"भारताचा इतिहास" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ७:
इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात [[ग्रीक]] [[सम्राट]] [[सिकंदर]] ([[अलेक्झांडर]])च्या आक्रमणानंतर बरीच राजकीय स्थित्यंतरे झाली.सिकंदराने [[गंगेच्या]] खोर्यापर्यतचा भारताचा काही भाग जिंकून तेथे त्याचे ग्रीक [[क्षात्रप]] म्हणजे [[सुभेदार]] नेमले.भारतामधून निघून गेल्यानंतर [[ग्रीस]]मध्ये त्याचा म्रुत्यू झाला.सिकंदराच्या म्रुत्युनंतर ग्रीकाच्या ताब्यात असणार्या भारतीय प्रदेशात उठाव सुरु झाले. भारताच्या मुद्देसूद इतिहासाची येथपासून सुरुवात होते.[[चंद्रगुप्त मौर्य]]ाने आर्य [[चाणक्य]]यांच्या साथीने /मदतीने [[मगध]]च्या [[मौर्य]] साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली.त्याआधी त्याने मगधमधील [[नंद]] घराण्याचा शेवटचा राजा [[धनानंदा]]चा पराभव केला. तिचा म्हणजे मौर्य साम्राज्याचा त्याचा नातू [[सम्राट अशोक]]ाने कळस गाठला.भारताच्या पश्चिम सीमेपर्यत त्याचा विस्तार झाला.[[कलिंगा]]च्या युद्धात मानवी क्रौर्यानंतर अशोकाने [[शांतता]] व [[अहिंसेचा]] मार्ग अवलंबला व बौद्ध धर्माचा स्वीकार केला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |title = Maurya dynasty |दुवा = http://www.livius.org/man-md/mauryas/mauryas.html |लेखक = Jona Lendering |अॅक्सेसदिनांक = 2007-06-17}}</ref> भारतात या काळात मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्माचा प्रसार झाला होता.अशोकाच्यानंतरचे मौर्य सम्राट फारसे कर्तृत्ववान नसल्याने मौर्य साम्राज्याचे पतन सुरु झाले.शेवटचा मौर्य सम्राट [[ब्रुहद्राता]] याची त्याचा सेनापती पुष्यमित्र शुग याने हत्या केली आणि शुग घराण्याची सत्ता स्थापन केली.पुढे काही काळानंतर शुग घराण्याचा [[मंत्री]] [[वासुदेव कण्व]] याने शुग घराण्याच्या राजाची हत्या केली आणि [[कण्व]] घराण्याची सत्ता स्थापन केली. मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर काही काळ उत्तर भारतात अनेक ग्रीक आक्रमणे पुन्हा झाली काही काळ ग्रीक सत्तेखाली भारताचा काही भाग होता. तिसऱ्या शतकात स्थापन झालेल्या [[गुप्त]] साम्राज्याने भारताच्या बहुतांशी भागावर बराच काळ राज्य केले.[[सातवाहन]]नांची ची सत्ता आणि साम्राज्य स्थापन झाले.हा काळ भारताचा सुवर्णकाळ मानला जातो. या काळातच दीर्घकाल राहिलेला [[बौद्ध]] धर्माचा पगडा हळूहळू कमी झाला व पूर्वीच्या वैदिक धर्माची वेगळ्या स्वरूपांत पुनर्बांधणी झाली.इ.स.९ व्या शतकाच्या सुमारास उत्तर प्रदेशात [[गुर्जर-प्रतिहार]]रांची राजवट स्थापन झाली.[[कन्नोज]] ही त्यांची राजधानी होती. [[साहित्य]],[[गणित]],[[शास्त्र]], [[तत्त्वज्ञान]] इत्यादी क्षेत्रात भारताने मोठी मजल मारली."<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://india.gov.in/knowindia/ancient_history4.php|title=Gupta period has been described as the Golden Age of Indian history|अॅक्सेसदिनांक=2007-10-03 |प्रकाशक= ''[[National Informatics Centre]] (NIC)''}}</ref><ref>Heitzman, James. (2007). "[http://encarta.msn.com/encyclopedia_761571624/Gupta_Dynasty.html#s3 Gupta Dynasty,]" Microsoft® Encarta® Online Encyclopedia 2007</ref> भारत या काळात व्यापारीदृष्ट्या अतिशय पुढारलेला देश होता. दक्षिण भारतात अनेक साम्राज्ये उदयास आली. तमिळनाडूतील[[पांड्य]], [[चोल साम्राज्य]],[[चेरा]],[[विजयनगर साम्राज्य|विजयनगरचे साम्राज्य]] / राज्य, [[महाराष्ट्रातील]] [[सातवाहन]],[[यादव]],[[विदर्भ]] या काळातील कला, स्थापत्यशास्त्रातील प्रगती आजही खुणावते. [[अजिंठा]], [[वेरूळ]], [[हंपी]]चे प्राचीन नगर, दक्षिणेतील प्राचीन मंदिरे ही याच काळात बांधली गेली. चोल साम्राज्याचा विस्तार [[आग्नेय]] [[आशिया]]तील [[इंडोनेशिया]]पर्यंत पोहोचला होता.[[चालुक्य]],[[राष्ट्रकूट]],[[परमार]][[काकतेय]],[[होयसळ]] राज्ये उदयास आली. ग्रीकाप्रमाणेच [[शक]],[[हूण]],[[कुषाणा]]नीही भारतावर आक्रमणे केली.मध्य प्रदेशातील [[खजुराहो]] येथील [[चंदेल्ल]] राजवटीने बांधलेली मंदिरे प्रसिध्द आहेत.
[[११ व्या शतकात]] [[इराण]]मधील [[अरब]] सेनापती [[मोहम्मद बिन कासीम]]ने [[सिंध]] प्रांतात आक्रमण केले व तेथील [[दाहीर]] राजाचा पराभव करुन तो प्रांत काबीज केला. यानंतर अनेक [[इस्लामी]] आक्रमणे आली व भारतातील मोठ्या भूभागावर इस्लामी राजवट लागू झाली. भारतातील अनेक राज्ये आर्थिकदृष्ट्या अतिशय पुढारलेली होती. इस्लामी आक्रमणांत सत्ता काबीज करणे तसेच लूट करणे हे मुख्य उद्देश्य असत. [[गझनी]] येथील एका [[महमूद]] नावाच्या राज्यकर्त्याने भारतात लुटीच्या १७ मोहिमा आखल्या होत्या. [[मंगोल]] सम्राट [[तैमूरलंग]]ने केलेले [[दिल्ली]]तील शिरकाण मानवी इतिहासातील सर्वाधिक क्रूर घटना होती असे इतिहासकार नमूद करतात.[[अफगाण]] [[शासक]] [[महंमद घोरी]]ने भारतावर आक्रमण केले.अजयमेरुचा(आजचे [[अजमेर]]) एक [[राजपूत]] राजा [[प्रुथ्वीराज चौहान]]शी त्याचा संघर्ष झाला.आठ युध्दानंतर प्रुथ्वीराज चौहानचा म्रुत्यू झाला.महंमद घोरीने [[कुतूबुद्दीन ऐबक]] या आपल्या गुलामास भारतातील जिंकलेल्या मुलूखाचा सुभेदार म्हणून नेमले.महंमद घोरी नंतर अफगाणिस्तानात परत निघून गेला.महंमद घोरीच्या मृत्यूनंतर कुतूबुद्दीनने त्याचे स्वातंत्र्य घोषित केले.त्याच्या वारसदारांनी पुढील काही वर्षे भारतावर राज्य केले.नंतर त्याचा सेनापती [[जलालुद्दीन खिलजी]]ने त्याच्याविरुध्द उठाव करून सत्ता बळकावली/हस्तगत केली.१३व्या शतकात त्याचा पुतण्या [[अल्लाउद्दीन खिलजी]]ने त्याची कपटाने हत्या केली आणि तो शासक बनला. त्याने [[अफगाणिस्तान]]पासून ते [[बंगाल]]पर्यंत शासन केले. यात [[राजस्थान]]मधील [[चित्तोड]]चा राजपूत राजा [[रतनसिंग]] व राणी [[पद्मावती]]चा इतिहास न विसरण्या सारखा आहे. [[दिल्ली सल्तनत]] ते मोघलांपर्यंत अनेक इस्लामी राजवटी उदयास आल्या.महाराष्ट्रात [[हसन गंगू बहामनी]] याने [[बहामनी]] साम्राज्याची/ राज्याची स्थापना केली.उत्तर कर्नाटकाचा काही भागदेखील या साम्राज्यात/राज्यात समाविष्ट होता.बहामनी साम्राज्यात/राज्यात आणि विजयनगर साम्राज्यात/राज्यात संघर्ष होत.पुढे बहामनी साम्राज्याची/राज्याची पाच शकले झाली.
[[चित्र:Nehru Gandhi 1937 touchup.jpg|इवलेसे|उजवे|[[इ.स. १९३७]] साली [[महात्मा गांधी]] सोबत [[पंडित जवाहरलाल नेहरू]]]]
|