"संगीतातील घराणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ४:
घराणे म्हणजे त्यातील मुख्य कलावंताच्या मूळ गावाच्या नावापलीकडे फारसे काही नाही, असे एक मत आहे. आग्रा, ग्वाल्हेर, जयपूर इ. ख्यालगायकांच्या घराण्यांची नावे दिल्ली, बनारस, लखनौ, इ. तबलावादकांच्या घराण्यांची नावे किंवा ठुमरीगायकांतील लखनौ, बनारस इ. नावे पाहून हे मत स्वीकारणीय वाटले, तरी ते तितकेसे ग्राह्य नाही. त्याला दोन कारणे आहेत. एक तर गावाच्या नावावरून न ओळखली जाणारी घराण्यांची नावेही आढळतात. उदा., ख्यालगायनात गोखले घराणे धृपदगायनात डागर, नौहार वगैरे घराणी. याहूनही महत्त्वाचे कारण असे, की गावावरून घराण्याचे नाव ठरणे, ही या संकल्पनेच्या विकासातील केवळ एक अवस्था ठरते. कारण आज घराण्याची नावे घेताच बोध होतो, तो गायन-वादन पद्धती, पेशकारीच्या शैली यांमधील वैशिष्ट्ये आणि फरक यांचाच. ग्रामनामांवरून घराण्यांच्या ऐतिहासिक विकासावर प्रकाश पडला, तरी तात्त्विक चर्चेत त्यामुळे काही भर पडत नाही. तात्त्विक विचारासाठी घराण्यांचा स्वरूपविचार हाच मार्ग समोर राहतो.
घराण्यांविषयी आणखी एक मतही मांडले गेले आहे. एकोणिसाव्या शतकात राजाश्रय सुटल्यावर कलावंत मोठमोठ्या शहरांत येऊन स्थायिक झाले. सोयीसाठी त्यांच्या त्यांच्या ग्रामनामांनुसार त्यांना वेगळे ओळखण्यात येऊ लागले, तेव्हा घराण्यांचे वेड संगीतात नव्यानेच शिरले, असे म्हणण्यास हरकत नाही. ह्याच मताला आणखी एक वळसा देऊन असे म्हणण्यात येते, की मध्ययुगापासूनचा कलावंतांचा राजाश्रय सुटल्यावर कला अशिक्षित तसेच स्वार्थप्रेरित वा धंदेवाईक लोकांच्या हातांत जाऊन आपल्या हातचा मक्ता जाऊ नये, म्हणून घराण्याच्या कल्पनेला खतपाणी करण्यात आले.
|