"हंबीरराव मोहिते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २१:
 
==शंभूराजे च्या पाठीशी खम्बीर मामा हम्बीर==
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनन्तर संभाजी राजेंना छत्रपतीपदावर न बसविता राजाराम महाराजांचे मंचकारोहण केल्याची बातमी कळताच सम्भाजीसंभाजी राजांनी आपल्या सर्व किल्लेदार व अधिकारांना आपल्या पायाशी रुजू होण्याचे आदेश सोडले. हे आज्ञापत्र सरसेनापती हंबीररावांनाही मिळाले होते. हंबीररावांनी सम्भाजीसंभाजी राजांचीच सेवा करण्याचा निर्णय घेतला.
 
सम्भाजीसंभाजी राजेंच्या राज्याभिषेकानन्तर त्यांच्या आदेशानुसार विविध आघाड्यांवर हम्बीररावांनीहंबीररावांनी आपला पराक्रम गाजवला त्यापैकी बऱ्हाणपूरच्या विजयात त्यांनी मिळवलेली प्रचण्ड लूट महत्त्वाची आहे. या विजयाने मोगलांची नाचक्की झाली. त्यानन्तर मोगल सरदार शहाबुद्दीनखान उर्फ़ गाजीउद्दीखान बहादुर याच्यावरील हंबीररावांची स्वारी महत्त्वाची आहे. खान रामसेज किल्ल्याला वेढा देऊन होता, त्यावेळी हंबीररावांनी त्याच्यावर हल्ला करून पराक्रम गाजवला. या वेढ्यात हंबीरराव जखमी झाले होते. यानन्तर पुढे सम्भाजीसंभाजी राजांच्या आदेशानुसार भीमा नदीच्या परिसरातून मोगल सरदार कुलीचखान व पन्हाळा परिसरातून शहाजादा आज्जमला पिटाळून लावण्यासाठी हंबीररावांनी शर्थीचा यशस्वी प्रयत्‍न केला. त्यानन्तर कल्याणजवळ रहुल्लाखान व बहाद्दुरखानाचा पराभव केला. सन १६८८ मध्ये रायगडाजवळ हंबीररावांनी गाजीउद्दीन खानाबरोबर दोन हात केले या लढाईत मराठ्यांचे मोठे नुकसान झाले. यानन्तरच्या कालखण्डात खुद्द सम्भाजीराजेंच्या बरोबर अनेक मोहिमेत हंबीररावांचा मोठा सहभाग होता. सरसेनापती हंबीररावांची शेवटची लढाई झाली ती वाईजवळ केंजळगडच्या पायथ्याशी झाली. या युद्धात मोगल सरदार सर्जाखानाचा पराभव झाला परन्तु किल्लेदार पिलाजी गोळे अन इतर मावळ्यांना (तंबूत नियोजन सुरू असताना) त्यांच्यावर जाणारा तोच तोफेचा गोळा स्वतःच्या अंगावर झेलून ,लागून ते धारातीर्थी पडले.
 
या हंबीरराव मोहिते यांची समाधी [[कऱ्हाड]] तालुक्यातील तळबीड (जिल्हा सातारा) येथे आहे.
ओळ २९:
== केतकर ज्ञानकोशातील माहिती==
 
त्यांचें मूळ नांव हंसाजी मोहिते असे असून इसवी सन १६७४ पावेतों हे छत्रपती शिवाजी महाराजाच्या सैन्यांत पांच हजार फौजेवरील एक सरदार होते. परन्तुपरंतु त्या वर्षी विजापूरच्या सैन्यावर शिवाजी महाराजाचे मुख्य सेनापति प्रतापराव गुजर तुटून पडले असतां त्यांच्या प्राणास मुकून त्याची फौज फुटली. तेव्हां त्याने पाठलाग करणाऱ्या शत्रूच्या सैन्यावर हल्ला करून मोगलांचा पराभव केला म्हणून शिवाजीने त्यावर खूश होऊन यांस 'हम्बीररावहंबीरराव' असा किताब दिला; व प्रतापरावाच्या जागीं यास सेनापति नेमलें. १६७५ सालीं हंबीररावानें बऱ्हाणपुरावरून थेट माहूरपर्यन्तमाहूरपर्यंत मोंगलांचा मुलूख लुटला, व भडोच जिल्ह्यातून खण्डणीखंडणी गोळा करून सर्व पैका रायगडास सुरक्षित आणला. पावसाळा सम्पल्यावरसंपल्यावर तो पुन्हां मोंगलांच्या मुलुखांत शिरला व त्याचें बरेंच नुकसान केलें. पुढच्या वर्षी यादगिरीजवळ हुसेनखान मायणाचा पराभव केला व पुष्कळ लूट मिळविली. इ.स . १६७८ मध्यें छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकांतून महाराष्ट्रांत परत आले तेव्हां त्यांनी हंबीररावास व्यंकोजीजवळ ठेविलें होतें. तेथें त्याची व व्यंकोजीची एक लढाई झाली होती. शिवाजी व व्यंकोजी यांच्यामध्ये तडजोड झाल्यावर हंबीरराव मोठ्या त्वरेनें महाराष्ट्रांत यावयास निघाला. मार्गात त्यानें कृष्णा व तुंगभद्रा यांच्या दुआबांत विजापूरच्या सैन्याचा पराभव केला, व सर्व दुआब प्रान्तप्रांत आक्रमण करून कित्येक बण्डखोरबंडखोर देशमुखांस वठणीस आणलें (१६७८). इ. स. १६७९ त शिवाजीनें मोंगलांकडे पळून गेलेल्या सम्भाजीचासंभाजीचा पाठलाग करण्याकरितां याची रवानगी केली. परन्तु सम्भाजीसंभाजी दिलेरखानाच्या छावणींत पोंचल्याचें कळल्यावर यास विजापुराकडे मोंगलाविरुद्ध आदिलशहाच्या कुमकेस पाठविलें. कांहीं दिवसांनीं हंबीररावानें मोंगल रणमस्तखान याला गाठून त्याचा पराभव केला. यानन्तरयानंतर हंबीरराव विजापुरास आला, व वेढा देऊन बसलेल्या दिलेरखानाच्या सैन्याभोंवतीं घिरट्या घालून त्यानें मोंगलांच्या सैन्यांत अन्नाची इतकी टंचाई पाडली कीं, पावसाळा सम्पल्याबरोबरसंपल्याबरोबर दिलेरखाननें विजापूरचा वेढा उठविला (१६७९). पुढें बऱ्हाणपुरावर हल्ला करून (१६८०) कोल्हापुराजवळ सुलतान शहाअलम याचा हंबीररावानें पराभव केला (१६८०). इसवीइ. स. १६८४ मध्यें औरंगजेबानें आपली छावणी अहमदनगरास आणल्यामुळें खानदेश प्रान्तप्रांत मोकळा पडला आहे असें, पाहून हम्बीररावहंबीरराव अचानक वऱ्हाणपुरासबऱ्हाणपुरास गेला, व त्या शहरीं कित्येक दिवसपर्यंत खण्डणीखंडणी गोळा करून तो मिळविलेल्या खण्डणीसहखंडणीसह त्वरेनें परत आला. परत येत असतां वाटेंत त्यानें बऱ्हाणपूरपासून नाशिकपर्यन्तनाशिकपर्यंत मार्गांतील सर्व प्रान्तांतप्रांतात चौथ-सरदेशमुखी वसूल केली. इ. स. १६८७ मध्यें हंबीरराव व मोंगलांना सरदार सरझाखान यांची वाईजवळ लढाई होऊन तीतत्या  लढाईत मोंगलांचा पराभव झाला. परन्तुपरंतु या लर्ढाईंतलढाईत हंबीरराव घायाळ होऊन मरण पावला. (जेधे शकावली, मराठा रियासत भा. १; ग्रँट डफ.) - केतकर ज्ञानकोशातील माहिती प्रा. डाॅ. बाळकृष्ण माळी इतिहास विभाग, दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर.
- केतकर ज्ञानकोशातील माहिती प्रा.डाॅ. बाळकृष्ण माळी इतिहास विभाग, दयानन्द कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर.
 
==हम्बीररावांविषयी पुस्तके==
Line ३७ ⟶ ३६:
 
==चित्रपट==
* सरसेनापती हंबीरराव मोहिते (दिग्दर्शक - प्रवीण तरडे). स्वराज्याच्या निर्मिती आणि जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान असलेल्या सरसेनापती हम्बीररावहंबीरराव मोहिते यांचे कार्य लवकरच २०२० साली रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. पुण्यात शिवजयन्तीच्याशिवजयंतीच्या निमित्त निघालेल्या भव्य मिरवणूक सोहळ्यात लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाची घोषणा केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://infomarathi.in/full-information-of-hambirrao-mohite/|title=आरं!!! ज्‍याची तरवार खंबीर त्यो ह्यो हंबीर...वाचा InfoMarathi » Info Marathi|दिनांक=2019-02-24|संकेतस्थळ=Info Marathi|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2019-08-11}}</ref>
 
== हेसुद्धा पहा ==