"चक्रधरस्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
हो खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
→प्रारंभिक जीवन: ही खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ४:
==प्रारंभिक जीवन==
भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रारंभिक जीवनासंबंधी माहिती [[लीळाचरित्र]]ाच्या एकांक या भागात मिळते. बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात [[गुजराथ]]मधील [[भडोच]] येथे शके ११४२ विक्रम संवत्सर भाद्रपद महिन्याच्या शुक्लपक्षाच्या रविवारी
तारुण्यात आल्यावर हरपाळदेव यांचा विवाह कमळाईसा यांच्याबरोबर झाला. याच काळात त्यांनी युद्धांतही पराक्रम गाजवला.<ref>संकपाळ (२००९) पृ. ८. देवगिरीच्या यादवांनी [[गुजराथ]]वर स्वारी केली असता हरपाळदेव यादवांचा पाठलाग करत वेरूळपर्यंत आले होते. या युद्धात त्यांच्या कपाळावर जखम झाली होती.</ref> पुढे हरपाळदेवांना आजारी लोकांची सेवा करायचा छंद लागला. बरेचदा ते राजवाडा सोडून आजारी लोकांबरोबर वेळ घालवू लागले. पुढे त्यांची प्रकृती अचानक खालवली व त्यांचा मृत्यू झाला. परंतु स्मशानात सरणावर ठेवल्यावर हरपाळदेव जिवंत असल्याचे आढळून आले. [[महानुभाव|महानुभावीयांच्या]] श्रद्धेनुसार यावेळी श्रीकृष्णाने त्यांच्या शरीरात प्रवेश करून अवतार धारण केला. पंचावतारातील तिसरा अवतार श्री [[चांगदेव]] यांचा त्याच सुमारास मृत्यू झाला होता. काही मतांनुसार त्यांच्या आत्म्याने हरपाळदेवांच्या शरीरात प्रवेश केला. हरपाळदेवांच्या शरीरात प्रविष्ट होणारा आत्मा स्वतंत्र ईश्वरी आत्मा होता.<ref name="page9-10">संकपाळ (२००९) पृ. ९-१० आणि १३. पंचावतारातील तिसरा अवतार श्री [[चांगदेव]] यांचा त्याच सुमारास मृत्यू झाला होता. काही मतांनुसार त्यांच्या आत्म्याने हरपाळदेवांच्या शरीरात प्रवेश केला. अन्य मतांनुसार [[चांगदेव|चांगदेवांचा]] आत्मा मुक्त झाला; हरपाळदेवांच्या शरीरात प्रविष्ट होणारा आत्मा स्वतंत्र ईश्वरी आत्मा होता.</ref> ही अवतारधारणाची घटना शके ११४२ विक्रम संवत्सर भाद्रपद महिन्याच्या शुक्लपक्षाच्या रविवारी घडली.<ref name="page9-10"/>
|