"भारत-पाकिस्तान दुसरे युद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[चित्र:India disputed areas map.svg|इवलेसे|भारताचे वादग्रस्त प्रदेश]]
'''भारत-पाकिस्तान दुसरे युद्ध''' हे [[भारत]] व [[पाकिस्तान]] या दोन देशांमध्ये [[इ.स. १९६५|१९६५]] सालीमध्ये झालेले दुसरे युद्ध होते.
 
==युद्धाची सुरुवात : पार्श्वभूमी==
इ.स. १९६०चे दशक जागतिक राजकीय पटलावर एक वेगळेच समीकरण मांडत होते. [[शीत युद्ध|शीतयुद्धा]]<nowiki/>ला रंग चढत होता. NATO च्या छत्राखाली [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] समर्थक देश व कम्युनिस्टांच्या लेबलखाली तत्कालीन USSR म्हणजे [[रशिया]]<nowiki/>चे समर्थक अशी कधी छुपी तर कधी उघड स्पर्धा सुरू होती. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळताच अमेरिकेने स्वतः मैत्रीचा हात पुढे करत भारतात अमेरिकन तळ मागावायचा प्रयत्‍न केला. भारताने ती विनंती फेटाळून लावल्यावर राजकीय दृष्टीने अमेरिकेच्या मनात भारताविषयी अढी निर्माण झाली ती पुढे कित्येक दशके वाढतच गेली. १९४७ नंतर [[जवाहरलाल नेहरू|नेहरूंच्या]] नेतृत्वाखालील सरकारची दिशा समाजवादी राज्यव्यवस्थेकडे झुकताना दिसू लागली. ही व्यवस्था ही भांडवलशाहीपेक्षा [[साम्यवाद|साम्यवादा]]<nowiki/>च्या जवळ जाते, त्यामुळे साम्यवादी जगताचे नेतृत्व करणार्‍या रशियाबद्दलचे आकर्षण भारतीय नेत्यांत, सत्तावर्तुळात जास्त होते. [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] त्यामुळे बर्‍याच प्रमाणात भारतापासून दुरावत चाललेला देश होता.