"थोरले बाजीराव पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ७०:
 
=बाजीराव आणि धर्म=
त्यांनी कधीही देवधर्म यांचे अवडंबर केले नाही. जाती-पातीच्या परिघात ते अडकले नाहीत आणि म्हणूनच बहुजन समाजातील सरदारांच्या, सैनिकांच्या मांडीला मांडी लावून ते जेवत, त्यांच्यात रमत. जे असेल ते खात. म्हणूनच पुण्यात धर्म मोडला आणि अभक्ष्य भक्षण केले यासाठी तथाकथित पंडितांनी आकांडतांडव केले. परंतु बाजीरावांनी त्यांना भीक घातली नाही. द्वितीय पत्नी मस्तानीबाईंचा पुत्र कृष्णसिंग अर्थात समशेरबहाद्दर (पुढे याने पानिपत युद्धात अतुलनीय पराक्रम केला). याच्या हक्कासाठी ते जागरूक होते. त्याचे मौजीबंधन करण्यास पुण्यातील शास्त्री, पंडिताचा विरोध होता. पण तो विरोध डावलून समशेरसिंगचे मौजीबंधन केले. धर्मातील खुळचट कल्पना त्यांनी केव्हाच झुगारून दिल्या होत्या.
 
'''<nowiki/>' श्री राजा शाहू नरपति हर्षनिधान<br /> बाजीराव बल्लाळ पंतप्रधान ''''<br />ही मुद्रा धारण करणाऱ्या बाजीरावांकडे कोणतेही छक्केपंजे नव्हते. नेपोलियनने जसे सामान्यांतून मार्शल निर्माण केले तसे बाजीरावांनी अठरापगड जाती-जमातीतून लढवय्ये सरदार निर्माण केले. संबंध भारतभूमीत स्फुल्लिंग पेटवले, अस्मिता निर्माण केली. अस्थिर झालेल्या स्वराज्याला त्यांनी स्थिर केले. एवढेच नाही तर संभाव्य विस्ताराचा मार्ग आखून दिला. हिंदुस्थानच्या इतिहासात मराठ्यांना मानाचे स्थान मिळवून दिले. एवढा बळकट शनिवारवाडा बांधून ते त्यात कधीही विश्रांतीसाठी थांबले नाहीत.
ओळ ७९:
 
'''<nowiki/>'''
 
=वैयक्तिक आयुष्य=
यांचे लग्न १७१३ सालच्या सुमारास चासकर महादजी कृष्ण जोशी यांची मुलगी काशीबाई हिच्याशी झाले. काशीबाईपासून बाजीरावास रामचंद्र ऊर्फ [[रघुनाथराव पेशवा]], जनार्दन व बाळाजी ऊर्फ [[नाना पेशवा|नानासाहेब पेशवा]] असे ३ पुत्र होते.काशीबाईंंचा मृत्यू १७५८ साली झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-44-50/10821-2013-03-06-03-05-55|title=बाजीराव बल्लाळ पेशवे|संकेतस्थळ=ketkardnyankosh.com|ॲक्सेसदिनांक=2018-12-24}}</ref> छत्रसाल प्रकरणाच्या वेळी मस्तानीशी विवाह झाला(१७२९). मस्तानीपासून कृष्णराव उर्फ समशेरबहाद्दर हा पुत्र झाला.