सिक्कीममध्ये सतराव्या शतकापर्यंत नामग्याल राजघराण्याची एकसत्ताक पद्धत रूढ होती. राजा तेनसिंग[[तेन नामग्यालनेसिंग न्यामग्याल ने]] युकसोम येथून राजधानी हलवून रबदानसे येथे नेली. पण नेपाळ व भूतान यांच्याकडून सतत होणाऱ्या स्वाऱ्यांनी या छोट्या राज्याची व रहिवाश्यांची वाताहात झाली. ब्रिटिश काळात सिक्कीमचे तत्कालीन हिंदुस्थानच्या मदतीने नेपाळशी युद्ध झाले. त्या वेळी सिक्कीमने [[ब्रिटिश इंडिया]] व नेपाळशी अनुक्रमे सुगौली[[सुगोली]], तितालिया करार करून हस्तगत केलेला भाग परत मिळवला. भारताचा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९८४ पर्यंत सिक्कीम भारताचे संरक्षित क्षेत्र बनले. सिक्कीमच्या संरक्षण,परराष्ट्र,आणि दळणवळणाची जबाबदारी सरकारने स्वीकारली. भारताबरोबर घनिष्ठ संबंध असावेत अशी इच्छा सिक्कीमने १९८४ मध्ये व्यक्त केली. त्यानुसार सिक्कीमला सहयोगी राज्य घोषित करण्यात आले.यामुळेही सिक्कीमच्या आकांक्षा पूर्ण झाल्या नाहीत. म्हणून १९७५ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधींच्या राजवटीत सार्वमत घेऊन सिक्कीम भारतीय संघराज्यात सामील झाले व ते भारताचे एक राज्य म्हणून गणले जाऊ लागले. सिक्कीम हे तीन दिशांनी वेगवेगळ्या सीमांनी बंदिस्त असल्याने संरक्षणदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे, त्यामुळे भारतीय लष्कराचे तेथे वर्चस्व आहे.