"अनंत यशवंत खरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
'अंताजीची बखर' ह्या त्यांच्या कादंबरीचा गोषवारा दिला.
ओळ २२:
== शैक्षणिक व व्यावसायिक कारकीर्द ==
खऱ्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नागपुरात झाले. मॅट्रिकची परीक्षा १९६१ साली उत्तीर्ण झाल्यानंतर १९६२-६७ ह्या काळात त्यांनी मुंबईतील [[भारतीय_तंत्रज्ञान_संस्था_मुंबई| इंडियन इन्स्टिट्यूट अॉफ टेक्नॉलॉजी]] ह्या संस्थेत सिव्हिल इंजीनियरिंगचे शिक्षण घेतले. तेथून B.Tech. (Honours, Civil) ही पदवी घेतल्यानंतर २००१ सालापर्यंत एका खाजगी कंपनीत ते सिव्हिल इंजीनियर होते. भीमा नदीवरील उजनी धरणाच्या बांधकामात त्यांचा मोठा वाटा आहे.
 
== अंताजीची बखर ==
शैली आणि आशयाच्या दृष्टीने '''अंताजीची बखर''' ही त्यांची कादंबरी लक्षणीय ठरते. अठराव्या शतकात राहणाऱ्या ‘अंताजी खरे’ नावाच्या एक पुणेरी ब्राह्मणाने आपल्या आयुष्यातील काही निवडक प्रसंग ‘बखरी’च्या स्वरूपात लिहून ठेवले होते, आणि दोन शतकांनंतर हे जीर्णावस्थेतले कागद त्याच्या वंशजांच्या हाती लागतात अशी कल्पना करून ही कादंबरी लिहिलेली आहे. तिच्यात वर्णन केलेला काळ १७४० ते १७५७ दरम्यानचा आहे, आणि तिची भाषिक शैली अठराव्या शतकातल्या बखरवाङ्मयाशी मिळतीजुळती आहे. नागपूरकर भोसल्यांच्या बंगालमधल्या स्वाऱ्या आणि मराठी बारगीरांनी त्यावेळी केलेले अत्याचार, एका सतीचा प्रसंग, १७५६ साली कलकत्त्याच्या फोर्ट विल्यममध्ये घडलेला काळकोठडीचा प्रसंग, प्लासीची लढाई अशा अनेक ठिकाणी अंताजी जातीने हजर असतो, आणि आपल्या हिशेबी आणि कातडीबचावू स्वभावाला अनुसरून हरप्रसंगी तो नेमके भाष्य करीत जातो, अशी कादंबरीची रूपरेषा आहे.
 
== नंदा खरे यांनी लिहिलेली पुस्तके==
Line ८४ ⟶ ८७:
 
 
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:खरे,अनंत यशवंत}}
[[वर्ग:मराठी अभियंते]]