"प्राकृत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १६:
काही प्राकृत भाषा याप्रमाणे - [[मागधी भाषा|मागधी]], [[शौरसेनी भाषा|शौरसेनी]], [[पैशाची भाषा|पैशाची]], [[महाराष्ट्री भाषा]], [[अर्धमागधी भाषा]], [[अपभ्रंश भाषा]], [[पाली भाषा|पाली]] इत्यादी. यापैकी [[महाराष्ट्री भाषा]] ही भाषा [[सातवाहन]] राज्यकाळातील प्रमुख भाषा गणली जाते. या भाषेत साहित्य लिहिले गेल्याचे पुरावे मिळतात. ख्रिस्तपूर्व काळातील प्राकृत शिलालेखही सापडले आहेत, [[सातवाहन राजा हल|सातवाहन राजा हलाने]] प्राकृत कवितांचे संकलन केल्याचे उल्लेख मिळतात.
मराठी हे महाराष्ट्री भाषेचे सुधारित रूप आहे.
 
ज्या समूहाने मूळ भाषेचे संस्कारित रूप स्वीकारून त्याच्यात व्यवहार केला, त्या शिष्टांच्या भाषेचे, म्हणजेच संस्कृतचे व्याकरण महर्षी पाणिनीने सिद्ध केले. पाणिनीच्या अष्टाध्यायीवर कात्यायन वररुचीने वार्तिक लिहिले आणि याच वार्तिककाराने महाराष्ट्री, पैशाची इत्यादी प्राकृत भाषांचे व्याकरण सिद्ध करणारा 'प्राकृत प्रकाश' हा ग्रंथ लिहिला. कात्यायनासाठी या दोन भाषाप्रकारांमधील श्रेष्ठ कोण, कनिष्ठ कोण? कोणापासून कोण निघाला? हे प्रश्न नाहीत. प्राकृत भाषांपैकी महाराष्ट्रीचे व्याकरण सांगून इतर प्राकृत भाषांचे व्याकरण सांगताना, त्यांची त्यांची वैशिष्ट्ये विशद करून 'शेषं महाराष्ट्रिवत्' असा शेरा मारून तो विषय संपवून टाकतो. तसाच प्रकार त्याला संस्कृतचे व्याकरण सांगून झाल्यावर प्राकृत भाषांची वैशिष्ट्ये सांगून 'शेषं संस्कृतवत्' असे म्हणून करता आला असता; पण तो तसे करीत नाही, याचे कारण त्याला भाषांचा इतिहास ज्ञात असावा, हेच असावे. संस्कृत या भाषारूपामुळे होणारी जनसामान्यांची कोंडी फोडण्यासाठी बौद्धजैनादि धर्माचार्यांनी प्राकृतचा आश्रय करुणाबुद्धीने केला, हे त्यांचे उपकारच होत, यात शंका नाही. असे करताना त्यांनी गरजेप्रमाणे संस्कृतच्या अभिमान्यांना आव्हाने दिली, हेही योग्यच होते. याचे प्रमाण बौद्धांपेक्षा जैन धर्मियांमध्ये अधिक दिसून येते; पण तो वेगळा मुद्दा.
 
महाराष्ट्रात ही परंपरा संतांनी चालवली. संस्कृत काव्यात व म्हणून संस्कृत काव्यशास्त्रात अभावाने आढळणाऱ्या गोष्टी ज्ञानेश्वरांनी मराठीत करून दाखवल्या. एकनाथांनी तर 'संस्कृत भाषा देवे केली। प्राकृत काय चोरापासून आली?' असा भेदक प्रश्न उपस्थित करून, पंडितांना मोठाच धक्का दिला.
 
[[दासोपंत]] प्राकृताबद्दल लिहितात :
 
संस्कृत घटु म्हणती । आतां तयाचे भेद किती ? ।<br/>
कवणा घटाची प्राप्ति । पावावी तेणें ? ॥७३॥<br/>
हारा, डेरा, रांजणु । मुढा, पडगा, आनु ।<br/>
सुगड, लौली, सुजाणु । कैसी बोलैल ? ॥७४॥<br/>
घडी, घागरी, घडौली । अलंदे, बाचिकें, बौळी ।<br/>
चिटकी, मोरवा, पातली । सांजवणें तें ॥७५॥
 
== नाट्यशास्त्र आणि प्राकृत ==
भास व भरतमुनी यांच्या प्राचीन नाटकांतील सर्व महत्त्वाची पुरूषपुरुष पात्रे संस्कृत बोलतात, तर स्त्रिया, मुले व इतर सामान्यजन प्राकृतात बोलतात. नाट्यशास्त्रात कोणी कोणती भाषा बोलावी याबाबत नियम केलेले आहेत, आणि निरनिराळ्या लोकांसाठी निरनिराळ्या भाषा वापरल्या आहेत. जसे, नाटकातील स्त्रिया, मुले व विदूषक शौरसेनी बोलतात, बायका गाताना महाराष्ट्री भाषा वापरतात. सेवक वर्ग, कोळी व इतर सामान्यजन मागधी भाषा वापरतात तर राजे, अमात्य, विद्वान संस्कृतात बोलतात.
 
एक उदाहरण द्यायचे झाले तर शाकुंतलात शकुंतला आपल्या सख्यांशी प्राकृतात बोलते. राजा दुष्यंताशीही प्राकृतात बोलते परंतु दुष्यंत शकुंतलेशी संस्कृतात बोलतो.
Line २४ ⟶ ३७:
प्राकृताचा विचार करायचे झाल्यास प्राकृतातही नाटके, नैतिक, ऐतिहासिक काव्यसंग्रह लिहिले गेले. जैन धर्मातील साहित्य प्राकृतातच लिहिलेले आढळते. इसवी सनानंतर पंधराव्या शतकापासून प्राकृत साहित्याला उतरती कळा लागली. याचे कारण संस्कृत+प्राकृताच्या संगमातून आधुनिक भाषांचा उदय हे असू शकते.
 
[[संस्कृत भाषा]]->[[प्राकृत भाषा]]->[[भारतीय भाषा|आधुनिक भारतीय भाषा]]
 
[[वर्ग:भारतामधील भाषा]]
"https://mr.wikipedia.org/wiki/प्राकृत" पासून हुडकले