"फैजपूर (जळगाव)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
छोNo edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ४८:
गाव पूर्वी छोटे होते. ‘रंगारघाटी’ हा गावातील सर्वात उंच टेकडीवजा भाग आहे. या घाटीच्या अवतीभोवती गाव वसलेले आहे. सैन्याच्या छावण्या असल्या कारणाने गावाला पूर्वी चारही बाजूंनी भिंतींची तटबंदी होती. भिंतींचे अवशेष आजही काही ठिकाणी आढळतात. गावाला ‘न्हावी दरवाजा’, ‘पिंपरूड दरवाजा’ आणि ‘शहर दरवाजा’ असे तीन दरवाजे होते. पिंपरुड दरवाजा ज्याला म्हणायचे तो दरवाजा मुख्य होता. त्याला प्रवेशद्वार असेही म्हणत. सध्या त्या ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा असून या ठिकाणाला सुभाष चौक म्हटले जाते. येथून गावात दोन बाजूंना दोन प्रमुख मार्ग जातात. त्यातील एक राम मंदिराकडे तर दुसरा मारूती मंदिराकडे जातो. पूर्वी गावाच्या एका बाजूला खंडेराव वाडी तर दुसऱ्या बाजुला गणपती वाडी होती. तेव्हा या दोन्ही वाड्यांच्या मध्ये असलेल्या या गावाचा वर्तमान काळात गावाच्या साऱ्या सिमा ओलांडून चारही दिशांना विस्तार झालेला दिसून येतो.
===औद्योगिक इतिहास===
फैजपूर हे पूर्वी खान्देशातील प्रमुख औद्योगिक वसाहत असलेल्या शहरांपैकी एक होते.
Line ५५ ⟶ ५७:
गावात पूर्वी जिनींग अँड प्रेसिंगचे कारखाने होते. गावात कापसाचा व सरकीचा व्यापार मोठ्या प्रमाणात चालायचा. त्याचप्रमाणे फैजपूर हे पूर्वी त्याच्या ऑइल मिल्ससाठीसुद्धा प्रसिद्ध होते. येथील तेल देश विदेशात निर्यात होत असे. सद्यस्थितीत त्यातील केवळ एक ऑइल मिल कार्यान्वयित असून अन्य मिल्स बंद झाल्या आहेत. बुधवारी फैजपुरात गावरान तुपाचा बाजार वाणी गल्लीत भरायचा. या भागाला आजही तूप बाजार म्हणून ओळखले जाते. फैजपूर येथे असलेला मधुकर सहकारी साखर कारखाना हा जळगाव जिल्ह्यातील सगळ्यात पहिले उभारला गेलेला साखर कारखाना आहे.
===कॉंग्रेसचे प्रथम ग्रामीण अधिवेशन===
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पन्नासावे (५० वे) आणि प्रथम ग्रामीण अधिवेशन हे २७ आणि २८ डिसेंबर १९३६ रोजी फैजपूर येथे करण्यात आले होते. या अधिवेशनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. शेतकर्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्यासाठी संघर्ष करणाऱ्या काँग्रेससाठी फैजपूर अधिवेशन महत्त्वाचे होते. फैजपूर अधिवेशनचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते जे तत्कालीन काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते होते आणि राजमल ललवाणी त्या परिषदेचे कोषाध्यक्ष होते. या अधिवेशनात महात्मा गांधी व इतर दिग्गज नेते सुद्धा उपस्थित होते. त्या ठिकाणी आता ‘नेहरू विद्यानगर’चा परिसर आहे. तेथे धनाजी नाना विद्यालय, बी.एड. कॉलेज व फार्मसी इन्स्टिट्यूट आहेत. या अधिवेशनाचा देखावा शहरातील छत्री चौकातल्या भिंतीवर साकारण्यात आला आहे.▼
▲भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पन्नासावे (५० वे)
== संत खुशाल महाराज ==
|