"राजीव नाईक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ६:
 
अनाहत (१९८४), अखेरचं पर्व (१९९२) आणि जातक-नाटक (२०००,अमंचित) ही नाटकं सततची नाटकं ह्या संग्रहामध्ये एकत्रित प्रकाशित आहेत. ह्यानाटकांच्या अधेमधेही मी नाटकं लिहिली आहेत आणि तीदेखील आणखी दोन संग्रहांच्या रूपांत प्रकाशित होणार आहेत. त्यामुळे, हीच तीन नाटकं इथे एकत्रित का केली आहेत त्याचा थोडा खुलासा करावा आणि ज्या स्वरूप-वैशिष्ट्यांमुळे ती एका गटात पडतात त्याबद्दलही काही म्हणावं अशी श्री० श्री० पु० भागवत ह्यांनी सूचना केली.
 
ही तिन्ही नाटकं मिथक-आधारित आहेत. अनाहत ऋग्वेदातल्या तीन संवादांवर, अखेरचं पर्व महाभारतावर, तर जातक-नाटक दुर्गाबाई भागवतांनी"पैस "मधल्या 'आसन्नमरण काळी राणी' ह्या ललितलेखात ज्यांबद्दल लिहिलं आहे त्या अजिंठ्यातल्या दोन भित्तिचित्रांचा मूळ आधार असलेल्या जातक-कथांवर. 'मिथक-आधारित नाटक' असा शब्द वापरायचा तो 'पौराणिक नाटक' ह्या पठडीपासूनचा त्यांचा वेगळेपणा नोंदवण्यासाठी.
 
==राजीव नाईक यांची प्रकाशित पुस्तके==