"भारताचा इतिहास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५:
|अ‍ॅक्सेसदिनांक = २००७-०६-१८|वर्ष= १|प्रकाशक = |भाषा=इंग्लिश}}</ref>. [[इसवी सन पूर्व]] ३५००चा सुमार [[सिंधू संस्कृतीचा]] काल मानला जातो. या सिंधू संस्कृतीची सुरुवात भारताच्या [[वायव्य]] प्रांतात म्हणजेच आजच्या [[पाकिस्तान]]ात झाली. [[मोहेंजोदडो]] व [[हडप्पा]] ही उत्खननात सापडलेली शहरे आज पाकिस्तानात असली तरी भारतीय इतिहासातच गणली जातात. ह्या शहरांचा शोध [[दयारामजी सहानी]] यांनी लावला. यानंतरचा काळ (इ.स. पूर्व १५०० ते इ.स. पूर्व ५००) वैदिक काळ समजला जातो. काही वर्षांपूर्वीपर्यंत इतिहासकारांमध्ये असा समज होता की [[युरोप]] व [[मध्य आशिया]]तून आलेल्या [[आर्य]] लोकांच्या टोळ्यांनी सातत्याने आक्रमणे करून [[सिंधू संस्कृती]] नष्ट केली व त्यानंतर [[वैदिक]] काळ सूरू झाला<ref>डिस्कव्हरी ऑफ इंडिया-ले. [[पंडित जवाहरलाल नेहरू]]</ref>. परंतु नव्या संशोधकांचे असे मत आहे असे आक्रमण झालेच नाही. तसेच वैदिक काळ हा पूर्वीच्या संशोधकांच्या मान्यतेपेक्षा अजून प्राचीन असून वैदिक संस्कृती व [[हडप्पा]] व मोहोंदोजडोची संस्कृती या एकच होत्या. हा वादाचा मुद्दा असला तरी सिंधू संस्कृती व वैदिक काळातील घडामोडी या [[सिंधू नदी|सिंधू]] व [[सरस्वती नदी|सरस्वती नद्यांच्या]] काठी घडल्या होत्या यात दुमत नाही. यातील [[सरस्वती नदी]] ही काळाच्या ओघात [[पृष्ठीय]] बदलांमुळे लुप्त पावली. प्राचीन सरस्वती नदी ही [[पंजाब]], [[राजस्थान]] व [[कच्छ जिल्हा|कच्छ]] [[गुजरात]]मधून वाहत होती हे शास्त्रीय पुराव्यातून सिद्ध झाले आहे. वैदिक काळातच [[भारतीय]] संस्कृतीची मुळे रोवली गेली. मध्य वैदिक काळात सिंधू काठची वैदिक संस्कृती गंगेच्या खोऱ्यात पसरली.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड नववा</ref> साधारणपणे इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 हा कालखंड म्हणजे वैदिक [[उत्तर कालखंड]] मानला जातो या काळात [[जनपदे]] अस्तित्वात आली. ही जनपदे म्हणजे छोटी छोटी [[राज्ये]] होती. भारतीय उपखंडाच्या वायव्येला असलेल्या आजच्या [[अफगाणिस्तान]]पासून ते [[पूर्वेला]] [[बिहार]], [[बंगाल]],[[ओडीसा]] पर्यंतच्या प्रदेशात आणि [[दक्षिणेत]] महाराष्ट्रापर्यंत ही जनपदे पसरलेली होती आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या या जनपदाने व्यापलेला होता [[संस्कृत]] [[पाली]] आणि [[अर्धमागधी]] साहित्यात या जनपदाची नावे आढळतात [[ग्रीक]] इतिहासकारांच्या लिखाणातूनही त्यासंबंधीची माहिती मिळते त्यातील काही जण पदांमध्ये [[राजेशाही]] ही अस्तित्वा मध्ये होती तर काही जणांमध्ये मात्र [[गणराज्य]] व्यवस्था होती.त्याकाळी अशी १६ जनपदे अस्तित्वात आलेली होती.गणराज्य असलेल्या जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तीची [[गणपरिषद]] असे परिषदेचे सदस्य एकत्रितपणे चर्चा करून राज्यकारभारास संबंधीचे निर्णय घेत असत अशा चर्चा ज्या ठिकाणी होत त्या सभागृहाला [[संतागार]] असे म्हटले जाई [['''गौतम बुद्ध''']] [[नेपाळ]]मधील [[शाक्य]] गणराज्यातील [[राजपुत्र]] होते प्रत्येक जनपदाची स्वतंत्र [[नाणी]] प्रचलनात होते.जन पदांच्या संदर्भातला उल्लेख हा तत्कालीन प्राचीन धार्मिक साहित्यामधून येतो यामध्ये [[बौद्ध]] धर्मातील [[त्रिपिटक]] आणि [[जैन]] धर्मातील [[ग्रंथ]] यामध्ये जनपदांचा व गणराज्यांचा उल्लेख आलेला आहे. कोसल महाजनपदाचा विस्तार [[हिमालयाच्या]] पायथ्याशी नेपाळ आणि [[उत्तर प्रदेश]] या ठिकाणी झालेला होता या राज्यातील [[श्रावस्ती]] [[कुशावती]] आणि [[साकेत]] ही [[नगरे]] प्रसिद्ध होती श्रावस्ती हे [[कोसल]] महाजनपदाची राजधानी होती गौतम बुद्ध श्रावस्थीमध्ये [[चेतवणी]] या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिलेले होते कोसल [[राजा]] [[प्रसेनजित]] हा [[वर्धमान महावीर]] आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता.कोसलचे राज्य मगधामध्ये विलीन झाले.कोसलप्रमाणेच [[वत्स]], [[अवंती]] आणि [[मगध]] हीदेखील मोठी [[महाजनपदे]] अस्तित्वात होती.मगधच्या उत्तरेस [[लिच्छवी]] हे गणराज्य होते.[[वैशाली]] ही त्याची राजधानी होती.मगधचा राजा [[अजातशत्रू]]ने लिच्छवी राज्य जिंकून ते मगधामध्ये विलीन करून घेतले.वत्स महाजनपदाचा विस्तार हा उत्तर प्रदेशातील [[प्रयाग]]च्या आसपासच्या प्रदेशात झालेला होता कोसम म्हणजेच प्राचीन काळाचे [[कौशांबी]] होईल हे एक महत्त्वाचे [[व्यापारी]] केंद्र होते कौशांबीतील तीन अत्यंत श्रीमंत व्यापाऱ्यांनी गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी यांच्यासाठी तीन [[विहार]] बांधले होते राजा [[उदयन]] हा गौतम बुद्धांचा समकालीन होता राजा [[उदयन]] नंतर वत्स महाजन पदाचे स्वतंत्र अस्तित्व फार काळ टिकले नाही ते अवंती महाजन पदाच्या राजाने जिंकून घेतले प्राचीन भारताच्या इतिहासात पदांची स्थान हे महत्त्वपूर्ण ठरलेले आहे या काळातील जन पदांच्या उद्या यातूनच [[सार्वभौम]] सत्ता ह्या आकाराला आल्या त्याच्या प्रदेशांमध्ये क्या सत्तांचा मोठा विस्तार घडून आला अनेक वैभव संपन्न असे राज्य देशांमध्ये आकाराला आले.
 
इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात [[ग्रीक]] [[सम्राट]] [[सिकंदर]] ([[अलेक्झांडर]])च्या आक्रमणानंतर बरीच राजकीय स्थित्यंतरे झाली.सिकंदराने [[गंगेच्या]] खोर्यापर्यतचा भारताचा काही भाग जिंकून तेथे त्याचे ग्रीक [[क्षात्रप]] म्हणजे [[सुभेदार]] नेमले.भारतामधून निघून गेल्यानंतर ग्रीसमध्ये[[ग्रीस]]मध्ये त्याचा म्रुत्यू झाला.सिकंदराच्या म्रुत्युनंतर ग्रीकाच्या ताब्यात असणार्या भारतीय प्रदेशात उठाव सुरु झाले. भारताच्या मुद्देसूद इतिहासाची येथपासून सुरुवात होते.[[चंद्रगुप्त मौर्य]]ाने आर्य [[चाणक्य]]यांच्या साथीने /मदतीने [[मगध]]च्या [[मौर्य]] साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली.त्याआधी त्याने मगधमधील [[नंद]] घराण्याचा शेवटचा राजा [[धनानंदा]]चा पराभव केला. तिचा म्हणजे मौर्य साम्राज्याचा त्याचा नातू [[सम्राट अशोक]]ाने कळस गाठला.भारताच्या पश्चिम सीमेपर्यत त्याचा विस्तार झाला.[[कलिंगा]]च्या युद्धात मानवी क्रौर्यानंतर अशोकाने [[शांतता]] व [[अहिंसेचा]] मार्ग अवलंबला व बौद्ध धर्माचा स्वीकार केला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |title = Maurya dynasty |दुवा = http://www.livius.org/man-md/mauryas/mauryas.html |लेखक = Jona Lendering |अ‍ॅक्सेसदिनांक = 2007-06-17}}</ref> भारतात या काळात मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्माचा प्रसार झाला होता.अशोकाच्यानंतरचे मौर्य सम्राट फारसे कर्तृत्ववान नसल्याने मौर्य साम्राज्याचे पतन सुरु झाले.शेवटचा मौर्य सम्राट [[ब्रुहद्राता]] याची त्याचा सेनापती पुष्यमित्र शुग याने हत्या केली आणि शुग घराण्याची सत्ता स्थापन केली.पुढे काही काळानंतर शुग घराण्याचा [[मंत्री]] [[वासुदेव कण्व]] याने शुग घराण्याच्या राजाची हत्या केली आणि [[कण्व]] घराण्याची सत्ता स्थापन केली. मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर काही काळ उत्तर भारतात अनेक ग्रीक आक्रमणे पुन्हा झाली काही काळ ग्रीक सत्तेखाली भारताचा काही भाग होता. तिसऱ्या शतकात स्थापन झालेल्या [[गुप्त]] साम्राज्याने भारताच्या बहुतांशी भागावर बराच काळ राज्य केले.[[सातवाहन]]नांची ची सत्ता आणि साम्राज्य स्थापन झाले.हा काळ भारताचा सुवर्णकाळ मानला जातो. या काळातच दीर्घकाल राहिलेला [[बौद्ध]] धर्माचा पगडा हळूहळू कमी झाला व पूर्वीच्या वैदिक धर्माची वेगळ्या स्वरूपांत पुनर्बांधणी झाली.इ.स.९ व्या शतकाच्या सुमारास उत्तर प्रदेशात [[गुर्जर-प्रतिहार]]रांची राजवट स्थापन झाली.[[कन्नोज]] ही त्यांची राजधानी होती. [[साहित्य]],[[गणित]],[[शास्त्र]], [[तत्त्वज्ञान]] इत्यादी क्षेत्रात भारताने मोठी मजल मारली."<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://india.gov.in/knowindia/ancient_history4.php|title=Gupta period has been described as the Golden Age of Indian history|अ‍ॅक्सेसदिनांक=2007-10-03 |प्रकाशक= ''[[National Informatics Centre]] (NIC)''}}</ref><ref>Heitzman, James. (2007). "[http://encarta.msn.com/encyclopedia_761571624/Gupta_Dynasty.html#s3 Gupta Dynasty,]" Microsoft® Encarta® Online Encyclopedia 2007</ref> भारत या काळात व्यापारीदृष्ट्या अतिशय पुढारलेला देश होता. दक्षिण भारतात अनेक साम्राज्ये उदयास आली. तमिळनाडूतील[[पांड्य]], [[चोल साम्राज्य]],[[चेरा]],[[विजयनगर साम्राज्य|विजयनगरचे साम्राज्य]] / राज्य, [[महाराष्ट्रातील]] [[सातवाहन]],[[यादव]],[[विदर्भ]] या काळातील कला, स्थापत्यशास्त्रातील प्रगती आजही खुणावते. [[अजिंठा]], [[वेरूळ]], [[हंपी]]चे प्राचीन नगर, दक्षिणेतील प्राचीन मंदिरे ही याच काळात बांधली गेली. चोल साम्राज्याचा विस्तार [[आग्नेय]] [[आशिया]]तील [[इंडोनेशिया]]पर्यंत पोहोचला होता.[[चालुक्य]],[[राष्ट्रकूट]],[[परमार]][[काकतेय]],[[होयसळ]] राज्ये उदयास आली. ग्रीकाप्रमाणेच [[शक]],[[हूण]],[[कुषाणा]]नीही भारतावर आक्रमणे केली.मध्य प्रदेशातील [[खजुराहो]] येथील [[चंदेल्ल]] राजवटीने बांधलेली मंदिरे प्रसिध्द आहेत.
 
[[११ व्या शतकात]] [[इराण]]मधील [[अरब]] सेनापती [[मोहम्मद बिन कासीम]]ने [[सिंध]] प्रांतात आक्रमण केले व तेथील [[दाहीर]] राजाचा पराभव करुन तो प्रांत काबीज केला. यानंतर अनेक [[इस्लामी]] आक्रमणे आली व भारतातील मोठ्या भूभागावर इस्लामी राजवट लागू झाली. भारतातील अनेक राज्ये आर्थिकदृष्ट्या अतिशय पुढारलेली होती. इस्लामी आक्रमणांत सत्ता काबीज करणे तसेच लूट करणे हे मुख्य उद्देश्य असत. [[गझनी]] येथील एका [[महमूद]] नावाच्या राज्यकर्त्याने भारतात लुटीच्या १७ मोहिमा आखल्या होत्या. [[मंगोल]] सम्राट [[तैमूरलंग]]ने केलेले [[दिल्ली]]तील शिरकाण मानवी इतिहासातील सर्वाधिक क्रूर घटना होती असे इतिहासकार नमूद करतात.[[अफगाण]] [[शासक]] [[महंमद घोरी]]ने भारतावर आक्रमण केले.अजयमेरुचा(आजचे [[अजमेर]]) एक [[राजपूत]] राजा [[प्रुथ्वीराज चौहान]]शी त्याचा संघर्ष झाला.आठ युध्दानंतर प्रुथ्वीराज चौहानचा म्रुत्यू झाला.महंमद घोरीने [[कुतूबुद्दीन ऐबक]] या आपल्या गुलामास भारतातील जिंकलेल्या मुलूखाचा सुभेदार म्हणून नेमले.महंमद घोरी नंतर अफगाणिस्तानात परत निघून गेला.महंमद घोरीच्या मृत्यूनंतर कुतूबुद्दीनने त्याचे स्वातंत्र्य घोषित केले.त्याच्या वारसदारांनी पुढील काही वर्षे भारतावर राज्य केले.नंतर त्याचा सेनापती [[जलालुद्दीन खिलजी]]ने त्याच्याविरुध्द उठाव करून सत्ता बळकावली/हस्तगत केली.१३व्या शतकात त्याचा पुतण्या [[अल्लाउद्दीन खिलजी]]ने त्याची कपटाने हत्या केली आणि तो शासक बनला. त्याने [[अफगाणिस्तान]]पासून ते [[बंगाल]]पर्यंत शासन केले. यात [[राजस्थान]]मधील [[चित्तोड]]चा राजपूत राजा [[रतनसिंग]] व राणी [[पद्मावती]]चा इतिहास न विसरण्या सारखा आहे. [[दिल्ली सल्तनत]] ते मोघलांपर्यंत अनेक इस्लामी राजवटी उदयास आल्या.महाराष्ट्रात [[हसन गंगू बहामनी]] याने [[बहामनी]] साम्राज्याची/ राज्याची स्थापना केली.उत्तर कर्नाटकाचा काही भागदेखील या साम्राज्यात/राज्यात समाविष्ट होता.बहामनी साम्राज्यात/राज्यात आणि विजयनगर साम्राज्यात/राज्यात संघर्ष होत.पुढे बहामनी साम्राज्याची/राज्याची पाच शकले झाली.अहमदनगरची निजामशाही,विजापूरची आदिलशाही,गोवळकोंड्याची कुतूबशाही,एलिचपूरची इमादशाही,बिदरची बरीदशाही अशी ती पाच राज्ये निर्माण झाली होती.त्यांच्यातही साम्राज्यविस्तारासाठी संघर्ष होत असत.या पाचपैकी चार राज्यांनी विजयनगरवर हल्ला करून त्याचा अंत केला.आपापसांतील सत्तासंघर्षात त्यांच्यापैकी एलिचपूर आणि बिदर ही राज्ये कालौघात नष्ट झाली.मुघल बादशहा शाहजहानने अहमदनगरची निजामशाही जिंकून घेतली.[[मुघल]] आणि दक्षिण भारतातील इस्लामी राज्ये यांच्यात साम्राज्यविस्तारासाठी संघर्ष होत.मुघल राजवटीत काही राजपूत राज्यांनी मुघलासमोर आव्हान उभे केले. पंजाबात महाराज [[रणजितसिंग]]गांच्या नेतृत्वाखाली [[शीख]] साम्राज्याची/राज्याची स्थापना झाली. [[शिवाजी शहाजी भोसले|छत्रपती शिवाजी महाराजांच्या]] नेतृत्वाखाली [[मराठा साम्राज्य,स्वराज्य ]]ाची महाराष्ट्रात स्थापना झाली,ज्याचा मुख्य उदेश्य भारतात एतद्देशीयांचे राज्य पुन‍:प्रस्थापन करणे हा होता.मुघल सम्राट [[आलमगीर औरंगजेबा]]च्या म्रुत्युनंतर मुघल साम्राज्य क्षीण होत गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघली व दक्षिण भारतातील इस्लामी सत्ता तर तीन [[परकीय]] सत्तांचा प्रतिकार केला .छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्रुत्युनंतर औरंगजेबाने/मुघलानी मराठा राज्यावर आक्रमण केले/हल्ला केला.छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र [[छत्रपती संभाजी महाराजां]]नी मुघलाबरोबर संघर्ष केला.औरंगजेबाने कपटाने छत्रपती संभाजी महाराजांना पकडून त्यांना ठार मारले.छत्रपती संभाजी महाराजांच्या म्रुत्युनंतर [[छत्रपती राजाराम महाराजां]]नी नेतृत्व केले.मुघल सेनापती [[दिलेरखाना]]ने मराठ्यांची राजधानी असलेला [[रायगड]] वेढा घालून जिंकल्यामुळे राजारामाना रायगड सोडून [[जिंजी]]ला पलायन करावे लागले.प्रक्रुती अस्वास्थ्यामुळे राजारामाचा म्रुत्यू झाला.औरंगजेबाने संभाजीची पत्नी [[येसूबाई]]] व मुलगा [[शाहू]] यांना कैद केले.औरंगजेबाच्या म्रुत्युनंतर मराठ्यांच्यामध्ये फूट पाडण्यासाठी मुघलानी शाहूला व येसूबाईला मुक्त केले/शाहूची व येसूबाईची मुक्तता केली.शाहू व राजारामाची पत्नी [[ताराबाई]] यांच्या युध्दात शाहूने ताराबाईचा पराभव केला.मराठा राज्याची वाटणी झाली.त्यानंतर पेशव्यांनी हळूहळू [[मराठा साम्राज्याचा]] विस्तार सुरु केला.मराठेशाहीनंतर [[पेशवे]] आले आणि त्यांनी आपली मुख्य राजधानी [[पुण्यात]] वसवली.महाराष्ट्रात पेशवाईची स्थापना झाली.पेशवे मराठेशाहीचे सत्ताधारी/सत्ताधीश बनले.[[पहिले बाजीराव पेशवे]] एक कर्तबगार राजकारणी होते.त्याचे स्वप्न हिमालयापर्यंत राज्य करण्याचे होते.पहिल्या बाजीराव पेशव्यांचे पुत्र असलेल्या नानासाहेबांच्या काळात अफगाण शासक [[अहमदशहा अब्दाली]]शी झालेल्या [[पानिपत]]च्या तिसर्या युद्धात दारूण पराभवानंतर पेशव्यांचे पतन सुरू झाले. त्याचा सर्वाधिक फायदा [[युरोपियन]] साम्राज्यवाद्यांना झाला. सोळाव्या शतकापासूनच अनेक युरोपीय देशांनी व्यापाराचे निमित्त करून वसाहती स्थापल्या होत्या व ते आपले साम्राज्यवादी धोरण पुढे रेटत होते. [[इंग्रज]], [[पोर्तुगीज]], [[फ्रेंच]], [[डच]] हे भारतात आपले वर्चस्व गाजवण्यास धडपडत होते. इंग्रजांनी साहजिकच आपल्या विकसित शस्त्रास्त्रे व युद्धकौशल्य तसेच मुत्सदेगीरी, फुटीचे राजकारण करून हळूहळू भारतातील सर्व राज्ये आपल्या अधिपत्याखाली आणली. [[बंगाल]]पासून सुरुवात करत, [[कर्नाटकातील]] [[म्हैसूर]]चा [[सुल्तान]] [[हैदर अली]] व त्याचा मुलगा [[टिपू सुलतान]], १८१८ मध्ये मराठा साम्राज्य, १८५० च्या सुमारास [[पंजाब]]मधील शीख राज्य/साम्राज्य व [[जाट]] राज्ये/साम्राज्ये असे एक एक हस्तगत करत जवळपास संपूर्ण भारताला इंग्रजांनी [[ईस्ट इंडिया कंपनी]]च्या कारभाराखाली [[गुलाम]] बनवले.ईस्ट इंडिया कंपनी सरकारने पर्यायाने इंग्रजांनी भारताचे आर्थिक शोषण केले.फ्रान्सने/फ्रेंचानी डिचेरी व चंद्रनगर व पोर्तुगीजांनी पॅडिचेरी [[गोवा]],[[दीव]],[[दमण]] आणि [[दादरा आणि नगर हवेली]] हस्तगत केले.भारतातील त्यांची [[मांडलिक]] [[संस्थाने]]/राज्ये दत्तक वारस नामंजूर करुन खालसा केली. <ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://india.gov.in/knowindia/history_freedom_struggle.php|title=History : Indian Freedom Struggle (1857-1947)|अ‍ॅक्सेसदिनांक=2007-10-03 |प्रकाशक= [[National Informatics Centre|National Informatics Centre (NIC)]] |अवतरण=And by 1856, the British conquest and its authority were firmly established.}}</ref>. १८५७ मध्ये ब्रिटिश सेनेमधील भारतीय सैनिकांनी उठाव केला व पाहता पाहता संपूर्ण भारतभर त्याचे पडसाद उमटले. ब्रिटिशांविरुद्धचा उठाव अयशस्वी झाला तरी ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्य मिळवण्याची ऊर्मी भारतीयांच्यात जागृत झाली. उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीकडून कारभार [[इंग्लंड]]च्या [[ब्रिटिश]] सरकारकडे गेला.