"नवरात्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
खूणपताका: Reverted |
Mahendra.adt (चर्चा | योगदान) खूणपताका: Reverted दृश्य संपादन |
||
ओळ ६६:
नवरात्र साधारणपणे देवीचे असते, पण इतर देवांची नवरात्रेही असतात. तुळजाभवानीचे नवरात्र दहा दिवसांचे असते, तशीच खंडोबाचे, व्यंकटेशाचे, नरसिंहाचे, दत्ताचे अशी इतरही नवरात्रे असतात. यापैकी नरसिंहाचे नवरात्र तीन ते नऊ दिवस, खंडोबाचे पाच किंवा सहा दिवस, बालाजी (व्यंकटेशाचे) दहा दिवस, दत्ताचे नऊ ते दहा दिवस असते.
आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या नवरात्रींखेरीज, आश्विन शुक्ल तृतीयेपासून सुरू होणारा सप्तरात्रोत्सव, पंचमीपासून सुरू होणारा पंचरात्रोत्सव आणि सप्तमीपासून सुरू होणारा त्रिरात्रोत्सव
* शाकंभरीचे (बनशंकरी देवीचे) नवरात्र - पौष शुद्ध अष्टमी ते पौष पौर्णिमा या कालावधीत शाकंभरी नवरात्र असते.
ओळ ७२:
* चंपाषष्ठीचे नवरात्र : मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते. [[जेजुरी]]ला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो. कुलाचाराप्रमाणे पूजेत सुघट व टाक असतात. नवरात्राप्रमाणेच रोज माळा वाढवत घाटावर लावायच्या असतात. सहा दिवस नंदादीप लावतात. या नवरात्रालाच मार्तंडभैरव षड्रात्रोत्सव म्हणतात.
* दत्ताचे नवरात्र : मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ते मार्गशीर्ष पौर्णिमा असे दत्ताचे नवरात्र असते. अबेजोगाईला संत दासोपंतांच्या वाड्यातील धाकट्या देव्हाऱ्यात हे असते. षष्ठीसह सप्तमीला नवरात्र बसते. नसता सप्तमीला बसते. नवरात्रात रोज देवाला अभिषेक असतो. नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी यंत्रपूजा असते. यंत्र दासोपंतांनी तयार केलेले आहे. त्यावर मंत्र लिहिलेले आहेत. यंत्रपूजा झाल्यावर, नवरात्र असेपर्यंत यंत्राला रोज हळदीकुंकू वाहिले जाते. नवरात्र म्हणून माळ वगैरे नसते. परंतु तेलाचा एक व तुपाचा एक असे दोन नंदादीप अखंड तेवत असतात. पौर्णिमेला नवरात्राची सांगता होते, तेव्हा होमहवन, पुरणावरणाचा नैवेद्य केला जातो.
* दुर्गापूजा : बंगाल आणि त्याच्या आसपासच्या राज्यांत साजरे होणारे हे सहा दिवसांचे नवरात्र असते. ललिता पंचमीच्या दुसऱ्या दिवसापासून, म्हणजे षष्ठीपासून ते दसऱ्यापर्यंत हा उत्सव चालतो. महाअष्टमी (दुर्गाष्टमी)ला बकऱ्याचा आणि महानवमीला रेड्याचा बळी दिला जातो.
* नरसिंहाचे नवरात्र : [[नृसिंह|नृसिंहा]]च्या सन्मानार्थ [[मार्गशीर्ष]] शुक्ल षष्ठीपासून ते चतुर्दशीपर्यंत नृसिंहाचे [[नवरात्र]] साजरे होते.
* [[बालाजी]]चे नवरात्र : भारताच्या [[उत्तर प्रदेश]], पंजाब, राजस्थान आदी प्रदेशांतील बालाजीच्या मंदिरांत चैत्र शुक्ल प्रतिपदा ते नवमीपर्यंत हे साजरे होते.
|