"वालचंद हिराचंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
MarathiBot (चर्चा | योगदान) clean up, Replaced: [[ई.स. → [[इ.स. |
सुभाष राऊत (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १:
[[Image:Walchand Hirachand.jpg|right|thumb|सन्मानाप्रित्यर्थ प्रकाशित टपाल तिकीट]]
वालचंद हिराचंद यांचा जन्म २३ नोव्हेंबर १८८२ सोलापूर येथे झाला.
वालचंद यांचा शिक्षणापेक्षा व्यवसायाकडे कल असल्याने त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकून व्यवसायात पदार्पण केले. वडिलांच्या आडत व्यवसायातही त्यांचे मन रमत नव्हते. ज्वारी व कापसाच्या व्यापारात झळ सोसावी लागली होती; मात्र ते जिद्दीने बांधकाम व्यवसायात उतरले. बांधकाम व्यवसायाचे माहीतगार असलेल्या फाटक यांच्याबरोबर फाटक-वालचंद लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून ते या व्यवसायात उतरले. बार्शी लाइट रेल्वेच्या कंत्राटापासून सुरवात करून सुमारे १४ वर्षे भागीदारीत अनेक ठिकाणी पुलांची उभारणी केली. एडशी-तडवळ, बोरीबंदर-करी रोड-ठाणे-कल्याण व हार्बर ब्रॅंच लाइन यांसारखे मोठे प्रकल्प त्यांनी हाती घेतले व तडीस नेले. मुंबईतील व ब्रिटिशांच्या मर्जीतील नावाजलेल्या व्यावसायिकांना मागे सारून त्यांनी ही कामगिरी केली. मुंबईचा तानसा प्रकल्प, बोरघाट बोगदा, सिंधू नदी व इरावती नदीवरील पूल बांधणी यांसह अनेक छोट्या- मोठ्या प्रकल्प उभारणीमध्ये आपल्यातील धडाडीचे दर्शन घडवले.
ब्रिटिश जहाज कंपन्यांना झुकते माप देण्याच्या भूमिकेमुळे या व्यवसायात त्यांना अनेक अडीअडचणींना तोंड द्यावे लागले होते; मात्र न डगमगता ब्रिटिश व्यवस्थेशी त्यांनी संघर्षाची भूमिका घेतली; तसेच ब्रिटिशांच्या मर्जीतील जहाजांची बीआय कंपनी विकत घेण्याची भाषा केली.
जहाज बांधणीसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासह देशात प्रथमच बोगदा बनवण्याचे तंत्रज्ञान, मोटारनिर्मिती कंपनी आणि विमाननिर्मितीसाठी हिंदुस्थान एअरक्राफ्ट कंपनी त्यांनी स्थापन केली. पाइप फाउंड्री, खाणकाम, रायफल बनवणे, सॉ मिल, चॉकलेट व साखर कारखाना आदी क्षेत्रे त्यांनी काबीज केली. साखर उद्योगासाठी साखर कारखाने निर्मितीचा प्रकल्प राबविला. उद्योजकांच्या अडचणी सोडविण्याकरिता इंडियन मर्चंट्स, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्री (फिक्की) आदी संस्थांची उभारणी केली.
प्रीमिअर इलेक्ट्रॉनिक्स, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, सिंदिया एस्टिम शिप, रावळगाव शुगर फार्म, ऍक्रो इंडिया, बॉम्बे सायकल ऍण्ड मोटार, हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन, इंडियन ह्यूम पाइप, प्रीमिअर ऑटोमोबाईल्स, नॅशनल रायफल्स, वालचंद कुपर लिमिटेड, वालचंदनगर इंडस्ट्रीज आदी कंपन्या त्यांनी स्थापन केल्या. कामगारांशी सलोख्याचे संबंध राखून त्यांच्या अडचणी जाणून पावले टाकली. वालचंद हिराचंद यांच्या १२५ व्या जयंतीबरोबरच वालचंदनगर इंडस्ट्रीजच्या शताब्दीस या महिन्यात प्रारंभ होत आहे.
==उल्लेखनीय==
*[[डिसेंबर २३]], [[इ.स. १९४०]] रोजी [[हिंदुस्तान एरक्राफ्ट लिमिटेड]] हा भारतातील पहिला विमाननिर्मितीचा कारखाना तत्कालीन [[म्हैसूर राज्य|म्हैसूर राज्यात]] [[बँगलोर]] येथे त्यांनी सुरू केला. याच 'हिंदुस्थान एअरक्रॉफ्ट लिमिटेड' कंपनीचे पुढे [[हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड]] असे नामांतर झाले. या कंपनीने आज भारतातील अत्याधुनिक विमानांच्या निर्मितीचे आणि निर्वाहाचे शिवधनुष्य उचलले आहे.
==संदर्भ==
[http://www.esakal.com/esakal/11232007/Pune33DFC9DD4F.htm सकाळ संकेतस्थळ]
[[वर्ग:भारतीय उद्योगपती]]
|