"लाठमार होली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भर
संदर्भ घातला
ओळ ३:
 
==इतिहास==
पौराणिक कथेनुसार मानले जाते की श्रीकृष्णाने राधा आणि तिच्या सख्यांची खोडी काढली आणि त्यांना चिडवले. त्यामुळे गोपी कृष्णावर आणि त्याच्या मित्रांवर लाठी उगारू लागल्या, ते पाहून कृष्ण आणी त्याचे सर्व सवंगडी पाळायला लागले. या घटनेची आठवण म्हणून लाठमार होळी साजरी केली जाते. महिला हातात जाड लाकडी काठी घेऊन पुरुषांवर उगारतात आणि त्याचा मार टाळण्यासाठी पुरुष गावभर धावत सुटतात, ढाल हातात घेऊन स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये मनोरंजन आणि खेळ असाही हेतू आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiatoday.in/lifestyle/what-s-hot/story/lathmar-holi-barsana-nandgaon-lord-krishna-radha-mathura-uttar-pradesh-1179205-2018-02-28|title=What is Lathmar Holi? Why is it celebrated?|last=DelhiFebruary 28|first=India Today Web Desk|last2=February 28|first2=2018UPDATED:|website=India Today|language=en|access-date=2021-03-26|last3=Ist|first3=2018 17:07}}</ref>
==स्वरूप==
[[वसंत पंचमी]] पासून हा उत्सव सुरु होत असून पुढे सुमारे ४० दिवस याचे आयोजन असते. प्रत्येक मंदिरात आणि छोट्या गावांमध्ये लोक विविध प्रकारे या उत्सवाचा आनंद घेतात. होळीच्या आदल्या दिवशी नंदगाव , बरसाना, मथुरा या उत्तर प्रदेश मधील छोट्या गावांमध्ये हा सण साजरा होतो. लाठ म्हणजे लाकडाची एक जाडसर काठी.बरसाना येथील राधा राणी मंदिरात याची सुरुवात होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.thedivineindia.com/radha-rani-mandir-barsana/6143|title=Radha Rani Mandir Barsana {{!}} Barsana Temple {{!}} how to reach, timings|website=thedivineindia.com|language=en|access-date=2021-03-26}}</ref> आठवडाभर चालणा-या या सोहळ्यात लोक नृत्य, संगीत , आणि एकमेकांना रंग लावण्याचा आनंद घेतात. थंडाई नावाचे एक विशेष पेय यानिमित्ताने प्यायले जाते. द्वारकाधीश मंदिरातून यानिमित्त कृष्णाची विशेष पालखी निघते आणी आयची मिरवणूक प्रसिद्ध आहे.