उपनिषद साहित्यात प्राचीन [[भारतीय]] तत्त्वविचार आले आहेत. उप या उपसर्गाचा अर्थ आहे ‘जवळ’ आणि सदसद् याचा अर्थ आहे बसणे. गुरुंच्यागुरूंच्या जवळ परमार्थ विद्या समजून घेणे असा याचा अर्थ आहे. १. ईश, २. केन, ३. कठ, ४. प्रश्न, ५. मुंडक, ६. मांडूक्य, ७. तैत्तिरीय, ८. ऐतरेय, ९. छांदोग्य, १०. बृहदारण्यक, ११. श्वेताश्वतर ही प्रमुख उपनिषदे मानली जातात. वैदिक साहित्यात उपनिषदे ही सर्वात शेवटी येतात म्हणून त्यांना ‘[[वेदान्त]]’ असेही म्हटले जाते. काही उपनिषदे गद्यात असून काही पद्यात आहेत. उपनिषदे तत्त्वज्ञान सांगतात म्हणून त्यांना ‘ब्रह्मविद्या’ असेही म्हणतात. या साहित्यात प्रामुख्याने [[धर्म]], [[सृष्टी]] आणि [[आत्मा]] किंवा परमात्मा याविषयी चर्चा केली दिसून येते. ब्रह्म काय आहे? ब्रह्मप्राप्ती कोणत्या उपायाने होते? आत्मा म्हणजे काय? यांची सविस्तर चर्चा या साहित्यात आहे. मोक्ष कल्पना, नीतिकल्पना, असे विषयही उपनिषद साहित्याने हाताळले आहेत. या प्रमुख उपनिषादांसह काही गौण उपनिषदेही आहेत. उपनिषदांची एकूण संख्या १०८ च्या आसपास असावी. [[श्री गणेश अथर्वशीर्ष|अथर्वशीर्ष]] तसेच [[भगवद्गीता|गीता]] यांनाही उपनिषद म्हणून गौरविण्यात आले आहे.<ref>भारतीय संस्कृती कोश ,खंड पहिला</ref>