"भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Anil K Jathar (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ५:
ही कालगणना कशासाठी?
[[भारत|भारतामध्ये]] ऋतुचक्र ही फार महत्त्वाची बाब आहे आणि ऋतुचक्र [[चंद्र|चंद्रावर]] अवलंबून नसून [[सूर्य|सूर्यावर]] अवलंबून आहे. भारताचे पहिले पंतप्रधान . जवाहरलाल [[ जवाहरलाल नेहरू|नेहरू]] यांच्या पुढाकाराने तत्कालीन मान्यवर शास्त्रज्ञ डॉ. [[मेघनाद साहा|मेघनाद]] साहा यांच्या अध्यक्षतेखालील कालगणनापुनर्रचना समितीने इ. स. १९५६पासून सौर कालगणना बनवून इ. स. १९५७पासून प्रसारात आणली. आकाशवाणी, [[दूरदर्शन]], शासकीय पत्रव्यवहार इ. ठिकाणी या कालगणनेनुसार तारखेचा उल्लेख केला जातो. पुण्यातील [[ज्ञानप्रबोधिनी]],मराठी विज्ञान परिषद आणि अन्य काही संस्थांद्वारा गेली काही वर्षे ही राष्ट्रीय सौर दिनदर्शिका प्रकाशित केली जात आहे . सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील परस्पर-संबंधावर आधारित असणारी ही सौर कालगणना, चांद्र कालगणनेपेक्षा ऋतु-चक्राला अधिक जवळची आहे. चांद्रमासाचा कालावधी सुमारे २९.५३ दिवसांचा आहे. त्याला १२ महिन्यांनी गुणल्यास वर्षाचे सुमारे ३५४ दिवस होतात व ३६५ दिवसांच्या सौर वर्षापेक्षा चांद्रवर्ष हे सुमारे १०-११ दिवसांनी कमी पडते. चांद्र आणि सौर कालगणनेतील हा १०-११ दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी भारतीय पंचांगकर्त्यांनी अधिक मास आणि क्षयमास यांची योजना केली. त्यामुळे भारतीय पंचांगात महिने हे चांद्र कालगणनेनुसार पण एकूण वर्ष हे मात्र सौर कालगणनेनुसार असे असते. म्हणजे भारतीय पंचांगात चांद्र कालगणनासुद्धा सौर कालगणनेशी स्वतःला जुळवून घेते.
चांद्रवर्षातील
सूर्यावर अवलंबून असणारे ऋतुचक्र भारतासाठी महत्तवाचे आहे. त्यामुळे त्याच्याशी जुळणारी कालगणना ही अधिक उचित कालगणना मानली पाहिजे. भारतामध्ये बहुतेक सर्वच आणि धार्मिक कृत्ये चांद्रतिथीवर आधारित असली तरी ऋतु-चक्राशी जवळचा संबंध असणारी सौर कालगणना ही शास्त्रीय-दृष्ट्या अधिक योग्य आहे.
|