जव्हार संस्थान वर राज्य केलेल्या मुकणे राजघराण्यातील महाराजांची यादी पुढीलप्रमाणे आहे<ref>{{Cite web|url=https://www.worldstatesmen.org/India_princes_A-J.html|title=Indian Princely States before 1947 A-J|website=www.worldstatesmen.org|access-date=२१ फेब्रुवारी २०२१|archive-url=https://web.archive.org/web/20200105065313/https://www.worldstatesmen.org/India_princes_A-J.html|archive-date=१५ जुलै २०१५|url-status=dead}}</ref><ref>{{Cite web|url=http://rulers.org/indstat1.html|title=Indian states before 1947 A-J|website=rulers.org|access-date=२१ फेब्रुवारी २०२१|archive-url=https://web.archive.org/web/20150715010957/http://rulers.org/indstat1.html|archive-date=१५ जुलै २०१५|url-status=live}}</ref>
2)श्रीमंत धुळाबाराव उर्फ नीमशाहनेमशाह मुकणे(1337-1388)▼
3)श्रीमंत भीमराव उर्फ भीमशहा मुकणे(1388-1429)
जयहर साम्राज्य चे (जव्हार राज्य) चे संस्थापक आणि प्रथम महाराज. प्रतिकूल परिस्थिती मध्ये अनेकांना पराभूत करून राज्य स्थापन केले. सदानंद महाराज यांच्या आशिर्वादामुळे राज्य स्थापन केले. धरमपूर,पेठ,बागलाण ही राज्ये जिंकली. देवगिरी,सुरत आणि नाशिक दरबार मध्ये मोठा मान होता. आजच्या ठाणे,पालघर,नाशिक, अहमदनगर या महाराष्ट्रतील आणि वलसाड,डांग,नवसरी या गुजरात राज्यातील जिल्ह्यात राज्य पसरले होते अनेक किल्ले जिंकले. शहरे,मंदिरे,मठ आणि अश्या अनेक वास्तू बांधल्या. जयदेवराव हे पराक्रमी शासक होते त्यांचा विवाह सिसोदिया राजपूत घराण्यातील मोहनादेवी यांच्याशी झाला त्यांना धुळाबाराव आणि होळकरराव असे दोन पराक्रमी पुत्र होते. अल्लाउद्दीन खिलजीच्या काळात अनेक देवगिरी वर आक्रमणे झाली तेव्हा राज्य स्थापन केले. जयदेवराव यांचे वडील देवगिरी साम्राज्यात मोठे सरदार होते.त्यांनी गुजरात मधील भट घराण्याला राजपूजा चा मान दिला. जेव्हा भारतात अनेक मुस्लिम आक्रमणे धुमाकूळ घालत होती तेव्हा जयदेवराव यांनी अनेकांना आश्रय दिला. गोधर्म प्रतिपालक ही पदवी धारण करून त्याचा मोठा राज्याभिषेक झाला. अनेक साथीदार यांना घेऊन राज्य निर्माण केले आणि पहिला स्वराज्य याचा प्रयत्न केला.
जव्हार राज्यातील आणि मुकणे राजघरण्यातील सर्वात पराक्रमी शासक. वडील जयदेवराव यांच्या नंतर त्यांचे प्रथम पुत्र धुलाबाराव यांनी राज्यविस्तार केले. याकाळात अनेक युद्धे त्यांनी केली. मुबारक खिलजी ने जेव्हा देवगिरीचा राजा हरपालदेव यांची हत्या केली तेव्हा मुबारक खिलजी जव्हारकडे आला तेव्हा धुलाबाराव यांनी गनिमी कावा पद्धतीने खिलजीशी अनेक वेळ लढा दिला शेवटी मुबारकने तह करून राज्यला मान्यता दिली.त्यानंतर त्यांनी विशाल अशी सेना निर्माण केली.60 पायदळ आणि 25 घोडदळची स्थापना केली तेव्हा त्यांच्याकडे 85 हजार इतके सैन्य होते. कोळी,राजपूत,नाईक,वारली,मराठा अश्या अनेक जातीतील लोकांना घेऊन त्यांनी मोठे सैन्य निर्माण केले त्यांनी 32 पेक्षा जास्त किल्ले जिंकले. रामनगर,पेठ,बागलाण,अक्रणी,बनसा येथील राजांशी सालोख्याचे सबंध ठेवले. पुढे मुहम्मद तुघलक याने जव्हार वर आक्रमन केले आणि धुलाबाराव यांचा पराभव केले आणि दिल्लीला नेण्यात आले. धुळाबाराव यांचे बंधू होळकरराव यांनी पुढे वारंवार तुघलक च्या साम्राज्यवर आक्रमने केली. तुघालक यांच्या सरदार यांनी हे हल्ले रोखण्यासाठी धुलाबाराव यांची सुटका करण्यास सांगितले पुढे अनेक अटीवर धुलाबाराव यांची सुटका करण्यात आली आणि त्यांना निमशहा ही पदवी देण्यात आली आणि मुकणे घराण्याला 'शहा' हा किताब देण्यात आला. त्यावेळी जव्हार चा विस्तार हा उत्तरेकडे सुरत पासून दक्षिणेकडे कल्याण पर्यंत होता आणि पूर्वेला चांदवड पासून पश्चिमेला अरबी समुद्रापर्यंत होता. राज्यचा 9 लक्ष इतका महसूल होता