"वेताळ पंचविशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary |
||
ओळ १:
वेताळ पंचविशी हा संस्कृत भाषेतील अद्भुत कथांचा कथासंग्रह आहे. या संग्रहात एकूण पंचवीस
'''वेताळ पंचविशीचे उगमस्थान :'''
गुणाढ्याची बृहत्कथा हा संस्कृत कथावाङ्मयातील कथांचा सर्वात मोठा संग्रह आहे. मात्र आज हा ग्रंथ उपलब्ध नाही. यानंतर सोमदेव कवींनी कथासरित्सागर या ग्रंथाची रचना केली. या ग्रंथातील विविध कथांमधूनं पुढे शुकसप्ततिः, सिंहासनद्वात्रिंशिका,
'''संस्करणे :'''
ओळ १०:
आज वेताळ पंचविशीची संस्कृत भाषेत एकूण ३ संस्करणे उपलब्ध आहेत.
१) कवी शिवदासाने
२) वल्लभदासाने देखील या कथांचे पुनर्लेखन करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने बऱ्याच ठिकाणी शिवदासाचे अनुकरण केले. व त्याला कथालेखनाची शैलीदेखील तितकीशी साध्य झाली नाही.
३) जम्भलदत्त या कवीने केलेले या कथांचे संस्करण आज सर्वात प्रसिद्ध आहे. या संस्करणामध्ये श्लोकांची संख्या कमी होऊन केवळ १९ श्लोक राहिले व बाकीचा बहुतांश भाग हा
'''जम्भलदत्ताविषयी :'''
जम्भलदत्ताविषयी आज दुर्दैवाने फारशी माहिती उपलब्ध नाही. मात्र त्याच्या लिखाणावरुन आपण त्याच्या आयुष्याविषयी अंदाज बांधू शकतो. जम्भल या शब्दाचा अर्थ होतो कुबेर. व दत्त ही एक पदवी असावी. आपल्या लिखाणामधून त्याने शंकर व विष्णू यांना वंदन केले आहे असे आढळते. मात्र त्याच वेळी त्याने मंजुश्री या बुद्ध देवतेलासुद्धा वंदन केल्याचे आढळून येते.
'''कथानक :'''
कोण्या एका राज्यामध्ये शांतिशील नावाचा मांत्रिक राहत असतो. त्याला एका यज्ञाद्वारे भरपूर धन मिळवायचे असते. मात्र त्या यज्ञासाठी एक अट असते ती म्हणजे अग्नी हा एखाद्या प्रेताच्या तोंडामध्येच प्रज्वलित केला पाहिजे. म्हणून तो मांत्रिक मदत मागण्यासाठी विक्रमसेन राजाकडे गेला. मांत्रिकाला मदत करण्यासाठी विक्रमसेन राजा स्मशानातून वेताळाला आणायला गेला. त्यावेळी वेताळाने अट घातली की तुझ्याबरोबर येत असताना मी तुला काही गोष्टी सांगेन. प्रत्येक गोष्टीच्या शेवटी मी तुला एक प्रश्न विचारेन; जर तुला त्या प्रश्नाचे उत्तर आले नाही किंवा उत्तर माहीत असूनही सांगितले नाहीस तर तू तत्काळ मरण पावशील. त्याचबरोबर मी तुझ्याबरोबर येताना तू पूर्णपणे मौन बाळगले
वेताळ पंशविशीच्या मध्यवर्ती कल्पनेवर आधारित 'बिक्रम और बेताल' ही एक हिंदी दूरदर्शनवर आलेली एक चित्र मालिका होती. २६ भागांनंतर ती संपली. या मालिकेत [[दारासिंग]]ने, [[अरुण गोविल]]ने आणि [[अरविंद त्रिपाठी]]ने कामे केली होती. सन १९८५ आणि नंतर १९८८मध्ये ती प्रसारित झाली. पहिला एपिसोड १३ ऑक्टोबर १९८५ आणि शेवटचा ६ एप्रिल १९८६ रोजी प्रसारित झाला.
* वेताळ पंचविशी हे राज कुलकर्णी यांचे पुस्तक ग्रंथाली प्रकाशनाने जानेवारी
==अन्य पुस्तके==
* विक्रम वेताळ मालिका : जादुची साखळी आणि इतर कथा (लेखिका - वैशाली कार्लेकर, बालसाहित्य)
* विक्रम वेताळ मालिका : टेकडीवरचं देऊळ आणि इतर कथा (लेखिका - वैशाली कार्लेकर, बालसाहित्य)
* विक्रम वेताळ मालिका : दैवी सिंहासन आणि इतर कथा (लेखिका - वैशाली कार्लेकर, बालसाहित्य)
* विक्रम वेताळ मालिका : पुतळे जिवंत झाले आणि इतर कथा (लेखिका - वैशाली कार्लेकर, बालसाहित्य)
* विक्रम वेताळ मालिका : राजपुत्राचा निर्णय आणि इतर कथा (लेखिका - वैशाली कार्लेकर, बालसाहित्य)
* विक्रम वेताळ मालिका : समुद्रातील अप्सरा आणि इतर कथा (लेखिका - वैशाली कार्लेकर, बालसाहित्य)
|