"भारताचा ध्वज" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
भर घातली |
No edit summary |
||
ओळ ३६:
|}
भारताच्या राष्ट्रीय ध्वजात चार रंगाचा वापर केला गेला आहे. केशरी, पांढरा, हिरवा, आणि निळा. (त्यामुळे भारताचा राष्ट्रीय ध्वज, रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून '''चौरंगा''' आहे). २२ जुलै १९४७ रोजी घटना समितीच्या बैठकीत 'तिरंगी ध्वज' भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला. त्या संबंधीचा ठराव [[पंडित जवाहरलाल नेहरू]] यांनी मांडला. एकाला एक लागून असलेल्या आडव्या समान प्रमाणाच्या तीन पट्ट्यांचा तो आहे. वरती गर्द केशरी, मध्यभागी पांढरा आणि खालच्या बाजूला गर्द हिरवा, अशा क्रमाने हे तीन रंग आहेत. मधल्या पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगाचे अशोकचक्र (धम्मचक्र) असून ते [[सारनाथ]] येथील सिंहमुद्रेवर असलेले [[अशोकचक्र]] आहे. चक्राला २४ आरे आहेत. [[मच्छलीपट्टणम]] जवळ जन्मलेल्या [[पिंगली वेंकय्या]] ह्यांनी तिरंग्याची रचना केली आहे. भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंचीचे व लांबीचे प्रमाण 2:3 असे आहे, तसेच राष्ट्रध्वज [[खादी]]च्या अथवा रेशमाच्या [[कापड]]ाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे. [[सर्वपल्ली राधाकृष्णन]] यांनी भारतीय राष्ट्रध्वजाच्या एकूण रचनेचे महत्त्व चांगल्या प्रकारे विशद केले आहे.
ध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्यात आली आहे.<br>
|