"जयद्रथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
आशय जोडला आहे. खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ६:
अशा प्रकारे पांडवांकडून अपमानित झालेल्या जयद्रथाने खूप तप केले व भगवान शंकरांकडून पांडवांच्यावर विजय मिळावा असा वर मागितला. शंकराने अर्जुनाच्या अनुपस्थितीत कोणताही पांडव तुला हरवू शकणार नाही असा वर दिला. त्यामुळेच अर्जुनाच्या अनुपस्थितीत चक्रव्यूह भेदायला अभिमन्यूबरोबर गेलेले पांडव जयद्रथाला हरवू शकले नाहीत, आणि शेवटी अभिमन्यू मारला गेला. त्याच्या प्रेताला जयद्रथाने लाथ मारली. हे समजल्यावर बाहेरून परत आलेल्या अर्जुनाने पुढच्या सूर्यास्ताच्या आत जयद्रथाला मारीन अशी प्रतिज्ञा केली. आणि आकाशात आलेल्या ढगांमुळे सूर्यास्त झाला असे समजून बाहेर पडलेल्या जयद्रथाला मारून अर्जुनाने ती प्रतिज्ञा पार पाडली.
जयद्रथाला त्याच्या पित्याने (वृद्धक्षत्राने) असा वर दिला होता की जो त्याचे मस्तक जमिनीवर पाडेल त्या पाडणाऱ्याच्या डोक्याचे शेकडो तुकडे होतील. श्रीकृष्णाने अर्जुनाला याबाबतीत इशारा दिला होता. अर्जुनाने जयद्रथाला बाण मारून त्याचे शिर असे उडवले की ते थेट शेकडो मैल दूर बसलेल्या जयद्रथाच्या वडिलांच्या मांडीवर पडले. वडील दचकून उभे राहिले आणि त्यांच्या मांडीवरले जयद्रथाचे मस्तक जमिनीवर घरंगळले. त्याक्षणी वडलांच्या डोक्याची शंभरावर शकले होऊन त्यांचा मृत्यू झाला. जयद्रथासमोर ‘हा सूर्य, हा जयद्रथ’ हे श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हणलेले वाक्य मराठी भाषेत म्हण स्वरूपात प्रचलित आहे.
==जयद्रथ वध (काव्य)==
|