पदव्या प्राप्त केल्यानंतर [[बेळगाव|बेळगावच्या]] ट्रेनिंग कॉलेजात अध्यापिका म्हणून काम पाहण्यास त्यांनी सुरुवात केली. या कॉलेजात त्यांनी [[प्राचार्य]] पद देखील भूषवले. पुढे [[पुणे|पुण्याच्या]] [[फर्ग्युसन कॉलेज|फर्ग्युसन कॉलेजात]] सहाध्यायी [[ना.मा.संत]] यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या.
==प्रकाशित साहित्य==
|