ठाकरेंनी [[जून १९]],[[इ.स.जून १९६६]] रोजी शिवसेनेची स्थापना केली. ठाकरेंच्या मते, 'समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, पण मराठी माणूस दुविधेत आहे. महाराष्ट्रात उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार; तर महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब आहे. [[महाराष्ट्र|महाराष्ट्राला]] [[भारत|भारतात]] मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच (प्रामुख्याने मुंबईत) अपमानित होतो आहे.' शिवसेनेचा पहिला [[मेळावा]] [[ऑक्टोबर ३०]],[[इ.स.ऑक्टोबर १९६६]] रोजी [[शिवाजी पार्क|शिवतीर्थ]] मैदानावर संपन्न झाला. ज्यात सुमारे ५ लाख लोकांचा सहभाग होता.{{संदर्भ}} या मेळाव्यापासूनच बाळ ठाकरे आणि शिवतीर्थावरील ([[शिवाजी पार्क]]वरील) मराठी माणसांची गर्दी यांच्यामध्ये नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली.