"नामदेव" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Rockpeterson (चर्चा | योगदान) तोडफोड खूणपताका: उलटविले कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर ! |
||
ओळ १:
{{गल्लत|विष्णुदास नामा}}
[[चित्र:Saint Namdev, Maharashtra and Punjab 12 century.jpg|अल्ट=संत नामदेव|इवलेसे|संत नामदेव
{{हा लेख| संत ज्ञानेश्वर समकालीन संत नामदेव (नामदेव दामाशेटी रेळेकर) |नामदेव (निःसंदिग्धीकरण)}}
{{माहितीचौकट हिंदू संत|नाव=संत नामदेव|चित्र=|चित्र_रुंदी=|मूळ_पूर्ण_नाव=नामदेव दामा शेट्टी |जन्म_तिथी=शके ११९२ इ.स.१२७० |जन्म_स्थान=नरसी(ता.[[हिंगोली]] ) जि. [[हिंगोली]] [[महाराष्ट्र]]|संजीवन समाधी_दिनांक=|समाधी_स्थान=|समाधिमंदिर=[[पंढरपूर]] |उपास्यदैवत=|गुरू= विसोबा खेचर|पंथ= नाथ संप्रदाय, वारकरी,वैष्णव संप्रदाय|शिष्य=[[चोखामेळा]]|साहित्यरचना=शबदकीर्तन, अभंगगाथा, अभंग भक्ति कविता|भाषा= मराठी|कार्य=|पेशा= शिंपी, समाजजागृती|वडील_नाव=दामा शेट्टी|आई_नाव=गोणाई|पती_नाव=|पत्नी_नाव=|अपत्ये=|वचन=|संबंधित_तीर्थक्षेत्रे=|विशेष=|स्वाक्षरी_चित्र=|तळटिपा=}}
''' संत शिरोमणी नामदेव महाराज''' (जन्म : २६ ऑक्टोबर १२७०; संजीवन समाधी : ३ जुलै १३५०) हे [[महाराष्ट्र]]ातील [[वारकरी]] संतकवी होते. त्यांचे आडनाव [[रेळेकर]] असे होते. ते [[मराठी भाषा|मराठी भाषांमधील]] सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी [[व्रज]] भाषांमध्येही काव्ये रचली. [[शीख धर्म|शिखांच्या]] [[गुरू ग्रंथसाहिब]]ातले चरित्रकार, आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म [[पंजाब]]पर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. त्यामुळे [[पंजाबी]] मंडळी तसेच संबंधित मंडळी आज त्यांच्या जन्मस्थानाचा, [[नरसी (नामदेव)|नरसी नामदेव]] या गावाचा विकास करण्यासाठी धडपडत आहेत. [[नरसी (नामदेव)|नरसी नामदेव]] हे गांव महाराष्ट्रातील [[मराठवाडा|मराठवाड्यामधील]] [[हिंगोली]] जिल्ह्यातील असून तेथील संत नामदेव महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार २०१९ ला झाला.
भक्तशिरोमणी संत नामदेव हे [[संत ज्ञानेश्वर|संत ज्ञानेश्वरांच्या]] कालखंडात होऊन गेले .वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होत. आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती. संत नामदेव प्रत्यक्ष [[श्रीविठ्ठल|श्रीविठ्ठलाच्या]] निकटवर्ती असलेला सखा होता, असे मानले जाते. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी त्या बाबतीत भावनिक एकात्मता साधली. [[भागवत धर्म|भागवत धर्माची]] पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले.
[[दामाशेट्टी]] हे संत नामदेवांचे वडील व [[गोणाई]] त्यांची माता होती. दामाशेटींचा व्यवसाय कपडे शिवणे हा होता. म्हणजे ते [[शिंपी]] होते. यांच्या अगोदरच्या सातव्या पिढीतील पुरुष [[यदुशेट]] हे सात्त्विक प्रवृत्तीचे भगवद्भक्त होते. सध्याच्या [[हिंगोली]] जिल्ह्यातील [[नरसी (नामदेव)|नरसी-बामणी]] [[नरसी (नामदेव)|(नरसी नामदेव)]] हे संत नामदेवांचे जन्म गाव होय. नामदेवांचा जन्म प्रभव नाम संवत्सरात, शके ११९२ (इ.स.१२७०) मध्ये कार्तिक शुद्ध एकादशीस, रोहिणी नक्षत्रास, रविवारी झाला. संत नामदेवांना ८० वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांचे बालपण हे [[पंढरपूर|पंढरपुरात]] गेले. त्यांनी लहानपणापासूनच श्रीविठ्ठलाची अनन्यसाधारण भक्ती केली.
संत [[गोरा कुंभार]] यांच्याकडे, तेरढोकी येथे [[निवृत्तिनाथ|निवृत्तीनाथ]], [[ज्ञानेश्वर]] महाराज, [[सोपानदेव]], [[मुक्ताबाई]], संत नामदेव, [[चोखामेळा]], [[विसोबा खेचर]] आदी संतांचा मेळा जमला होता. याच प्रसंगी संत ज्ञानेश्वरांच्या विनंतीवरून गोरोबाकाकांनी उपस्थितांच्या आध्यात्मिक तयारीविषयी आपले मतप्रदर्शन केले होते. या प्रसंगानंतरच संत नामदेवांना विसोबा खेचर हे आध्यात्मिक गुरू म्हणून लाभले.
पत्नी राजाई, मोठी बहीण आऊबाई; नारा, विठा, गोंदा, महादा हे त्यांचे चार पुत्र व एक मुलगी लिंबाई असा संत नामदेवांचा परिवार होता. त्यांच्या कुटुंबात एकूण पंधरा माणसे होती. स्वतःला ‘नामयाची दासी’ असे म्हणणार्या संत जनाबाई या त्यांच्या परिवारातील एक सदस्य होत्या.
संत नामदेवाची अभंगगाथा (सुमारे २५०० अभंग) प्रसिद्ध आहे. त्यांनी शौरसेनी भाषेत काही अभंग रचना (सुमारे १२५ पदे) केली. त्यातील सुमारे बासष्ट अभंग (नामदेवजीकी मुखबानी) शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत. संत नामदेवांनी आदि, समाधी व तीर्थावळी किंवा तीर्थावली या गाथंतील तीन अध्यायांतून संत ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगितले आहे.
कीर्तनांत अनेक चांगल्या ग्रंथांचा उल्लेख असे. यावरून ते बहुश्रुत व अभ्यासू असल्याचे लक्षात येते. ‘नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग’- अशी त्यांची योग्यता होती. ’नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते.
भागवत धर्माचे एक आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे ५० वर्षे भागवतधर्माचा प्रचार केला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले. पंजाबमधील शीख बांधवांना ते आपले वाटतात. शीख बांधव ‘नामदेव बाबा’ म्हणून त्यांचे गुणगान गातात. पंजाबातील ‘शबदकीर्तन’ व महाराष्ट्रातील ‘वारकरी कीर्तन’ यांत विलक्षण साम्य आहे. घुमान (पंजाब) येथे शीख बांधवांनी त्यांचे मंदिर उभारले आहे. बहोरदास, लढ्विष्णुस्वामी, केशव कलाधारी हे त्यांचे पंजाबी शिष्य होत. राजस्थानातील शीख बांधवांनीही नामदेवाची मंदिरे उभारलेली आहेत. `संत शिरोमणी' असे यथार्थ संबोधन त्यांच्याबद्दल वापरले जाते.
भगवद्भक्तांच्या व साधु-संतांच्या चरण धुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी ‘पायरीचा दगड’ होण्यात त्यांनी धन्यता मानली. संत नामदेव हे आषाढ वद्य त्रयोदशी, शके १२७२ मध्ये (शनिवारी, दि. ३ जुलै, १३५० रोजी) [[पंढरपूर]] येथे पांडुरंगचरणी विलीन झाले. नक्की दिनांकाविषयी एकवाक्यता दिसून येत नाही. [[कालनिर्णय दिनदर्शिका|कालनिर्णय]] या दिनदर्शिकेत पुण्यतिथी दिनांक २४ जुलै असा दिलेला आढळतो. संत नामदेव हे कीर्तने करत करत भारतभर फिरले.
== नामदेवांसंबंधी आख्यायिका ==
|