फाल्गुन वद्य षष्ठी, शके १५२१ (२६ फेब्रुवारी इ.स. १५९९) या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला. फाल्गुन वद्य (एकनाथ षष्ठी हा) दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो.
== गुरुपरंपरा ==
== परंपरा ==
एकनाथांची गुरुपरंपरा :
# [[नारायण]] (विष्णू)
ओळ २५:
# [[जनार्दनस्वामी]]
# एकनाथ
एकनाथांची शिष्यपरंपरा : संत एकनाथ महाराजांच्या शिष्य शाखा महाराष्ट्र आणि बाहेरही मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे. त्यापैकी काही , श्री नारायणगड (बीड), श्री भगवानगड(नगर), श्रीनाथपीठ (अंजनगावसुर्जी), श्री अमृतनाथस्वामी मठ (आळंदी), श्री तुकाविप्र महाराज (पंढरपूर,अंजनवती),श्रीकृष्णदयार्णव महाराज (भारतातील सर्व मठ), श्री गोपालनाथमहाराज
एकनाथांची वंशपरंपरा : संत एकनाथांच्या वंशजांची अनेक घरे पैठण आणि बाहेरही आहेत. उपलब्ध माहितीनुसार नाथांच्या नंतर त्यांच्या वंशजांनी त्यांची वारकरी संप्रदायाची आणि दत्त संप्रदायाची धुरा नेटाने चालविली. कीर्तन आणि गायन याद्वारे त्यांनी त्या त्या काळी छाप पडल्याचे अनेक कागदपत्राद्वारे लक्षात येते. त्यांच्यातील पहिले रामचंद्र (भानुदासबाबा) यांचा उल्लेख ग. ह. खरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ११ गुरूंपैकी एक असा केलेला आहे. छय्याबुवा म्हणून चौथ्या पाचव्या पिढीत एक सत्पुरुष होऊन गेले त्यांच्या संबंधी अनेक कथा सांगितल्या जातात. सहाव्या सातव्या पिढीतील काशिनाथबुवा व रामचंद्रबाबा यांचा मोठा प्रभाव भोसले,पेशवे, शिंदे, होळकर,निंबाळकर,गायकवाड, धार देवास आदींवर असल्याचे दिसते. काशिनाथ बुवा यांचा उल्लेख गायक म्हणून येतो तर रामचंद्रबाबा यांचा उल्लेख कीर्तनकार व गायक म्हणून येतो. सद्यपरिस्थितीत योगिराज महाराज गोसावी ( [[योगिराज पैठणकर]] ) यांचे नाव नाथांचे १४ वे वंशज म्हणून संप्रदायात अग्रक्रमाने घेतले जाते.