"अधिकमास" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
No edit summary |
||
ओळ ९:
अंधुक महिन्याचे संदर्भ वैदिक साहित्यात आढळतात. लोकमान्य टिळक यांनी ओरायन या ग्रंथात अधिक मासाबद्दल नोंदविले आहे. वैदिक आर्यानी यज्ञसंस्था विकसित केली. यज्ञातील यागांचे नियोजन त्यांनी सूर्याच्या गतीवर आधारित ठरविले होते. सौर कालगणना वेदकाळात अस्तित्वात होती आणि चंद्र कालगणना ही अस्तित्वात होती. वैदिक ऋषीनाही लक्षात आले की चांद्र आणि सौर कालगणना यांचा एकमेकांशी मेळ जुळण्यासाठी काही दिवसांचा फरक पडत होता. हे अंतर भरून काढण्यासाठी काही दिवस अधिक घ्यावे लागले. वैदिक काळातच हे अंतर भरून काढण्यासाठी दर ३ वर्षांनी कालगणनेमध्ये ३० दिवस अधिक घेतले गेले. हाच तो अधिक मास होय.<ref name=":2">{{स्रोत पुस्तक|title=भारतीय संस्कृती कोश खंड १|last=जोशी, होडारकर|first=महादेवशास्त्री, पद्मजा|publisher=भारतीय संस्कृतिकोष मंडळ|year=मार्च २०१० (पुनर्मुद्रण)|isbn=|location=पुणे|pages=१३७-१३८}}</ref>
==धार्मिक
या मासात मंगल कार्ये, काम्य व्रते इत्यादींचा त्याग करतात. त्यामुळे या मासास इहलोकात अनेक निर्भत्सनांना सामोरे जावे लागले. त्यामुळे व्यथित होऊन तो मास वैकुंठात विष्णूकडे गाऱ्हाणे घेऊन गेला. विष्णूने त्यास गोकुळात [[श्रीकृष्ण|कृष्णाकडे]] पाठविले. तो कृष्णास शरण गेला. कृष्णाने त्या मासाचे नाव बदलून 'पुरुषोत्तम मास' असे ठेविले अशी कथा प्रचलित आहे. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=fmtxAwAAQBAJ&newbks=0&printsec=frontcover&pg=PA393&dq=religious+importance+of+adhik+maas&hl=en|title=Hindu Dharma-A Teaching Guide|last=Kapur|first=Kamlesh|date=2013-08|publisher=Xlibris Corporation|isbn=978-1-4836-4557-5|language=en}}</ref>या मासात जे श्रद्धाभक्तियुक्त राहून उपासना, कर्मे, व्रते व दाने करतील त्यांना पुण्य मिळेल असेही त्यास वचन दिले.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=kWqPwWpkhg0C&pg=PA288&dq=importance+of+purushottam+maas&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjkr8vBhZTbAhXHo48KHQjUBqIQ6AEIJDAA|title=Yatra 2 Yatra|date=2009|publisher=Yatra2Yatra|language=en}}</ref><ref name=":0" />
अधिक मास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. या विशिष्ट महिन्यात [[विष्णू]] देवतेच्या उपासनेला विशेष
अधिक महिन्यात विविध मंगल कृत्ये करू नयेत असा संकेत रूढ आहे, त्यामुळे या महिन्यात विवाह, मुंज, बारसे असे संस्कार केले जात नाहीत. तसेच नव्या वस्तूंची खरेदी अथवा नव्या कपड्यांची खरेदी अशा गोष्टी न करण्याची परंपरा समाजात रूढ आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=JFpZDwAAQBAJ&newbks=0&printsec=frontcover&pg=PT8&dq=%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95+%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8+%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF&hl=en|title=SARV VIPRA MARTAND|date=2018-05-01|publisher=VIMLESH SHARMA|language=hi}}</ref>
अधिक मासात भारतभरात विष्णूच्या विविध
==खगोलशास्त्रीय महत्त्व==
ओळ ३३:
चांद्र वर्ष आणि सूर्य(सायन) वर्ष यांच्यात मेळ घालण्याच्या उद्देशाने, पंचांगकर्त्यांनी कालगणनेसाठी जरी चंद्राचे भ्रमण प्रमाण मानले तरी महिन्यांची नावे मात्र सूर्याच्या भ्रमणाप्रमाणे ठेवली. <ref name=":1" />म्हणजे मीनेत सूर्य असताना जेव्हा अमावास्या येऊन संपेल तेव्हा चैत्र महिन्याला सुरुवात होईल. मेषेत सूर्य असताना आलेल्या अमावास्येनंतर वैशाख सुरू होतो, वगैरे. सूर्य एका राशीत साधारणपणे एक महिना राहतो. साधारण १४ ते १७ तारखेला तो रास बदलतो. एका अमावास्येला सूर्य ज्या राशीत असतो, त्याच्या पुढच्या राशीत तो नंतरच्या अमावास्येला असतो. मात्र साधारण तीन वर्षांनी एक अशी अवस्था येते की एका अमावास्येला सूर्य ज्या राशीत असेल त्याच राशीत तो पुढच्या अमावस्येलाही असतो. नियमाप्रमाणे सूर्य अमावास्येला ज्या राशीत असेल त्या राशीप्रमाणे त्या महिन्याला नाव दिले जाते. पण दोन लागोपाठच्या अमावास्यांना सूर्य एकाच राशीत असेल तर, म्हणजे सूर्य रासच बदलत नसेल तर तर त्या दुसऱ्या अमावास्येनंतर सुरू होणाऱ्या महिन्याला नाव काय द्यायचे? अशा वेळी नाव 'रिपीट' करण्यात येते.
मेषेत सूर्य असताना येणाऱ्या अमावास्येनंतर वैशाख महिना
ज्या चांद्र महिन्यात सूर्याचे एका राशीतून पुढच्या राशीत संक्रमण होत नाही, तो महिना अधिक महिना मानतात आणि त्यानंतरचा निज महिना. याच नियमाने ज्या चांद्र महिन्यात सूर्य दोन राशींनी पुढे सरकतो, त्या महिन्याला क्षयमास म्हणतात.
|