"अंबाजोगाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ २१:
| तळटिपा =
}}
'''अंबेजोगाई''' किंवा अंबाजोगाई हे [[महाराष्ट्र]]ाच्या [[बीड जिल्हा|बीड जिल्ह्यातील]] एक तालुक्याचे ठिकाण आहे.<ref>"Census of India 2011 – Tahsil Profile" (PDF). Beed District Collectorate. Govt. of India. Archived from the original (PDF) on 3 October 2015. Retrieved 25 November 2014. </ref> <ref> https://beed.gov.in/ </ref> यास प्राचीन काळी अंबानगरी व जयवंती राजाच्या काळात जयवंतीनगर म्हणून ही ओळखले जाई. [[निजाम राजवट|निजामाच्या]] राज्यात या गावाचे नाव बदलून मोमिनाबाद असे ठेवले गेले होते.
 
गावाचे नाव, येथे अवतरित झालेल्या देवी [[पार्वती]]च्या (अंबाबाई) व तिचे येथेच माहेर असल्यामुळे (जोगाई) असे एकत्रित होऊन झालेले आहे. ही महाराष्ट्रातील ब-याच जणांची [[कुलदेवता]], कुलदेवी असून, ते येथे दर्शनासाठी येत असतात.
 
[[मराठी भाषा|मराठी भाषेचा]] भाषेचा उगम [[बीड जिल्हा|बीड जिल्ह्यातील]] अंबाजोगाई येथे झाला, याबाबत सर्व भाषातज्ञांचे एकमत आहे. त्यामुळे अंबाजोगाई हे ठिकाण मराठी भाषेची जननी म्हणून ओळखले जाते. मराठी भाषेचे आद्यकवी [[मुकुंदराज]] यांनी [[विवेकसिंधू]] या ग्रंथांची रचना याच ठिकाणी केल्यामुळे अंबाजोगाईला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://beed.gov.in/%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a4%af%e0%a5%80/|title=जिल्ह्याविषयी {{!}} जिल्हा बीड, महाराष्ट्र शासन {{!}} भारत|language=mr|access-date=2020-08-20}}</ref>
 
[[स्वामी रामानंद तीर्थ]] यांनी [[मराठवाडा]] मुक्तिसंग्राम लढ्याची सुरुवात देखील अंबाजोगाई येथे मराठी शाळा स्थापना करून केलेली आहे. तत्कालीन कुलगुरू डॉ. [[नागनाथ कोत्तापल्ले|नागनाथ कोतापल्ले]] यांच्या समितीने भाषा विद्यापीठ अंबाजोगाई येथे स्थापन करावे याबाबतचा अभ्यासपूर्ण अहवाल शासनास सादर केलेला आहे. जागतिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वेळोवेळी याबाबतचे ठराव झाले आहेत, असे असताना शासनाने मराठी भाषेचे पहिले अभिमत विद्यापीठ [[मुंबई]] येथे सुरू करण्याचा निर्णय घेणे चुकीचे आणि अन्यायकारक आहे. त्यामुळे अंबाजोगाई येथे मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना करण्याची आग्रही मागणी [[राष्ट्रवादी कॉंग्रेस]] पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आ.अमरसिंह पंडित यांनी केली.