"सोलापूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ५३:
== इतिहास ==
* [http://www.solapurcorporation.com सोलापूर महापालिका संकेतस्थळ]
*सोलापूर शहर हे हुतात्मा शहर म्हणून ओळखले जाते .स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वीच सोलापूर शहराने ९-११ मे १९३० या काळात ३ दिवसांचे स्वातंत्र्य उपभोगले. या घटनेमुळे स्वातंत्र्य संग्रामादरम्यान [[मलप्पा धनशेट्टी]], [[जगन्नाथ शिंदे]], [[कुर्बान हुसेन]] व [[किसन सारडा]] यांना [[जानेवारी १२]], [[इ.स. १९३१|१९३१]] रोजी ब्रिटिशांनी सोलापूरमध्ये फाशी दिली. तेव्हापासून शहरास हुतात्म्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. विडी उत्पादनात सोलापूरचा महाराष्ट्रात वरचा क्रमांक आहे
*सोलापूर शहर हे हुतात्मा शहर म्हणून ओळखले जाते .
 
सोलापूरला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.सोलापूराचे प्राचीन म्हणजे १२व्या शतकातील रहिवासी "श्री.शिवयोगी सिद्धेश्वर" यांनी या परिसरात अडुसष्ट शिवलिंगांची स्थापना केली वीरशैव धर्माच्या (शैव पंथ) माध्यमातून समाज सुधारणांचे काम केले. सोलापूर [[तलाव]] बांधून त्यांनी सोलापूराची [[पाणी]] समस्या सोडवली. [[इ.स.पू. २००]] वर्षापासून [[सातवाहन]], [[चालुक्य]], [[राष्ट्रकूट]], [[यादव]], [[बहामनी]], [[अहमदनगर]]ची [[निजामशाही]], [[आदिलशाही]], मराठे-[[पेशवे]] व [[ब्रिटिश]] या सर्व राजवटी सोलापूर जिल्ह्याने अनुभवल्या. यादवांच्या काळात या भागाला सोन्नलगी म्हटले जात होते. [[मुघल]] राजवटीत यास संदलपूर असेही म्हटले जात होते. ब्रिटिश काळात सोलापूर हे नाव रूढ झाले असावे असा अंदाज व्यक्त केला जातो. सोलापूरला सोन्नलगिरी, गिरणगाव अशा नावानेही ओळखले जाते. सोलापूरचा [[इतिहास]] रोमांचक आहे. [[मुंबई]]-[[चेन्नई]] रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय पातळीवरील सर्व राजकीय-सामाजिक घडामोडींचे पडसाद सोलापूमध्ये उमटत असत. पहिल्या महायुद्धानंतर भारतात कामगारांनी मोठा संप पुकारला. सोलापूरलाही [[जानेवारी]], १९२० मध्ये कामगारांनी ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधात संप पुकारला होता.१९३० च्या [[सविनय कायदेभंग चळवळ]]ीत सोलापूरकर हिरिरीने सहभागी झाले होते. या सत्याग्रहात दारुबंदीचा प्रचार करण्यासाठी काही तरुण कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. या वेळी शंकर शिवदारे हा तरुण तिरंगा हातात घेऊन पुढे धावला व ब्रिटिशांच्या गोळीबारात बळी पडला. हा [[शंकर शिवदारे]] सोलापूरचा पहिला हुतात्मा. या हौतात्म्यामुळे सोलापूरकर पेटून उठले. पण दि. ८,९ मे, १९३० या दोन दिवसांत तत्कालीन कलेक्टर नाईट याने जमावांवर अमानुष गोळीबार केला. अनेक नागरिक गोळीबारात बळी पडले. या आंदोलनादरम्यान दि.९,१०,११ [[मे]], १९३० असे तीन दिवस सोलापूर ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली नव्हते, मुक्त होते. भारतातील (काही काळासाठी) ‘स्वतंत्र’ झालेला असा हा पहिला भाग! मे- जून, १९३०मध्ये सुमारे ४९ दिवस सोलापूरला मार्शल लॉ लागू केला होता. या काळात सोलापूरच्या ४ निरपराध युवकांना फाशी देण्यात आले. '''अब्दुल कुर्बान हुसेन, मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकिसन सारडा व जगन्नाथ शिंदे''' हे सोलापूरचे युवक दि. १२ जानेवारी, १९३१ रोजी धीरोदात्तपणे फासावर चढले. या प्रेरणादायी क्रांतिपर्वामुळेच सोलापूरला हुतात्म्यांचे शहर म्हटले जाते. पुतळ्यांच्या माध्यमातून आज या हुतात्म्यांची स्मृती सोलापुरात जतन करण्यात आली आहे. १९३०-३१ मधील या घटनांचे संदर्भ तत्कालीन ‘[[केसरी]]’ मध्ये आढळतात. १२ जानेवारी हा दिवस सोलापूरकर हुतात्मा दिन म्हणून पाळतात.{{संदर्भ हवा}}सोलापूर येथील भुईकोट किल्ला, सिद्धेश्वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, हुतात्मा बाग, इंद्रभुवन (महानगर पालिका इमारत), शुभराय आर्ट गॅलरी, स्मृती उद्यान ही भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत. हुतात्मा स्मृती मंदिर येथे अनेक कला प्रदर्शन आणि नाट्यप्रयोग मोठ्या प्रमाणात होत असतात. सोलापूरमध्ये दरवर्षी सिद्धेश्वर यात्रा म्हणजेच" गड्डा " ही मोठी यात्रा असते. कर्नाटक परिसरातून लोक येतात.
ओळ ७४:
 
==सोलापूर जिल्ह्यातील तालुके==
सोलापूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १५ हजार चौरस किलोमीटर आहे. सोलापुरातील सरासरी पर्जन्यमान ५४५ मिलिमीटर (महाराष्ट्रातील सर्वात कमी) आहे.
#[[अक्कलकोट]]
#[[बार्शी]]
"https://mr.wikipedia.org/wiki/सोलापूर" पासून हुडकले