"सांगली" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
छो →इतिहास |
||
ओळ ७२:
== इतिहास ==
प्राचीन इतिहास असलेल्या सांगली जिल्ह्याने मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, यादव, बहामनी व मराठी आदी सत्तांचा उत्कर्ष व ऱ्हास अनुभवला. पेशवाईच्या काळात सांगली हे स्वतंत्र संस्थान होते. या संस्थानांवर पटवर्धन घराण्याची सत्ता होती. मिरज हेदेखील संस्थान होते. स्वातंत्र्यपूर्व काळात सविनय कायदेभंगाच्या चळवळीत जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील बिळाशी येथे मोठा सत्याग्रह झाला होता. गोरक्षनाथ महाराजांनी ( नवनाथांतले दुसरे नाथ) शिराळ्यामध्ये ३२ शिराळा येथे सुरू केलेला नागपंचमीचा उत्सव जगप्रसिद्ध आहे.मिरज येथील तंतुवाद्ये अतिशय प्रसिद्ध असून येथील वाद्ये जगभर पाठविली जातात
*
सांगली शहराचा इतिहास हा पटवर्धन या पेशव्यांच्या सरदारांच्या मिरजेतील जहागिरी मध्ये झालेल्या वाटणी नंतर सुरु होतो असे मानले जाते, परंतु त्यापूर्वीही सांगली या गावाचे अस्तित्व होते. तशा खुणा सांगलीतील गावभागात बघण्यास मिळतात. सांगली शहराचा व्यापारीदृष्ट्या विकास सन १९२९ साली [[आयर्विन]] पूलाच्या उभारणीनंतर सुरु झाला. आयर्विन पुलाला शंभरहून अधिक वर्षे पूर्ण झाली आहेत.
|