"मराठवाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १३:
}}
 
'''मराठवाडा''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचा]] [[गोदावरी]] नदीच्या खोऱ्यात आणि आसपास वसलेला एक प्रदेश असून त्यात आठ जिल्ह्यांचा समावेश होतो. [[औरंगाबाद|औरंगाबाद शहर]] हे ह्या विभागाचे मुख्यालय आहे. महाराष्ट्रातली १६.८४ टक्के लोकसंख्या या प्रदेशात राहाते. त्यापैकी तीस टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. प्रदेशाचा तीस टक्के भाग पर्जन्यछायेत येतो.<ref name="मराठवाडा">[http://www.rediff.com/election/2004/oct/06maha1.htm], मराठवाडा उपप्रांतावरचा इंग्रजी लेख.</ref> कोरडवाहू शेतीचे प्रमाण नव्वद टक्क्यांवर आहे. तीचकोरडवाहू शेतीच लोकांच्या निर्वाहाचा प्रमुख स्रोत आहे. औरंगाबाद, नांदेड आणि लातूर ही विभागातली उद्योग, शिक्षण आणि पर्यटनाची मुख्य केंद्रे आहेत. [[पैठण]]चे सातवाहन ते [[देवगिरीचे यादव]] हा ऐतिहासिक काळ '''मराठवाडा''' विभागाच्या राजकीय उत्कर्षाचा काळ होता. मराठवाड्यास संतांची भूमी म्हटले जाते.
 
==इतिहास==
ओळ २०:
इसवी सन १४०० पूर्वी हजारो वर्षे मराठवाड्यावर [[सातवाहन]],[[चालुक्य]],[[यादव]] या सारख्या मातब्बर मराठेशाहीतील मराठी लोकांचे राज्य होते हे पद्धतशीर लपवले जाते आणि नंतर चार शतके मुस्लिम राजवटीखाली मराठवाडा मुस्लिम राजवटीखाली आणि [[निजाम|निजामाच्या]] [[हैदराबाद]] संस्थानाचा भाग होता. निजामाने मराठवाड्यावर [[हैदराबाद संस्थान]] भारतात विलीन होईपर्यंत ब्रिटिशांचे मांडलिक राहून राज्य केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://marathivishwakosh.in/khandas/khand12/index.php?option=com_content&view=article&id=10390|title=मराठवाडा|प्रकाशक=महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई|भाषा=मराठी|ॲक्सेसदिनांक=३१ जुलै २०१४}}</ref> भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात बरोबरीनेच [[हैदराबाद मुक्तिसंग्राम]] लढला गेला.१७ सप्टेंबर ला मराठवाड्याला हैदराबाद संस्थानातून स्वातंत्र्य मिळाले. १ नोव्हेंबर १९५६ पासून मराठवाडा विभाग [[मुंबई]] राज्यास जोडण्यात आला. १ मे १९६० पासून मराठवाडा हा नवीन [[महाराष्ट्र]] राज्याचा भाग झाला. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.bbc.com/marathi/india-49444233|title=विधानसभा निवडणूक 2019: महाराष्ट्र विधानसभेची पहिली निवडणूक आणि तीन मुख्यमंत्री}} </ref>
 
स्वातन्त्र्योत्तर काळात [[कॉंग्रेस]]चे नेते, [[शंकरराव चव्हाण]] यांचे प्रदीर्घ काळ मराठवाडा भागावर राजकीय प्रभुत्व होते. ते आधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले व नंतर त्यांनी भारतीय संघराज्याचे [[गृहमंत्री]],[[अर्थमंत्री]] ईत्यादी केन्द्रीय मंत्रिपदेही सांभाळली. त्यांचा महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्रांचा गाढा अभ्यास होता. विकास क्षेत्रातील.[[पैठण]]चा [[जायकवाडी धरण|जायकवाडी]] जलसिंचन प्रकल्प हे त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.
 
==भौगोलिक स्थान==
===मुख्य शहरे===
* [[औरंगाबाद]] : ही मराठवाड्याची राजधानी व प्रमुख औद्योगिक शहर आहे. हे शहर ऐतिहासिक वास्तु, लेणी इत्यादींसाठी प्रसिद्ध आहे. औरंगाबाद येथून मुंबई-दिल्ली औद्योगिक मार्गिका जात आहे. याच जिल्ह्यात बिबी का मकबरा, अजिंठा - वेरूळ लेण्या,[[दौलताबाद किल्ला]] आणि [[जायकवाडी धरण ]]आहे. पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळे या जिल्ह्यात आहेत. येथेच औरंगाबाद प्रशासकीय विभागाचे मुख्यालय आहे. या जिल्ह्याच्या दक्षिणेकडून [[गोदावरी]] ही नदी वाहते.
* [[उस्मानाबाद]] : या शहरापासून जवळच धाराशिव लेणी आहेत. या शहराजवळून भोगावती नदी वाहते . याच जिल्ह्यात तुळजापूर येथे[[तुळजभवानी माता मंदिर]] आहे. अनेक धार्मिक पर्यटन स्थळे या जिल्ह्यात आहेत.
* [[जालना]] : जालना शहर मराठवाड्यातील एक महत्त्वाची बाजारपेठ व औद्योगिक केंद्र आहे. या शहराला बियाणांची राजधानी असे म्हणतात. इथे स्टील उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. याच जिल्ह्यात [[भोकरदन]] हे प्राचीन शहर वसलेले आहे.
* [[नांदेड]] : ह्या शहराला मराठवाड्याची उपराजधानी म्हणून ओळखले जाते. हे शहर गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. नांदेड येथे सचखंड गुरुद्वारा आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री [[शंकरराव चव्हाण]] इथलेच आहेत.
* [[परभणी]] : परभणी येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे. परभणी जंक्शन हे मराठवाड्यातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे.
* [[बीड]] : बीडला पांडवकाळात [[दुर्गावतीनगर]] म्हणत असत. पुढे चालुक्यकालीन चंपावती राणीच्या नावावरून देण्यात आलेले '[[चंपावतीनगर]]' हे या शहराचे दुसरे नाव आहे. कंकालेश्वर हे बीड मधील ऐतिहासिक पुरातन भगवान शंकराचे मंदिर आहे. हे चारही बाजूने पाण्याने वेढलेले आहे. मंदिराचे दगडी बांधकाम आहे.
* [[लातूर]] : लातूर हे मराठवाड्यातील प्रमुख शैक्षणिक केंद्र आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणप्रणालीमुळे शिक्षण क्षेत्रात लातूर आकृतिबंध (पॅटर्न) निर्माण झाला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री [[विलासराव देशमुख]] इथलेच आहेत.
* [[हिंगोली]] : हिंगोली शहर कयाधू नदीच्या काठावर वसले आहे. हिंगोली येथील दसरा महोत्सव प्रसिद्ध आहे. [[औंढा नागनाथ ]]हे महादेवाचे प्रसिध्द मंदिर याच जिल्ह्यात आहे.
 
===महत्त्वाची ठिकाणे===
ओळ ४७:
गोदावरी ही मराठवाड्यातील मुख्य नदी आहे. पूर्णा, पैनगंगा, सीना, शिवणा, मांजरा, दुधना या विभागातील इतर महत्त्वाच्या नद्या आहेत.
 
'''गोदावरी :''' मराठवाड्यातून [[गोदावरी नदी|गोदावरी]] ही प्रमुख नदी वाहते. काही अन्तरापर्यन्तअंतरापर्यंत तिने औरंगाबाद बीड, जालना व परभणी, बीड व जालना अशा जिल्हा सीमा निश्चित केल्या आहेत. गोदावरीची वाहण्याची दिशा साधारणपणे वायव्येकडून आग्नेयेकडे आहे. बीड जिल्ह्यातील सिन्धफणा, वाण, सरस्वती, या गोदावरीच्या उपनद्या आहेत.
 
[[मांजरा नदी|'''मांजरा :''']] : पाटोदा तालुक्यातील बालाघाटच्या डोंगराळ भागात उगम पावणारी मांजरा नदी सुरुवातीस उत्तर - दक्षिण - असा प्रवास करून जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी वाहत जाऊन पुढे लातूर जिल्ह्यात प्रवेशते. तिचा बराचसा प्रवास गोदावरीला काहीसा समान्तरसमांतर असा होतो. बर्‍याच ठिकाणी या नदीने अहमदनगर-बीड, उस्मानाबाद-बीड व लातूर-बीड या जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमेचे कार्य केले आहे. उगमापासून सुमारे ६१६ किलोमीटर प्रवास करून ही नदी पुढे नान्देडनांदेड जिल्ह्यात कुण्डलवाडी गावाजवळ गोदावरीस मिळते. सिन्धफणा नदी पाटोदा तालुक्यात चिंचोली टेकड्यात उगम पावते. प्रथम उत्तरेकडे, नन्तर पूर्वेकडे व तदनन्तरतदनंतर पुन्हा उत्तरेकडे, किम्बहुना ईशान्येकडे प्रवास करीत माजलगाव तालुक्यात मंजरथजवळ गोदावरीस मिळते. बीड तालुक्यातील डोंगराळ परिसरात उगम पावणारी बिन्दुसरा नदी बीड शहरातून वाहत जाऊन पुढे सिन्धफणा नदीस मिळते. कुण्डलिका ही सिन्धफणेची आणखी एक उपनदी जिल्ह्यातच उगम पावून जिल्ह्यातच सिन्धफणा नदीस मिळते.
 
[[सिना]] : जिल्ह्याच्या व आष्टी तालुक्याच्याही नैर्ऋत्य सीमेवरून सीना नदी वाहते. काही अन्तरापर्यतअंतरापर्यंत तिने अहमदनगर व बीड जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमा म्हणून काम केले आहे. त्याच वेळी तिने अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुका व बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका यांची सीमारेषाही स्पष्ट केली आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://encyclopedia.balaee.com/Admin/Content.aspx?title=%u092c%u0940%u0921%20&lang=mr|title=बीड|दिनांक=१७ ऑगस्ट, इ.स. २०१२|प्रकाशक=|भाषा=मराठी|ॲक्सेसदिनांक=१७ ऑगस्ट, इ.स. २०१२}}{{मृत दुवा}}.</ref>
 
<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://encyclopedia.balaee.com/Admin/Content.aspx?title=%u092c%u0940%u0921%20&lang=mr|title=बीड|दिनांक=१७ ऑगस्ट, इ.स. २०१२|प्रकाशक=|भाषा=मराठी|ॲक्सेसदिनांक=१७ ऑगस्ट, इ.स. २०१२}}{{मृत दुवा}}.</ref>
[[कयाधू ]] : नदी हिंगोली जिल्ह्याच्या उत्तर-पूर्व सीमेवरून वाहताना [[वाशीम]] आणि [[यवतमाळ]] जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा बनते.
 
==प्रशासन==
ओळ ७१:
 
==अर्थव्यवस्था==
शेती हाच मराठवाड्यातल्या लोकांच्या निर्वाहाचा प्रमुख स्रोत आहे. तान्दुळतांदुळ, डाळी, तेलबिया आणि कापूस यावर आधारित प्रक्रिया उद्योग मराठवाड्यात विखुरलेले आहेत. [[औरंगाबाद]], [[लातूर]], [[जालना]] आणि [[नांदेड]] शहरांच्या परिसरात उद्योगीकरण झाले आहे. धातू, प्लॅस्टिक, वाहने आणि पेये या क्षेत्रांतील अनेक कारखाने इ. स. १९८० नंतर मराठवाड्यात वाढले. जालना हा जिल्हा बियाणे केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे.
 
==समाजरचना आणि लोकजीवन==
ओळ ८३:
 
====[[स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ]] ====
[[नांदेड]] येथे मुख्यालय असलेल्या या [[विद्यापीठ अनुदान आयोग]] (यूजीसी) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापना १७ सप्टेम्बरसप्टेंबर १९९४ रोजी झाली. निजामाच्या राजवटीतून विभाग मुक्त करण्यासाठी विसाव्या शतकाच्या मध्यापर्यन्त चाललेल्या लढ्याचे अग्रणी [[स्वामी रामानंद तीर्थ]] यांचे नाव या विद्यापीठाला देण्यात आले आहे.<ref name="SRT">[http://srtmun.ac.in/Aboutsrtmun.aspx स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे] संकेतस्थळ.</ref> प्रदेशातील [[नांदेड]], [[हिंगोली]], [[परभणी]] आणि [[लातूर]] या चार जिल्ह्यांतली महाविद्यालये हे या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. [[लातूर]] येथे विद्यापीठाचे उपकेंद्र आहे.
 
====[[वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ]] ====
१९५६ मध्ये राज्य पुनर्रचनेच्या काही काळ आधी तत्कालीन हैदराबाद राज्यात असलेल्या परभणी येथे कृषी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली होती. त्याचाच पुढे विस्तार करून १८ मे १९७२ रोजी परभणीत मराठवाडा विभागातील कृषी क्षेत्राच्‍या विशेष गरजा व लोकभावना लक्षात घेऊन मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना झाली. हरित क्रांतीचेहरितक्रांतीचे प्रणेते [[वसंतराव नाईक]] यांच्‍या जन्‍मशताब्‍दी वर्षानिमित्त राज्‍यातील कृषी क्षेत्रातील त्‍यांच्‍या अतुलनीय योगदानाबद्दल १ जुलै २०१३ रोजी विद्यापीठाचा नामविस्‍तार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असा करण्‍यात आला.
 
शिक्षण – १९५६ साली परभणी येथे कृषी महाविद्यालयाच्‍या स्‍थापनेने सुरुवात होऊन आज विद्यापीठांतर्गत १२ घटक व ४३ संलग्‍न महाविद्यालये आहेत. तसेच ९ घटक व २० कृषि तन्त्र विद्यालये, ३३ संलग्‍न कृषितंत्र निकेतने आहेत. याद्वारे विद्यार्थ्‍यांना कृषिविषयक शिक्षण मिळते. विद्यापीठामध्‍ये कृषी, उद्यानविद्या, कृषी व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन, कृषी अभियांत्रिकी, गृहविज्ञान, अन्‍नतंत्रज्ञान यात दोन वर्षाचा पदव्‍युत्तर, तर आचार्य पदवी कार्यक्रम हा कृषी शाखेच्‍या नऊ विषयांत, अन्‍नतंत्रज्ञान शाखेतील पाच विषयांत, कृषी अभियांत्रिकी शाखेतील चार विषयांत व गृह विज्ञान शाखेत एका विषयात राबविण्‍यात येतो.
ओळ ९४:
विस्‍तार शिक्षण - विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्‍याचे कार्य विस्‍तार शिक्षण गट (१), कृषी तन्त्रज्ञान माहिती केंद्र (१), विभागीय कृषी विस्‍तार केंद्र (४) तसेच ३ घटक व ८ अशासकीय कृषी विज्ञान केंद्राद्वारे केले जाते. विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्‍या शेतापर्यंत जलदगतीने व प्रभावीपणे पोहोचण्‍यासाठी विद्यापीठ विविध नाविन्यपूर्ण विस्‍तार शिक्षण उपक्रम नियमित राबवीत असते.
 
दरवर्षी १८ मे रोजी खरीप पीक मेळावा (विद्यापीठ वर्धापनदिन) व १७ सप्‍टेम्बरसप्टेंबर या मराठवाडा मुक्‍तिसंग्राम दिनाच्या दिवशी रबी पीक मेळावा घेण्‍यात येतो. शेतकऱ्यांना खरीप व रबी हंगामाबाबत मार्गदर्शन करून विद्यापीठाने तयार केलेल्‍या बियाणाचे वाटप केले जाते. [[सावित्रीबाई फुले]] यांच्या जयंती निमित्त ३ जानेवारी रोजी दरवर्षी महिला शेतकरी मेळावा आयोजित होतो. याचा लाभ राज्‍यातील लाखो शेतकरी बांधव घेतात. विद्यापीठाद्वारे दरवर्षी कृषि दैनंदिनी, कृषी दिनदर्शिका, विविध विषयांवरील पुस्तिका, घडीपत्रिका, शेतीभाती मासिक यांचे प्रकाशन होते.
 
===नामांकित शिक्षण संस्था===
* नवविकास मण्डळमंडळ शिक्षण संस्था
* नूतन शिक्षण संस्था
* केंद्रीय महाविद्यालय,परभणी
* भारतीय शिक्षण प्रसारक मण्डळमंडळ
* मराठवाडा शिक्षण प्रसारक मण्डळमंडळ
* योगेश्वरी शिक्षण संस्था, अम्बाजोगाई
* सरस्वती भुवन शिक्षण संस्था, औरंगाबाद.
ओळ १०७:
==साहित्य आणि साहित्यिक==
[[Image:Indischer Maler des 6. Jahrhunderts 001.jpg|200px|right|thumb|अजिण्ठ्यातिल लेण्यांमधले एक चित्र]]
* मराठवाड्यातील डॉक्टर [[यू.म.पठाण|यू. म.पठाण]] यांनी मराठी सन्तसंत साहित्याचे अभ्यासक अशी लोकमान्यता मिळवली आहे. तर [[डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे|डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे]] यांनीही मराठी सन्तसंत साहित्याचे अभ्यासक अशी लोकमान्यता मिळवली असून पुणे विद्यापीठातून सन्तसंत मुक्ताई यांच्या जीवनावर पी.एचडी प्रदान केली आहे. आज त्यांची सहा पुस्तके प्रकाशित आहेत. [[नरहर कुरुंदकर|नरहर कुरुन्दकर]] हे मराठी भाषेचे अग्रणी समीक्षक म्हणून परिचित होते. [[नाथराव नेरळकर]] यांनी शास्त्रीय संगीताची धुरा वाहिली. [[लक्ष्मीकांत तांबोळी|लक्ष्मीकान्त ताम्बोळी]], [[फ.मुं. शिंदे|फ. मुं. शिन्दे]] यांनी काव्यलेखन तर [[नरेंद्र नाईक|नरेन्द्र नाईक]] यांनी काव्य व कादम्बरी लेखन केले. त्यांची 'काळोखातील अग्निशिखा' कादम्बरी लोकप्रियतेच्या उत्तुंग शिखरावर आहे .[[दैनिक मराठवाडा]]चे सम्पादकसंपादक [[अनंत भालेराव|अनन्त भालेराव]] व [[दैनिक प्रजावाणी, नांदेड|दैनिक प्रजावाणी, नान्देड]]चे सम्पादकसंपादक [[सुधाकर डोईफोडे]] यांनी सामाजिक चेतना व आर्थिक प्रगतीस चालना मिळावी म्हणून सक्रिय कार्य केले .डॉ. [[लक्ष्मण देशपांडे|लक्ष्मण देशपाण्डे]] यांच्या ’वऱ्हाड निघालंय लण्डनला’ या एकपात्री प्रयोगांच्या संख्येने जागतिक विक्रम केला. डॉ. वा. ल. कुलकर्णी यांनीही मराठवाड्यातील अनेक साहित्यिक घडवले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी भाषा विभाग नावारूपास आणले .
 
==पुस्तके==
* ’असाही मराठवाडा’ (मराठवाड्याचे सांस्कृतिक अन्तरंगअंतरंग दाखविणारा ग्रन्थ)-: लेखक : डॉ. किरण देशमुख (प्रकाशक : निर्मल प्रकाशन, नान्देडनांदेड)
* ’काळोखातील अग्निशिखा’ (ऐतिहासिक कादम्बरीकादंबरी) (प्रकाशक दिलीपराज प्रकाशन,पुणे) : हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्याच्या पार्श्वभूमीवरची कादम्बरीकादंबरी-लेखक : [[नरेंद्र नाईक|नरेन्द्र नाईक]]
* ’नाटयधर्मी मराठवाडा ’ - लेखक : त्र्यम्बक महाजन.
* मराठवाडा : एक सांस्कृतिक मागोवा (अरुणचन्द्र पाठक)
* ’मराठवाडी माणसं’ - लेखक : [[यू. म. पठाण]]
* ’मराठवाड्यातील लोककथा’ - लेखक : [[यू.म. पठाण|यू. म. पठाण]]
* मराठवाड्यातील देवतांची रूपे (प्रा. डॉ. किरण देशमुख)
* ’मराठवाड्यातील शिलालेख’ - लेखक : [[यू.म. पठाण|यू. म. पठाण]]
* ’माझा महान मराठवाडा’ - लेखक : हेमकान्तहेमकांत महामुनी
* भीमा कोरेगावाचा क्रांती संग्राम - लेखक : युवराज सोनवणे
 
ओळ १५९:
 
===मराठवाडा शिक्षक मतदार संघ===
१९७४ साली मराठवाड्याला स्वतन्त्रस्वतंत्र शिक्षक मतदार संघ मिळाला.आज पर्यंतआजपर्यंत या मतदारसंघातून खालील शिक्षक आमदारांनी शिक्षकांचे विधान परिषदेत प्रतिनिधित्व केले आहे.
* डी. के. देशमुख
* राजाभाऊ उदगीरकर
* पी. जी. दस्तुरकर
* प. म. पाटील
* वसन्तराववसंतराव काळे
* विक्रम काळे
 
ओळ १९७:
* डॉ. [[गंगाधर पानतावणे]]
* पी. विठ्ठल
* [[प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे|प्र. ई. सोनकाम्बळे]]
* [[फ.मुं. शिंदे|फ.मुं. शिन्दे]]
* बी. रघुनाथ
* मुक्तविहारी
* [[युसुफखान महंमदखान पठाण|यू. म. पठाण]]
* रमेश दीक्षित
* रविंद्र किम्बहुने
* रावजी राठोड
* [[लक्ष्मीकांत तांबोळी|लक्ष्मीकान्त ताम्बोळी]]
* [[वा.रा. कांत|वा. रा. कान्तकांत]]
* श्रीकांत देशमुख
*[[डॉ. सरदारसिंग बैनाडे|डॉ. सरदारसिंह बैनाडे]]<ref>{{स्रोत पुस्तक|title=ज्येष्ठ कवी, लेखक व उत्तम सभा संचालक|last=बैनाडे|first=सरदारसिंग|publisher=|year=|isbn=|location=|pages=}}</ref>
ओळ २१४:
=====मराठवाड्यातील कलावन्त=====
* [[मकरंद अनासपुरे|मकरन्द अनासपुरे]]
* चन्द्रकान्तचंद्रकांत  कुलकर्णी
* मयूरी कांगो (हिन्दी चित्रपट अभिनेत्री)
* योगेश शिरसाठ
* डॉ. [[लक्ष्मण देशपांडे|लक्ष्मण देशपाण्डे]]
* सन्दिपसंदिप पाठक
 
=== <big>मराठवाडा ही साधुसन्तांचीसाधुसंतांची भूमी आहे. धार्मिक संस्कृतिपालक</big> ===
''' संत [[जनाबाई]] ([[गंगाखेड]]) '''
"https://mr.wikipedia.org/wiki/मराठवाडा" पासून हुडकले