"ध्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
छोNo edit summary |
||
ओळ ५:
==स्वामी विवेकानंंद म्हणतात==
आध्यात्मिक जीवनाला जर सर्वात जास्त सहाय्य कशाचे होत असेल तर ते ध्यानाचे होय.ध्यानामधे आपण आपल्या सर्व भौतिक उपाधी टाकून देतो आणि आपल्या दिव्य स्वरूपाचा अनुभव घेतो.
'मी देह नाही,मी आत्मा आहे' ;अखिल विश्व, त्यातील सर्व संबंध,त्यातील सर्व चांगल्या वाईट गोष्टी ह्या म्हणजे जणूकाही पडद्यावरील चित्रमालिका होत अणि मी त्यांचा केवळ साक्षी आहे' ही भावना म्हणजे आध्यात्मिक जीवनाच्या यशाची गुरुकिल्ली होय
(ग्रंथावली खं.८, पृ.३४—३५)<ref> ध्यान आणि त्याच्या पद्धती, स्वामी विवेकानंद, संपा.स्वामी चेतनानंद,रामकृष्ण मठ नागपूर प्रकाशन सन २॰१२</ref>
==ध्यान म्हणजे एकाग्रता==
[[File:Buddhist child.jpg|thumb|विद्यार्थी ध्यान करताना]]
ध्यान ही एक अशी शक्ती आहे की जी आपल्याला गुलामी आणि प्रकृती या सर्वांचा प्रतिकार करण्यास समर्थ करते.ध्यान हे आनंदाप्रत पोचण्याचे द्वार आहे.[[प्रार्थना]],अनुष्ठाने व उपासनेचे इतर सर्व प्रकार हे ध्यानाचे निव्वळ प्राथमिक धडे होत.सावकाशपणे व पायरीपायरीने आपण आपल्याला वळण लावायचे असते.
विद्यार्थिपणात अभ्यासावर ध्यान करावे लागते. आपल्यापाशी असलेले ज्ञान दुसऱ्याला देताना एकाग्रता लागते. अर्जुनाला दिसणारा पोपटाचा डोळा हे अर्जुनाचे ध्यान आहे. एखाद्या विषयावर आपले लक्ष्य पूर्णपणे केंद्रित करणे हेही ध्यानच आहे. ध्यानातली एकाग्रता ही आपल्या जाणिवेचा दरवाजा उघडण्याची चावी आहे. यासाठी मनाची इतर दारे बंद करावी लागतात. एकाग्रता प्रथम अंत:करणात प्रवेश करते आणि मग ती हव्या त्या शाखेत संचार करते. श्रीमाताजी म्हणतात, ‘प्रथम अस्तित्वाची एकता; मग हृदयाची शुद्धता यामुळे एकाग्रता साधते. याने ईश्वरी स्पर्श लाभतो. एकाग्रतेतील नीरवता मनाला स्थिर ठेवते. पृष्ठभागावरील हालचालींना पायबंद घालते. जाणीव नवी होते. ती अकारण विचारलहरींना थांबविते. मग आपण [[मन|मनाच्या]] उच्च पातळीवर सहज पोहोचतो. दिव्य स्फूर्तीची ग्रहणक्षमता आपल्यात येते. शांती, नीरवता, आनंद यांचा जो लाभ करून देते ती साधना! आपले पार्थिव, प्राणिक, मानसिक अस्तित्व आपल्यातल्या प्रभुशरणतेच्या साधनेशी सतत लढते. म्हणून मन:शांतीला भारतीय दर्शनांमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. मन:शांतीने आपल्या नव्या कामात समतोल येतो. कामात पूर्ण रंगतो. मनास छान वाटते. कामातले ओझे संपते. अवघडपणा कोणताही मावळतो. अदृश्य शक्ती येते. ती आपल्याला पाहाते. आपला आधार होते. मनाला उंची देते. कामात देवत्व येते. सारे देव करतो. संतांचा भाव येतो. मनाला ताजेपण येते. कामाने परिस्थिती बदलते. वृत्ती पालटते. मनाचे आजार संपतात. ‘स्थिरसुखमासनम्’ ही व्याख्या आठवते. ही [[पतंजली|पतंजलींची]] व्याख्या आहे. ती साऱ्यांनी स्वीकारली आहे. आसनापेक्षा ध्यानात सहजता हवी. आपण ज्या विविध चालण्या-बोलण्याच्या आदि क्रिया करतो, त्याला कृतिशील ध्यान म्हणतात. केवळ ध्यानासाठी जे ध्यान होते त्याला निष्क्रिय ध्यान म्हणतात. श्री अरविंदांच्या मते; मनन व चिंतन या ध्यानाच्या चढत्या पायऱ्या आहेत.
|