"अधिकमास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎पौराणिक कथा: संदर्भ घातला
ओळ ८:
 
==भारतातील प्रांतानुसार==
सूर्याधरित पंचांग पाळणाऱ्या [[आसाम]], [[ओरिसा]], [[केरळ]], [[तमिळनाडू]], [[पश्चिम बंगाल]] या राज्यांत अधिक महिना नसतो, तो फक्त चांद्र पंचांग वापरणाऱ्या [[आंध्र प्रदेश]], [[कर्नाटक]], [[गुजरात]] आणि [[मध्य प्रदेश|मध्य प्रदेशां]]सारख्या राज्यांत पाळला जातो.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=IKqOUfqt4cIC&newbks=0&printsec=frontcover&pg=PA305&dq=different+names+of+adhik+maas&hl=en|title=Traditional Festivals: A Multicultural Encyclopedia|last=Roy|first=Christian|date=2005|publisher=ABC-CLIO|isbn=978-1-57607-089-5|language=en}}</ref>
 
चैत्रापासून [[आश्विन]] महिन्यांपर्यंतचा कोणताही एक महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो. कारण या महिन्यांतच सूर्याची गती मंद असते, व त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला जास्त वेळ लागतो. क्वचित [[कार्तिक]] वा [[फाल्गुन]] महिन्यातही अधिक मास येतो. त्या वर्षी एकाच नावाचे दोन चांद्र महिने असतात, अगोदरचा अधिकमास आणि नंतर लगेच येणारा महिना हा निजमास. एखादा विशिष्ट महिना अधिकमास आला की १९ वर्षांनंतर तोच महिना अधिकमास म्हणून येऊ शकतो.
ओळ २०२:
 
===पौराणिक कथा===
या मासात मंगल कार्ये, काम्य व्रते इत्यादींचा त्याग करतात. त्यामुळे या मासास इहलोकात अनेक निर्भत्सनांना सामोरे जावे लागले. त्यामुळे व्यथित होऊन तो मास वैकुंठात विष्णूकडे गाऱ्हाणे घेऊन गेला. विष्णूने त्यास गोकुळात [[श्रीकृष्ण|कृष्णाकडे]] पाठविले. तो कृष्णास शरण गेला. कृष्णाने त्या मासाचे नाव बदलून 'पुरुषोत्तम मास' असे ठेविले अशी कथा प्रचलित आहे. या मासात जे श्रद्धाभक्तियुक्त राहून उपासना, कर्मे, व्रते व दाने करतील त्यांना पुण्य मिळेल असेही त्यास वचन दिले.या काळात केलेल्या तीर्थयात्रांनाही हिंदु धर्मात विशेष महत्त्व आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=kWqPwWpkhg0C&pg=PA288&dq=importance+of+purushottam+maas&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjkr8vBhZTbAhXHo48KHQjUBqIQ6AEIJDAA|title=Yatra 2 Yatra|date=2009|publisher=Yatra2Yatra|language=en}}</ref><ref name=":0" />
 
===हे सुद्धा पहा===
"https://mr.wikipedia.org/wiki/अधिकमास" पासून हुडकले