"शिरपूर तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1632324 by Vijay mohan mahale on 2018-10-03T18:15:26Z |
Mahendra.adt (चर्चा | योगदान) |
||
ओळ ११५:
==जलसिंचन सुविधा==
शिरपुर तालुक्यात अरुणावती नदीवर हाडाखेड धरण असून त्यातील पाणी शेतीसाठी कालव्याद्वारे दिले जाते. यामुळे तालुक्यातील बरीच शेती सिंचनाखाली येते.
==प्राथमिक आरोग्यसुविधा==
शिरपुर तालुक्यात पहिल्या श्रेणीचे एकूण गुरांचे १० दवाखाने असून दुसऱ्या श्रेणीची ४ पशुप्रथमोपचार केंद्रे आहेत. तसेच तालुक्यात ८ प्राथमिक आरोग्य केंद्रे व १६ उपकेंद्रे आहेत. तसेच शिरपूर वरवाडे नगर परिषद संचालित इंदीरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल आहे येथे सुसज्ज २०० बेड ची सुविधा उपलब्ध आहेत
==शिक्षणसुविधा==
शिरपुर तालुक्यात २६४ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आहेत.शिरपूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागातून सर्व शैक्षणिक सुविधा पुरविल्या जातात<br />शिक्षण क्षेत्रात शिरपूर शहर बऱ्यापैकी आघाडीवर असून गावात चांगल्या प्रकारचे शिक्षण उपलब्ध आहे.<br />गावात औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी, उच्च शिक्षणाच्या सोयीदेखील आहेत.
==औद्योगिक क्रांती==
शिरपूर तालुक्यात एक साखर कारखाना व एक सूतगिरणी आहे.<br />शिरपूर गोल्ड रिफायनरी, सूतगिरणी, साखर कारखाना, कापड मिल व छोटे मोठे उद्योगधंदे आहेत.
==ऐतिहासिक महत्त्व==
Line १३५ ⟶ १३२:
महाराष्ट्रातल्या खानदेशमधील धुळे जिल्हा हा श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे असे मानले जाते. जिल्हा आकाराने लहान असला तरी अनेक वैशिष्ट्यांनी समृद्ध आहे. प्राचीन काळी हा प्रदेश कृषिक म्हणून ओळखला जाई. रामायण, महाभारत, व सुदेशकुमार चरित्रामध्ये तसे उल्लेख आढळतात. त्यानंतर यादव काळात राजा सेऊणचंद्रच्या नंतर सेऊन देश या नावानेही तो ओळखला जाई. महाभारताच्या भीष्म पर्वात गोमता, मदंका, खर्डा, विदर्भ व रूपवाहिका असा विविध प्रदेशांचा उल्लेख आहे त्यांतील खर्डा म्हणजेच खानदेश, म्हणजे पूर्वीचा कन्हदेश म्हणजेच कृष्णाचा देश. काहीच्या मते गुजरातचा सुलतान पहिला अहमद याने या तालुक्यातील थाळनेरचा दुसरा फारूखी राजा मलिक यांना खान ही पदवी बहाल केली होती, त्यावरून खानदेश हे नाव पडले. याच खानदेशमध्ये धुळे जिल्ह्यातील शिरपूर येते.
शिरपूर तालुक्याला शिरपूर हे नांव कसे पडले याची एक कथा सांगण्यात येते. फार पूर्वी काळूबाबा नावाचे सदगृहस्थ होते. श्री.खंडेराव महाराजांवर त्यांची श्रद्धा होती व ते नेहमी भगवंताची पूजाअर्चना, नामस्मरण, भक्ती यात मग्न असत. काळूबाबा सांसारिक गृहस्थ होते. त्यांची व्यथा म्हणजे त्यांना मूलबाळ नव्हते, त्यामुळे त्यांनी स्वत:चे शिरकमल देण्याचा खंडेराव देवाला नवस केला व साकडे घातले. यानंतर नवसाप्रमाणे त्यांना मुलगा झाला नवसानुसार श्री खंडेराव महाराजांच्या चरणी स्वतःचे शिरकमल अर्पण केले असता शिरकमळातून रक्त न निघता भंडारा (हळद) निघाला. त्यावरून या शहराचे नाव शिरपूर असे पडले असे जुने वयोवृद्ध लोक सांगतात.
==वैशिष्ट्य==
तालुक्यात एकूण १४७ गावे असून लोकसंख्या ३,३७,५५३ एवढी आहे. तालुक्यात एकूण ११८ ग्रामपंचायती आहेत.<br />शिरपूर गावात दोन प्रसिद्ध बालाजी (प्रतितिरुपती) मंदिर असून खालच्या गावातील व वरच्या गावातील अशा नावाने ती ओळखली जातात, श्री तिरुपती बालाजी नावाने व दरवर्षी खंडेराव देवाच्या नावाने यात्रा भरते. <br />शहरांत प्रभु व्यंकटेश बालाजी मंदिर, पाताळेश्वर मंदिर, खंडेराव मंदिर, माताभवानी मंदिर, अशी मंदिरे असून तीन मशिदी आहेत.शिरपूर येथे भव्य मोठे बुद्ध विहीर आहे अतिशय सुंदर परिसरात बौद्ध बांधव धम्म देसना करतात .▼
▲शहरांत प्रभु व्यंकटेश बालाजी मंदिर, पाताळेश्वर मंदिर, खंडेराव मंदिर, माताभवानी मंदिर, अशी मंदिरे असून तीन मशिदी आहेत.शिरपूर येथे भव्य मोठे बुद्ध विहीर आहे अतिशय सुंदर परिसरात बौद्ध बांधव धम्म देसना करतात .
==तालुक्यातील प्रमुख
==उल्लेखनीय==
शिरपूर हे गाव प्रसिद्ध हिंदी व मराठी अभिनेत्री [[स्मिता पाटील]] हिचे जन्म गाव आहे.
==संदर्भ==
|