"अनंत यशवंत खरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
'कौटुंबिक' विभाग जोडला आहे.
'उद्या' ह्या कादंबरीचा गोषवारा दिला आहे.
ओळ २५:
== अंताजीची बखर ==
शैली आणि आशयाच्या दृष्टीने '''अंताजीची बखर''' ही त्यांची कादंबरी लक्षणीय ठरते. अठराव्या शतकात राहणाऱ्या ‘अंताजी खरे’ नावाच्या एक पुणेरी ब्राह्मणाने आपल्या आयुष्यातील काही निवडक प्रसंग ‘बखरी’च्या स्वरूपात लिहून ठेवले होते, आणि दोन शतकांनंतर हे जीर्णावस्थेतले कागद त्याच्या वंशजांच्या हाती लागतात अशी कल्पना करून ही कादंबरी लिहिलेली आहे. तिच्यात वर्णन केलेला काळ १७४० ते १७५७ दरम्यानचा आहे, आणि तिची भाषिक शैली अठराव्या शतकातल्या बखरवाङ्मयाशी मिळतीजुळती आहे. नागपूरकर भोसल्यांच्या बंगालमधल्या स्वाऱ्या आणि मराठा बारगीरांनी त्यावेळी केलेले अत्याचार, एका सतीचा प्रसंग, १७५६ साली कलकत्त्याच्या फोर्ट विल्यममध्ये घडलेला काळकोठडीचा प्रसंग, प्लासीची लढाई अशा अनेक ठिकाणी अंताजी जातीने हजर असतो, व आपल्या हिशेबी आणि कातडीबचावू स्वभावाला अनुसरून हरप्रसंगी नेमके भाष्य करीत जातो, अशी कादंबरीची रूपरेषा आहे.
 
== उद्या ==
 
'''उद्या''' ह्या कादंबरीची गणना [[Utopian and dystopian fiction | dystopian fiction]] ह्या साहित्यप्रकारात करता येईल. कथानक नजीकच्या भविष्यकाळातलं आहे. ह्या जगात जागोजागी माणसांवर पाळत ठेवणारे कॅमेरे लावलेले आहेत, तसेच चेहऱ्यावरचे हावभाव टिपणारे संगणक आहेत. सरकारी यंत्रणा आणि (‘भरोसा’, ‘विकास’ अशी नावं मिरवणाऱ्या) जगड्व्याळ खाजगी कंपन्या यांच्यात अनेक पातळ्यांवर साटंलोटं आहे. समाजातलं स्त्रियांचं प्रमाण घटलेलं असल्यामुळे त्यांची ‘शिकार’ करून त्या श्रीमंत वर्गाला पुरवण्याच्या कामी अनेक राजकीय दलं गुंतलेली आहेत. खेड्यांपासून महानगरांपर्यंत अनेक पातळ्यांवर सगळेच समाजघटक ह्या जाळ्यात कसे अडकले आहेत याचं तपशीलवार चित्रण कादंबरीत आलेलं आहे. ह्याला पर्याय म्हणून अहिंसेच्या मार्गाने जाणारं, निसर्गाशी आपुलकीचं नातं राखून जगण्याचा प्रयत्न करणारं ‘चारगाव’ नावाचं एक खेडं (कम्यून) तग धरून आहे. ह्या दोन जगांतील संघर्ष कादंबरीत प्रभावीपणे चित्रित झाला आहे.
 
== नंदा खरे यांनी लिहिलेली पुस्तके==