"आनंदीबाई गोपाळराव जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ५७:
आनंदीबाई जोशी यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी [[पुणे|पुण्यात]] त्यांच्या आजोळी झाला. आनंदीबाईंचे पूर्वाश्रमीचे नाव [[यमुना नदी|यमुना]] होते. जुन्या कल्याण परिसरातील पारनाका इथे राहणाऱ्या गणपतराव अमृतेश्वर जोशी यांच्या ज्येष्ठ कन्या होत्या. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह वयाने २० वर्षांनी मोठे असणाऱ्या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला.गोपाळराव जोशी हे मूळचे संगमनेर जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी होते.लग्नानंतर गोपाळरावांनी आपल्या पत्नीचे यमुना हे नाव बदलून आनंदीबाई असे ठेवले. वयाच्या चौदाव्या वर्षी आनंदीबाईंनी एका मुलाला जन्म दिला, परंतु वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे मूल फक्त दहा दिवस जगले.आनंदीच्या जीवनात हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आणि तिला डॉक्टर बनण्याची प्रेरणा मिळाली. गोपाळरावांनी तिला मिशनरी शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न केला, कलकत्त्याला गेल्यावर तिने संस्कृत आणि इंग्रजी वाचणे आणि बोलणे शिकले.
गोपाळराव [[कल्याण]]ला पोस्ट ऑफिसात कारकून होते. नंतर त्यांची अलिबाग येथे आणि नंतर [[कोलकाता]] (कोलकाता) येथे बदली झाली. ते एक पुरोगामी विचारवंत होते आणि त्या काळातही त्यांचा महिला शिक्षणाला पाठिंबा होता. आपल्या काळातील इतर पती आपल्या पत्नींना स्वयंपाक न केल्याबद्दल मारहाण करत, या उलट गोपाळराव हे आपल्या तरुण पत्नीला अभ्यास न केल्याबद्दल मारहाण करत, कारण पत्नीने वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर बनावे असा त्यांचा आग्रह होता. ते स्वतः [[लोकहितवादी|लोकहितवादींची]] [[शतपत्रे]] वाचत. आपल्या पत्नीला शिक्षणात रस आहे हे गोपाळरावांनी जाणले. लोकहितवादींच्या शतपत्रांमुळे ते प्रेरित झाले आणि आपल्या पत्नीस [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]] शिकविण्याचा त्यांनी निश्चय केला.
==वैद्यकीय शिक्षण==
|