"अश्वत्थामा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
#WPWP
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Ashwatthama uses Narayanastra.jpg|इवलेसे]]
'''अश्वत्थामा''' हा कौरव-पांडवांचे गुरु [[द्रोणाचार्य]] यांचा पुत्र. असं म्हणतात की द्रोणाचार्यांना भगवान महादेवाच्या वरदानातून महादेवाइतकाच पराक्रमी असा मुलगा प्राप्त झाला, जो अश्वत्थामा होता. या वरदानामुळेच अश्वत्थामा कपाळावर एक रत्न घेऊन जन्माला आला जे त्याला भूक, तहान आणि थकवा यापासून वाचवते आणि मनुष्याशिवाय इतर सर्व सजीव प्राणिमात्रांवर वर्चस्व देते<ref>{{स्रोत पुस्तक|title=महाभारत - संशोधीत आवृत्ती|publisher=The Bhandarkar Oriental Research Institute|year=1966|location=PUNE|pages=ऐषीकपर्व अध्याय १६ श्लोक १६ ते २०}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://sheetaluwach.com/glossary-indian-scriptures/|title=Glossary of Terms in Indian Scriptures|last=उवाच|first=शीतल|date=2020-03-05|website=Sheetal Uwach|language=en-US|url-status=live|access-date=2021-04-18}}</ref>. अश्वत्थामा हाही द्रोणाचार्यांचा शिष्य असल्याने तो अर्जुनाप्रमाणेच शस्त्र आणि अस्त्र विद्येत पारंगत असून तेजस्वी आणि दिव्य शक्तींचा उपयोग करण्यात निपुण होता.
 
कौरव-पांडवांच्या युद्धात द्रोणाचार्यांनी कौरवांचे सेनापतीपद स्वीकारल्यानंतर पांडवसेनेवर त्यांनी तिखट हल्ला चालू केला. पांडवांची बाजू मार खाऊ लागली. द्रोणाचार्य यांचा आपल्या मुलात अतिशय जीव आहे हे श्रीकृष्णाला ठाऊक असते. अश्वत्थामा मेला असे जर द्रोणाचार्यांना पटवून देता आले तर ते दिङ्‌मूढ होतील आणि युद्ध करण्याची इच्छा त्यांना राहणार नाही असा श्रीकृष्णाचा तर्क होता. द्रोणाचार्यांना शस्त्र खाली ठेवायला लावायचा हाच एक उपाय आहे हे कृष्णाने युधिष्ठिराला पटवून दिले. तेंव्हा भीमाद्वारे अश्वत्थामा नावाच्या एका हत्तीचा वध घडवून कृष्णाने 'अश्वत्थामा मेला' अशी आवई उठवली. रणधुमाळीत सत्य कोण सांगेल असा प्रश्न द्रोणाचार्यांना पडला. तेंव्हा सर्वात विश्वसनीय सत्यवादी मनुष्य म्हणून त्यांनी युधिष्ठिराला विचारले की खरेच अश्वत्थामा मेला काय? परंतु कृष्णाच्या सांगण्यावरून युधिष्ठिराने स्पष्ट काही न सांगता "अश्वत्थामा मेला खरा, पण 'नरो वा कुंजरो वा'" असे उत्तर दिले. त्या वाक्यातला ’अश्वत्थामा मेला’ एवढेच शब्द ऐकून, मानसिक धक्का बसलेले [[द्रोणाचार्य]] यांनी शस्त्र खाली ठेवले. दृष्टद्युम्नाने याचा फायदा उचलत त्यांचा वध केला.