"भारताचे संविधान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ४०:
[[चित्र:Dr. Babasaheb Ambedkar Chairman, Drafting Committee of the Indian Constitution with other members on Aug. 29, 1947.jpg|thumb|भारतीय संविधानाच्या मसूदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर समितीच्या इतर सदस्यांसमवेत. (बसलेल्यां पैकी डावीकडून) एन. माधवराव, सय्यद सदुल्ला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर (अध्यक्ष), अल्लादी कृष्णास्वामी अय्यर, सर बेनेगल नरसिंह राव. (उभे असलेल्यांपैकी डावीकडून) एस.एन. मुखर्जी, जुगल किशोर खन्ना व केवल कृष्णन् (२९ जानेवारी, इ.स. १९४७]]
 
१९५० साली अंमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे १९३५च्या भारत सरकार कायद्यावर (Government of India Act of 1935) वर आधारित आहे. १९३५सालच्या या कायद्यान्वये भारताच्या अंतर्गत स्वशासनाचा पाया घातला गेला होता. ब्रिटिश पंतप्रधान [[क्लेमंट ॲटली]] यांच्या शिष्टमंडळाच्या ''स्वतंत्र भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यासाठी एका मसुदा समितीच्या स्थापनेविषयीच्या'' कल्पनेस [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या]] नेत्यांनी सहमती दर्शविली होती. १९४६च्या उन्हाळ्यात या समितीची स्थापना झाली व तिची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी [[सच्चिदानंद सिन्हा]] यांच्या अध्यक्षतेखाली तर फ्रॅंक अँथनी यांच्या उपाध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथील संविधान सभागृहात झाली.११ डिसेंबर रोजी सर्व सदस्यांच्या सहमतीने डॉ.राजेंद्रप्रसाद यांची अध्यक्षस्थानी तर आशुतोष मुखर्जी यांची उपाध्यक्ष स्थानी निवड करण्यात आली. हे सभागृह आज सेंट्रल हॉल या नावाने परिचित आहे. पहिल्या बैठकीला ९ महिलांसह एकूण २११ सदस्य उपस्थित होते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतास स्वातंत्र्य मिळाल्यावर अल्पकाळ या समितीने ''भारताचे प्रतिनिधी'' या रूपात काम केले होते.
 
२९ ऑगस्ट १९४७ रोजी [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीची स्थापन झाली. मसुदा समिती ही सर्वात महत्त्वाची समिती होते. हिचे काम संविधान निर्मिती करणे हे होते. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेद्वारे स्वीकारला गेला. त्यामुळे भारतात २६ नोव्हेंबर हा दिवस "[[भारतीय संविधान दिन]]" म्हणून साजरा केला जातो.<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.mahadiscom.com/AdministrativeCircular-hr/Adm_Cir_287.pdf | title = संविधान दिन शासनादेश २४ नोव्हेंबर २००८ | भाषा = मराठी }}</ref> [[नागरिकत्व]], [[निवडणुका]] व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या. संविधान संपूर्ण रूपाने २६ जानेवारी [[इ.स.१९५०|१९५०]] रोजी लागू झाले. त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस "[[भारतीय प्रजासत्ताक दिन]]" म्हणून साजरा केला जातो.